![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
पायलटची तक्रार टाटांना पडली महागात, एअर इंडियाला भरावा लागणार 1.10 कोटींचा दंड
एका पायलटने केलेली तक्रार टाटा समूहाची कंपनी एअर इंडियाला (Air India) चांगलीच महागात पडली आहे. एअर इंडियाला 1.10 कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
![पायलटची तक्रार टाटांना पडली महागात, एअर इंडियाला भरावा लागणार 1.10 कोटींचा दंड pilot filed a complaint against Air India a Tata group company marathi news पायलटची तक्रार टाटांना पडली महागात, एअर इंडियाला भरावा लागणार 1.10 कोटींचा दंड](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/24/b7067d66a4edc97179bd400adc8517ce1706094338715339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Air India : एका पायलटने केलेली तक्रार टाटा समूहाची कंपनी एअर इंडियाला (Air India) चांगलीच महागात पडली आहे. तक्रार आल्यानंतर डीजीसीए सक्रिय झाली असून, आता एअर इंडियाला 1.10 कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. बोईंगचे B777 विमान उडवणाऱ्या पायलटने एअर इंडियावर लांब मार्गाच्या उड्डाणांमध्ये सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता. एव्हिएशन सेक्टर रेग्युलेटर डीजीसीएने एअर इंडियाविरोधात चौकशी सुरु केली आहे.
पायलटची तक्रार, आरोपांची व्यापक चौकशी
पायलटची तक्रार केल्यानंतर डीजीसीएने आरोपांची व्यापक चौकशी केली. त्यानंतर एअर इंडियाने नियमांचे पालन करण्यात निष्काळजीपणा केल्याचे आढळून आले आहे. यानंतर डीजीसीएने एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस देखील बजावली होती. कंपनीकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने डीजीसीएने एअर इंडियाला 1.10 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. B777 च्या माजी पायलटने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि DGCA ला नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल माहिती दिली होती. एअर इंडियाने भाडेतत्त्वावर घेतलेल्या B777 विमानासाठी ही तक्रार होती. आपत्कालीन ऑक्सिजन पुरवठ्याच्या आवश्यक यंत्रणेशिवाय या विमानांमध्ये विमान कंपनी लांबचा प्रवास करते अशी तक्रार करण्यात आली होती.
दरम्यान, याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाने भाड्याने घेतलेल्या B777 विमानात रासायनिक ऑक्सिजन निर्मिती प्रणाली आहे. परंतू, ही सुमारे 12 मिनिटे टिकते. त्यामुळं सॅन फ्रान्सिस्कोला आणि तेथून एअरलाइनच्या थेट उड्डाणांमध्ये हे वापरले जात नाही. नुकतीच देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला 1.20 कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. एका कंपनीच्या फ्लाइटचे प्रवासी धावपट्टीवर आले आणि तिथेच जेवण करायला लागले. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
एअर इंडिया ही भारत देशाची प्रमुख राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी
एअर इंडिया ही भारत देशाची प्रमुख राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी आहे. इंडिगो व जेट एअरवेज खालोखाल एर इंडिया भारतामधील तिसऱ्या क्रमांकाची मोठी विमानकंपनी असून ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. एर इंडियाचे भारतातील चारही महानगरांमध्ये हब असून इतर अनेक शहरांमध्ये देखील मोठे तळ आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
Flight Offers : फक्त 1799 रुपयांत विमान प्रवास, एअर इंडियाकडून फ्लाईट तिकीटवर भन्नाट ऑफर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)