एक्स्प्लोर

RBI MPC Meet Result: महागड्या कर्जातून दिलासा नाहीच; रेपो रेट 6.5 टक्क्यांवर कायम

RBI Repo Rate: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पतधोरणाच्या बैठकीत सांगितले की, रेपो दरात कोणताही बदल केला जात नाही.

RBI Monetary Policy: भारतीय रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank of India) पुन्हा एकदा रेपो रेट (RBI Repo Rate) जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तीन दिवसीय चलनविषयक धोरण आढावा बैठकीनंतर (MPC Meeting) RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितलं की, समितीनं पुन्हा एकदा रेपो दरांत कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दर सध्या 6.5 टक्के आहे. मात्र, आता रिझर्व्ह बँक (RBI) आता यावर बारीक लक्ष ठेवणार असल्याचंही शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांनी सांगितलं आहे.  

सहापैकी पाच सदस्यांकडून मान्य 

2023-24 या आर्थिक वर्षासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पाचव्या पतधोरण बैठकीत गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, "रेपो दर सध्या स्थिर राहील. आरबीआयच्या बैठकीत 6 पैकी 5 सदस्यांनी रेपो दर स्थिर ठेवण्याच्या निर्णयाला सहमती दर्शवली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचा 'withdrawal of accommodation' ही भूमिका कायम आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, महागाईचा दर 4 टक्क्यांच्या खाली आणण्यावर भर दिला जाईल.

जीडीपी 7 टक्के दरानं वाढण्याची अंदाज 

आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितलं की, 2023-24 या आर्थिक वर्षासाठी सकल देशांतर्गत उत्पादनाची वाढ 7 टक्के राहण्याचा अंदाज आहे. यापूर्वी आरबीआयनं 6.5 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला होता. ते म्हणाले की, जीडीपी तिसऱ्या तिमाहीत 6.5 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 6 टक्के दरानं वाढेल. दास म्हणाले की, 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत वास्तविक जीडीपी ग्रोथ 6.7 टक्के, दुसऱ्या तिमाहीत 6.5 टक्के आणि तिसऱ्या तिमाहीत 6.4 टक्के राहण्याचा अंदाज आहे.

रेपो दर 6.5 टक्क्यांवर स्थिर

भारतीय रिझर्व्ह बँकेनं गेल्या अनेक बैठकांमध्ये रेपो दर 6.5 टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या पाचव्या बैठकीतही रेपो दर स्थिर राहण्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत होते. काही तज्ज्ञ असंही म्हणतात की, केंद्रीय बँक जून 2024 पर्यंत रेपो दरांत कोणताही बदल करणार नाही, कारण RBI चं लक्ष्य महागाई दर 4 टक्क्यांच्या खाली आणण्याचं आहे.

फेब्रुवारीपासून रेपो दर जैसे थे 

फेब्रुवारीपासून भारतीय रिझर्व्ह बँकेनं घेतलेल्या सर्व पतधोरण बैठकांमध्ये रेपो दरांत कोणताही बदल झालेला नाही. रेपो रेट सध्या 6.5 टक्के आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अर्थतज्ज्ञांचं म्हणणं आहे की, आरबीआय 2024-25 या आर्थिक वर्षाच्या आधी रेपो रेटमध्ये कपात करणार नाही आणि तो सध्या स्थिर राहील.

रेपो दर वाढल्यानं कर्ज कसं महाग होतं?

रेपो रेट म्हणजे, रिझर्व्ह बँक इतर बँकांना ज्या दरानं कर्ज देते आणि बँका हा पैसा लोकांना कर्ज म्हणून देतात. या कारणास्तव, जेव्हा जेव्हा रेपो दरांत बदल होतो तेव्हा त्याचा थेट परिणाम कर्जाच्या EMI वर होतो. म्हणजेच, रेपो रेट वाढल्यास कर्जाचा ईएमआयही वाढतो.

रेपो रेट म्हणजे काय?

ज्याप्रमाणे अनेक जण त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतात आणि त्याची निश्चित व्याजासह परतफेड करतात, त्याचप्रमाणे सार्वजनिक आणि व्यावसायिक बँकांनाही त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घ्यावे लागते. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँकांना ज्या व्याजदराने कर्ज दिले जाते. त्याला रेपो दर म्हणतात. रेपो रेट कमी झाला की सर्वसामान्यांना दिलासा मिळतो आणि रेपो दर वाढला की सर्वसामान्यांच्या अडचणीही वाढतात.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर
Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
Embed widget