एक्स्प्लोर

भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंची होते आयात निर्यात? कसा आहे दोन देशांमधील व्यापार?

India and Pakistan Trade : भारत मोठ्या प्रमाणात अनेक वस्तुंची पाकिस्तानमध्ये निर्यात करतो. तसेच भारतातही पाकिस्तानमधून काही वस्तूंची आयात केली जाते. जाणून घेऊयात या दोन्ही देशांमधील व्यापाराच्या संदर्भातील माहिती.

India and Pakistan Trade : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 5 महिन्यांत भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार जवळपास शून्य राहिला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, पाकिस्तानमधून भारताची आयात शून्य राहिली. तर भारताने पाकिस्तानला 235 दशलक्ष डॉलर्सचा माल निर्यात केला आहे. भारत मोठ्या प्रमाणात अनेक वस्तुंची पाकिस्तानमध्ये निर्यात करतो. तसेच भारतातही पाकिस्तानमधून काही वस्तूंची आयात केली जाते. जाणून घेऊयात या दोन्ही देशांमधील व्यापाराच्या संदर्भातील माहिती.

1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण आहेत. दहशतवाद, सीमेवरील चकमकी आणि राजकीय मतभेद यांचा अनेकदा दोन्ही देशांमधील संबंधांवर परिणाम झाला आहे. मात्र, शत्रुत्व असले तरी दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध अबाधित राहिले असले तरी दोन्ही देशांतील संबंध व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले तर अलीकडच्या काळात व्यापारी घडामोडींमध्ये मोठी घट झाली आहे.

सध्या दोन्ही देशामधील व्यवसायाची स्थिती काय?

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार जवळपास नगण्य राहिला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, पाकिस्तानमधून भारताची आयात शून्य राहिली. तर भारताने पाकिस्तानला 235 दशलक्ष डॉलर किमतीच्या वस्तूंची निर्यात केली आहे. ज्यात प्रामुख्याने साखर आणि औषधी उत्पादनांचा समावेश होता. गेल्या आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये, भारताने पाकिस्तानमधून फक्त 3 दशलक्ष डॉलरर्स किमतीच्या वस्तूंची आयात केली होती. ज्यामध्ये प्रामुख्याने काही कृषी वस्तूंचा समावेश होता.

दोन्ही देशांमध्ये कोणत्या वस्तूंची आयात आणि निर्यात केली जाते?

भारत पाकिस्तानमधून खनिज तेल, तांबे, फळे, सुका मेवा, मीठ, सल्फर, प्लास्टर सामग्री आणि कापूस आयात करतो. तर भारत पाकिस्तानला रसायने, भाज्या, प्लास्टिक उत्पादने, दुग्धजन्य पदार्थ, औषधी आणि साखर निर्यात करतो.

2019 नंतर व्यापारी संबंध बदलले

फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान व्यापार संबंध  बदलले आहेत. या हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानकडून मोस्ट फेव्हर्ड नेशन (MFN) दर्जा काढून घेतला. यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंधही स्थगित केले. दोन्ही देशांमधील तणावपूर्ण राजकीय वातावरण आणि भारताने कलम 370 हटवल्यानंतर व्यापारी संबंध आणखी बिघडले. शत्रुत्व असले तरी भारत आणि पाकिस्तान यांच्यात काही वस्तूंसाठीचे व्यापारी संबंध अजूनही अस्तित्वात आहेत. भारताकडून निर्यात होणारी औषधी उत्पादने आणि साखर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची आहे.

राजकीय तणाव कमी झाल्यास दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध सुधारु शकतात

राजकीय तणाव कमी झाला तरच दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध सुधारू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या व्यापाराचे आकडे अत्यल्प आहेत, पण व्यापारी संबंध सुधारण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. भारत-पाकिस्तान व्यापार संबंध दाखवतात की राजकीय मतभेद जरी खोल असले तरी काही वस्तूंची परस्पर गरज दोन्ही देशांना व्यापार करण्यास भाग पाडू शकते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याची हत्या; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याची हत्या; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द

व्हिडीओ

Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याची हत्या; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याची हत्या; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
साडेतीन वर्षांनी नवाब मलिक मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर, म्हणाले, काहींनी बोंबाबोंब केली, तरी अजितदादा माझ्या पाठिशी उभे राहिले! निवडणूक आयोगाच्या कारभारावर सडकून प्रहार
साडेतीन वर्षांनी नवाब मलिक मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर, म्हणाले, काहींनी बोंबाबोंब केली, तरी अजितदादा माझ्या पाठिशी उभे राहिले! निवडणूक आयोगाच्या कारभारावर सडकून प्रहार
ITC : केंद्राच्या निर्णयाचा सलग दुसऱ्या दिवशी ITC ला फटका, दोन दिवसात 72300 कोटी स्वाहा, LIC चे 11460 कोटी पाण्यात
ITC चा स्टॉक सलग दुसऱ्या दिवशी कोसळला, दोन दिवसात 73200 कोटी स्वाहा, LIC चे 11460 कोटी बुडाले
Parbhani : जेलच्या शौचालयात शालच्या सहाय्याने गळा आवळून कैद्याने जीवन संपवलं; आई-मावशीसह तिघांच्या हत्या प्रकरणात होता आरोपी
जेलच्या शौचालयात शालच्या सहाय्याने गळा आवळून कैद्याने जीवन संपवलं; आई-मावशीसह तिघांच्या हत्या प्रकरणात होता आरोपी
Embed widget