एक्स्प्लोर

Share Market : पाच दिवसात गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात 35000 कोटी कमावले, स्टेट बँकेचे गुंतवणूकदार मालामाल

Share Market : भारतीय शेअर बाजारात 15 ते 19 सप्टेंबर या कालावधीत गुंतवणूकदारांनी 35 हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे.

मुंबई : भारतीय शेअर बाजारात 15 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीमध्ये तेजी आणि घसरण पाहायला मिळाली असली तर गुंतवणूकदारांना चांगला फायदा झाला आहे. बीएसई सेन्सेक्समध्ये या आठवड्यात 721.53 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्सवरील टॉप-10 कंपन्यांपैकी 7 कंपन्यांच्या बाजारमूल्यात मोठी वाढ पाहायला मिळाली. या कंपन्यांच्या गुंतवणूकदारांनी पाच दिवसात मोठी कमाई केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गुंतवणूकदारांना दमदार परतावा मिळाला आहे. या पाच दिवसांच्या काळात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 35 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 

15 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या काळात शेअर बाजारातील सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी ज्या सात कंपन्यांच्या स्टॉकमध्ये तेजी आली त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, भारत एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज याशिवाय टीसीएस, इन्फोसिस, एचडीएफसी बँक आणि एलआयसीचा समावेश आहे. तर, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स आणि हिंदूस्तान यूनिलीवरच्या गुंतवणूकदारांचं नुकसान झालं. 

भारतीय शेअर बाजारावर 15 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. बँकेचं बाजारमूल्य वाढून 795910 कोटी रुपये झालं आहे. या पाच दिवसांच्या काळात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी 35953.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारती एअरटेलचं बाजारमूल्य 33214.77 कोटी रुपयांनी वाढून 11,18,952.64 कोटी रुपये झालं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचं बाजारमूल्य 17389.23 कोटी रुपयांनी वाढून 19,04,898.51 कोटी रुपये झालं आहे. 

टाटा ग्रुपच्या टीसीएस कंपनीचं बाजारमूल्य 12952.75 कोटी रुपयांनी वाढून 1146879.47 कोटी रुपये झालं आहे. एलआयसीचं बाजारमूल्य 12460.25 कोटी रुपयांनी वाढलं असून ते 565612.92 कोटी रुपये झालं आहे. भारताची दुसरी मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचा विचार केला असता त्याचं बाजारमूल्य 6127.73 कोटी रुपयांनी वाढून 6,39,901.03 कोटी रुपये झालं आहे. एचडीएफसी बँकेचं बाजारमूल्य 230.31 कोटी रुपयांनी वाढून 14,84,816.26 कोटी रुपये झालं आहे. 

दुसरीकडे सेन्सेक्सवरील तीन कंपन्यांच्या बाजारमूल्यात घसरण झाली. यामध्ये आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स आणि हिंदुस्थान यूनिलीवरचा समावेश आहे. आयसीआयसीआय बँकेंचं भाजारमूल्य 10707.87 कोटी रुपयांनी घसरुन 10,01,654.46 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. बजाज फायनान्सचं बाजारमूल्य 6346.93 कोटी रुपयांनी घसरलं, त्यांचं बाजारमूल्य 617892.72 कोटी रुपयांवर आलं. एचयूएलचं बाजारमूल्य 5039.87 कोटी रुपयांनी घसरुन 6,01,225.16 कोटी रुपयांवर आलं. 

बाजारमूल्याच्या क्रमानुसार देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज आहे. त्यानंतर एचडीएफसी बँक, टीसीएस, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बजाज फायनान्स,एचयूएल आणि एलआयसी असा क्रम आहे.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Thackeray BMC Election Manifesto: ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द

व्हिडीओ

Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार
Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Thackeray BMC Election Manifesto: ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
Rajesh Kshirsagar: विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
Vasai-Virar Municipal Election 2026: सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
धमकी देणाऱ्या विधानसभा अध्यक्षांना निलंबित करा, उद्धव ठाकरेंची मागणी; निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
धमकी देणाऱ्या विधानसभा अध्यक्षांना निलंबित करा, उद्धव ठाकरेंची मागणी; निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
Embed widget