एक्स्प्लोर

Share Market : पाच दिवसात गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात 35000 कोटी कमावले, स्टेट बँकेचे गुंतवणूकदार मालामाल

Share Market : भारतीय शेअर बाजारात 15 ते 19 सप्टेंबर या कालावधीत गुंतवणूकदारांनी 35 हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे.

मुंबई : भारतीय शेअर बाजारात 15 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीमध्ये तेजी आणि घसरण पाहायला मिळाली असली तर गुंतवणूकदारांना चांगला फायदा झाला आहे. बीएसई सेन्सेक्समध्ये या आठवड्यात 721.53 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्सवरील टॉप-10 कंपन्यांपैकी 7 कंपन्यांच्या बाजारमूल्यात मोठी वाढ पाहायला मिळाली. या कंपन्यांच्या गुंतवणूकदारांनी पाच दिवसात मोठी कमाई केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गुंतवणूकदारांना दमदार परतावा मिळाला आहे. या पाच दिवसांच्या काळात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 35 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 

15 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या काळात शेअर बाजारातील सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी ज्या सात कंपन्यांच्या स्टॉकमध्ये तेजी आली त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, भारत एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज याशिवाय टीसीएस, इन्फोसिस, एचडीएफसी बँक आणि एलआयसीचा समावेश आहे. तर, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स आणि हिंदूस्तान यूनिलीवरच्या गुंतवणूकदारांचं नुकसान झालं. 

भारतीय शेअर बाजारावर 15 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. बँकेचं बाजारमूल्य वाढून 795910 कोटी रुपये झालं आहे. या पाच दिवसांच्या काळात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी 35953.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारती एअरटेलचं बाजारमूल्य 33214.77 कोटी रुपयांनी वाढून 11,18,952.64 कोटी रुपये झालं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचं बाजारमूल्य 17389.23 कोटी रुपयांनी वाढून 19,04,898.51 कोटी रुपये झालं आहे. 

टाटा ग्रुपच्या टीसीएस कंपनीचं बाजारमूल्य 12952.75 कोटी रुपयांनी वाढून 1146879.47 कोटी रुपये झालं आहे. एलआयसीचं बाजारमूल्य 12460.25 कोटी रुपयांनी वाढलं असून ते 565612.92 कोटी रुपये झालं आहे. भारताची दुसरी मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचा विचार केला असता त्याचं बाजारमूल्य 6127.73 कोटी रुपयांनी वाढून 6,39,901.03 कोटी रुपये झालं आहे. एचडीएफसी बँकेचं बाजारमूल्य 230.31 कोटी रुपयांनी वाढून 14,84,816.26 कोटी रुपये झालं आहे. 

दुसरीकडे सेन्सेक्सवरील तीन कंपन्यांच्या बाजारमूल्यात घसरण झाली. यामध्ये आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स आणि हिंदुस्थान यूनिलीवरचा समावेश आहे. आयसीआयसीआय बँकेंचं भाजारमूल्य 10707.87 कोटी रुपयांनी घसरुन 10,01,654.46 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. बजाज फायनान्सचं बाजारमूल्य 6346.93 कोटी रुपयांनी घसरलं, त्यांचं बाजारमूल्य 617892.72 कोटी रुपयांवर आलं. एचयूएलचं बाजारमूल्य 5039.87 कोटी रुपयांनी घसरुन 6,01,225.16 कोटी रुपयांवर आलं. 

बाजारमूल्याच्या क्रमानुसार देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज आहे. त्यानंतर एचडीएफसी बँक, टीसीएस, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बजाज फायनान्स,एचयूएल आणि एलआयसी असा क्रम आहे.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Metro 13: मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडणार, 25 किमीच्या मेट्रो-13 वर 16 स्थानकं, 17,725 कोटींचा खर्च 
मुंबई-पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती, मेट्रो 13 आणि पुण्यातील रिंगरोडच्या खर्चास मान्यता 
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Embed widget