By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 27 Aug 2022 05:19 PM (IST)
Edited By: धनाजी सुर्वे
Bajaj Finance
Bajaj Finance Share : बजाज फायनान्सने (Bajaj Finance) त्यांच्या एफडीचे (FD) दर वाढवले आहेत. बजाज फायनान्सने (Bajaj Finance) फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) रेटमध्ये 15 बीपीएसने वाढ केली आहे. 15 हजार रूपये ते 5 कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवींवर वाढीव दर लागू होतील.
आरबीआयकडून रेपो रेटमध्ये (Rbi repo rate) 3 वेळा वाढ
भारतीय रिझर्व्ह बँकेने (Rbi ) मे महिन्यापासून जवळपास तीन वेळा रेपो (repo rate) दर 1.40 टक्क्यांनी वाढवून 5.40 टक्के वाढवला आहे. त्यानंतर सर्व बँकांनी ठेवींच्या दरात वाढ केली आहे.
असा मिळणार परतावा
12 ते 23 महिन्यांच्या ठेवींवरील व्याजदर 6.20 टक्क्यांवरून 6.35 टक्के वार्षिक करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडीचा व्याजदर 6.45 टक्क्यांवरून 6.60 टक्के झाला आहे. तुम्हाला 22 महिन्यांसाठी FD वर 6.80 टक्के व्याजदर मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना 7.05 टक्के व्याजदराचा लाभ मिळणार आहे.
12 ते 60 महिन्यांच्या मुदतीसाठी तुमच्या एफडीचे नूतनीकरण करून प्रती वर्ष 7.75 टक्के पर्यंतचा परतावा मिळवता येतो.
सिस्टमॅटिक डिपॉझीट प्लानसह छोटी मासिक गुंतवणूक सुविधा ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रती वर्ष 0.25 टक्के एवढा दर आहे. 5,00,000 रुपयांची गुंतवणूक करून काढलेल्या एफडीवर ज्येष्ठ नागरिक आणि 60 वर्षांखालील नागरिकांना चांगला परतावा मिळणार आहे.
जाणून घ्या FD ची महत्वाची वैशिष्ट्ये
महत्वाच्या बातम्या
इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपत्कालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड
1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत
बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे
Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य