एक्स्प्लोर

चमकीलाला प्रसिद्धी देणारी रेकॉर्डिंग कंपनी सध्या काय करते? कोट्यवधी रुपये कसे कमवते?

पंजाबी गायक अमर सिंह चमकीला याला प्रसिद्धी मिळवून देणारी सारेगामा ही कंपनी सध्या नेमकं काय करत आहे? असं विचारलं जातंय.

मुंबई : सध्या नेटफ्लिक्सवर प्रसिद्ध झालेल्या अमर सिंह चमकीला (Amar Singh Chamkila) या चित्रपटाची सगळीकडे चर्चा चालू आहे. या चित्रपटात पंजाबी गायक चमकीला याचा जीवनप्रवास मांडण्यात आला आहे. मोबाईल फोन नसलेल्या त्या काळात गायक चमकीला हा पंजाबच्या (Punjab) खेड्या-खेड्यांत पोहोचला होता. लोकांच्या कार्यक्रमात गाणारा हा चमकीला पंजाबमध्ये कमी काळात प्रसिद्ध झाला होता. एलपी रेकॉर्ड्स कंपनीमुळे हा चमकीला संपूर्ण पंजाबला माहिती झाला होता. पण चमकीलाला प्रसिद्धी देणारी ही एलपी रेकॉर्ड्स कंपनी सध्या काय करत आहे? हे जाणून घेऊ या.

पूर्वी मोबाईल्स नव्हते. त्यामुळे लोक संगित एकण्यासाठी  ग्रामोफोनचा वापर करायचेच. गायकांची गितं एलपी रेकॉर्ड्सवर रेकॉर्ड केली जायची. त्या रेकॉर्डिंगची एक सीडी यायची. या ही सीडी ग्रामोफोनवर ठेवून गाणे ऐकले जायचे. अमर सिंह चमकीलाला याच एलपी रेकॉर्ड्समुळे प्रसिद्धी, नाव मिळालं. विशेष म्हणजे चमकीला सुपरस्टार झाल्यामुळे त्याच्या गाण्यांची रेकॉर्डिंग करणाऱ्या या कंपनीनेही त्या काळात खूप पैसे कमवले.  

एचएमव्ही ते सारेगामा  

सारेगामा इंडिया लिमिटेड ही भारतातील सर्वांत जुनी म्यूझिक लेबल कंपनी आहे. ही कंपनी आरपी संजीव गोयंका ग्रुपच्या मालकीची आहे. याआधी मात्र या कंपनीचे नाव सारेगामा नव्हते. या कंपनीला 1901 मध्ये ग्रामोफोन अँड टाईपरायटर लिमिटेड या नावाने ओळखले जायचे. या कंपनीचे मुख्यालय कोलकात्यात होते. आजही या कंपनीचे मुख्यालय कोलकात्यातच आहे.  गोल्डन इरामधील सर्वाधिक प्रसिद्ध गाण्यांवर याच कंपनीचा मालकीहक्क आहे.

देशातील पहिला स्टुडिओ याच कंपनीने तयार केला

ग्रामफोन अँड टाईपरायटर लिमिटेड या कंपनीचे नाव कालांतराने ग्रामोफोन कंपनी ऑफ इंडिया असे करण्यात आले होते. या कंपनीच्या रेकॉर्डिंग स्टुडिओत रविंद्रनाथ टागोर यांनी स्वत:च्या आवाजात काही गितं रेकॉर्ड केले होती. देशातील पहिला रेकॉर्डिंग स्टुडिओदेखील 1928 साली याच कंपनीने तयार केला होता. या रेकॉर्डिंग स्टुडिओचे नाव दम दम स्टुडीओ असे ठेवण्यात आले होते.

2000 साली कंपनीचे नाव बदलले

सुरुवातीला या कंपनीने 100 वर्षांपर्यंत ‘एचएमव्ही’ याच नावाने काम केले. 2000 साली या कंपनीचे नाव बदलून ‘सारेगामा’ असे करण्यात आले. याच कंपनीने 1980 च्या दशकात अमर सिंह चमकीलाचे गाणे रेकॉर्ड केले. ही गाणी पंजाबमध्य कमी काळात प्रसिद्ध झाली. 

कंपनी आज काय काम करते? 

पूर्वीची एचएमव्ही ही कंपनी आज सारेगामा या नावाने ओळखली जाते. या कंपनीकडे अनेक गाण्याचे कॉपीराईट्स आहेत. कॉपीराईट्सच्या माध्यमातून ही कंपनी चांगला पैसा कमवते. ही कंपनी चित्रपटनिर्मिती, चित्रपटाचे वितरण अशी कामे करते. तसेच कारवां या प्री-रेकॉर्डिंग डिव्हाईसच्या माध्यमातूनही ही कंपनी पैसे कमवते. ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध आहे. सध्या या कंपनीचे उत्पन्न हे  204 कोटी रुपये असून निव्वळ नफा 52.22 कोटी रुपये आहे. 

हेही वाचा :

पगार तब्बल 24 कोटी! कोण आहेत निखील मेसवानी जे मुकेश अंबानींचे आहेत खास!

गुंतवणुकीतून चांगला परतावा हवाय? मग 'हे' आहेत सर्वोत्तम पाच पर्याय!

SIP फक्त श्रीमंतांसाठीच असते? पैसे बुडण्याचा धोका असतो का? जाणून घ्या 'या' पाच प्रश्नांची सोपी उत्तरं!

 

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

30 रुपयाच्या खाली पेनी स्टॉक, लॉजिस्टिक्स कंपनीने 34% स्टॉक सुधारणा असूनही 131% नफा वाढवला
30 रुपयाच्या खाली पेनी स्टॉक, लॉजिस्टिक्स कंपनीने 34% स्टॉक सुधारणा असूनही 131% नफा वाढवला
IIFL फायनान्सच्या शेअरच्या किमतीत गुरुवारी 6% वाढ; कारणे जाणून घ्या
IIFL फायनान्सच्या शेअरच्या किमतीत गुरुवारी 6% वाढ; कारणे जाणून घ्या
एका बाजूला भारतीय शेअर बाजारात घसरण, दुसऱ्या बाजूला सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर? 
एका बाजूला भारतीय शेअर बाजारात घसरण, दुसऱ्या बाजूला सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर? 
कोट्यवधी रुपयांची संपत्ती! डी. के. शिवकुमार ते चंद्राबाबू नायडू, भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांची यादी 
कोट्यवधी रुपयांची संपत्ती! डी. के. शिवकुमार ते चंद्राबाबू नायडू, भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांची यादी 

व्हिडीओ

Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...
Bal Mane Konkan Vidhan Parishad Election 2026: ठाकरेंनी विश्वास दाखवला, राणेंनी उमेदवार फोडला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
Embed widget