एक्स्प्लोर

पायलटची तक्रार टाटांना पडली महागात, एअर इंडियाला भरावा लागणार 1.10 कोटींचा दंड

एका पायलटने केलेली तक्रार टाटा समूहाची कंपनी एअर इंडियाला (Air India) चांगलीच महागात पडली आहे. एअर इंडियाला 1.10 कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

Air India : एका पायलटने केलेली तक्रार टाटा समूहाची कंपनी एअर इंडियाला (Air India) चांगलीच महागात पडली आहे. तक्रार आल्यानंतर डीजीसीए सक्रिय झाली असून, आता एअर इंडियाला 1.10 कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. बोईंगचे B777 विमान उडवणाऱ्या पायलटने एअर इंडियावर लांब मार्गाच्या उड्डाणांमध्ये सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता. एव्हिएशन सेक्टर रेग्युलेटर डीजीसीएने एअर इंडियाविरोधात चौकशी सुरु केली आहे.

पायलटची तक्रार, आरोपांची व्यापक चौकशी 

पायलटची तक्रार केल्यानंतर डीजीसीएने आरोपांची व्यापक चौकशी केली. त्यानंतर एअर इंडियाने नियमांचे पालन करण्यात निष्काळजीपणा केल्याचे आढळून आले आहे. यानंतर डीजीसीएने एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस देखील बजावली होती. कंपनीकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने डीजीसीएने एअर इंडियाला 1.10 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. B777 च्या माजी पायलटने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि DGCA ला नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल माहिती दिली होती. एअर इंडियाने भाडेतत्त्वावर घेतलेल्या B777 विमानासाठी ही तक्रार होती. आपत्कालीन ऑक्सिजन पुरवठ्याच्या आवश्यक यंत्रणेशिवाय या विमानांमध्ये विमान कंपनी लांबचा प्रवास करते अशी तक्रार करण्यात आली होती.

दरम्यान, याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाने भाड्याने घेतलेल्या B777 विमानात रासायनिक ऑक्सिजन निर्मिती प्रणाली आहे. परंतू, ही सुमारे 12 मिनिटे टिकते. त्यामुळं सॅन फ्रान्सिस्कोला आणि तेथून एअरलाइनच्या थेट उड्डाणांमध्ये हे वापरले जात नाही. नुकतीच देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला 1.20 कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. एका कंपनीच्या फ्लाइटचे प्रवासी धावपट्टीवर आले आणि तिथेच जेवण करायला लागले. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. 

एअर इंडिया ही भारत देशाची प्रमुख राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी

एअर इंडिया ही भारत देशाची प्रमुख राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी आहे. इंडिगो व जेट एअरवेज खालोखाल एर इंडिया भारतामधील तिसऱ्या क्रमांकाची मोठी विमानकंपनी असून ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. एर इंडियाचे भारतातील चारही महानगरांमध्ये हब असून इतर अनेक शहरांमध्ये देखील मोठे तळ आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

Flight Offers : फक्त 1799 रुपयांत विमान प्रवास, एअर इंडियाकडून फ्लाईट तिकीटवर भन्नाट ऑफर

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

1 एप्रिलपासून पॅन कार्डचे नियम बदलणार, केवळ आधार कार्ड पुरेसे ठरणार नाही, जाणून घ्या सविस्तर माहिती 
1 एप्रिलपासून पॅन कार्डचे नियम बदलणार, केवळ आधार कार्ड पुरेसे ठरणार नाही, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Share Market : अमेरिका-इराण युद्ध सुरुच, इकडे विदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा ट्रेंड थांबेना, मार्चमध्ये भारतीय शेअर बाजारातून 88 हजार कोटी काढून घेतले
अमेरिका- इराण युद्धाची भारताला झळ, विदेशी गुंतवणूकदारांनी मार्चमध्ये शेअर बाजारातून 88 हजार कोटी काढून घेतले
ATM Card Rules : एचडीएफसी ते पंजाब नॅशनल बँकेसह विविध बँका एटीएम कार्डच्या वापराचे नियम बदलणार, पैसे काढणं महागणार, जाणून घ्या नवी अपडेट
विविध बँकांचे 1 एप्रिलपासून एटीएम कार्ड वापराचे नियम बदलणार, पैसे काढणं महागणार, जाणून घ्या
Gold silver Price: सोन्याच्या भावात 13 हजार रुपयांची तर चांदीत 32 हजार 700 रुपयांची घसरण, सोनं-चांदी स्वस्त, खरेदीसाठी सुवर्णसंधी?
सोन्याच्या भावात 13 हजार रुपयांची तर चांदीत 32 हजार 700 रुपयांची घसरण, सोनं-चांदी स्वस्त, खरेदीसाठी सुवर्णसंधी?

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Embed widget