एक्स्प्लोर

आता रेपो दर वाढवणे आरबीआयला सोपे नाही! वाढविल्यास अर्थव्यवस्था डळमळीत होऊ शकते

RBI Repo Rate: ऑगस्टमधील किरकोळ महागाईचे आकडे निराशाजनक होते. किरकोळ महागाई दर पुन्हा एकदा 7 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो जुलैमध्ये 6.7 टक्क्यांवर घसरला होता.

RBI Repo Rate: ऑगस्टमधील किरकोळ महागाईचे आकडे निराशाजनक होते. किरकोळ महागाई दर पुन्हा एकदा 7 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो जुलैमध्ये 6.7 टक्क्यांवर घसरला होता. रिझव्‍‌र्ह बँकेकडून रेपो रेट आणखी वाढू शकतो, असा अंदाज अर्थतज्ज्ञ आधीच बांधत होते. आता या आकड्यांमुळे ही भीती आणखी बळकट झाली आहे. अर्थतज्ज्ञांचा असा विश्वास आहे की आरबीआयच्या पुढील चलनविषयक धोरण समिती (एमपीसी) बैठकीत, धोरण दर 50 बेस पॉइंट्स किंवा 0.50 टक्क्यांनी वाढवले जाऊ शकतात.

सध्या रेपो दर 5.45 टक्क्यांच्या पातळीवर आहे. हे प्री-कोविड-19 पातळीच्या बरोबरीने आहे. आता आरबीआयने हा मार्ग अवलंबला तर या वर्षाच्या अखेरीस रेपो दर 6 टक्क्यांवर पोहोचेल. याचा परिणाम असा होईल की बँकांना आरबीआयकडून आणि तुमच्याकडून बँकांकडून कर्ज घेणे महागडे होईल. त्यामुळे आर्थिक विकासाला फटका बसेल.

अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम 

“रेपो दरात वाढ केल्यास कर्ज महाग होईल. वसुलीच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्या महागड्या कर्जांमुळे गुंतवणुकीवर परिणाम होईल.” असं बँक ऑफ बडोदाच्या अर्थतज्ज्ञ जान्हवी प्रभाकर यांनी व्यक्त केलं आहे. तर   व्याजदरात वाढ झाल्यामुळे उद्योगांना कर्ज मिळणे बंद होणार नाही याची काळजी आरबीआयने घ्यावी, असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आर्थिक वाढीला हानी नाही

2022-23 या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 7 टक्के दराने वाढण्याचा अंदाज आहे. मात्र, यासाठी आरबीआय आणि सरकारला शाश्वत विकासासाठी नियमित पावले उचलावी लागतील. एचडीएफसी अर्थशास्त्रज्ञ स्वाती अरोरा म्हणतात की सरकारने भांडवली खर्चावर (CAPEX) लक्ष केंद्रित केले पाहिजे जेणेकरून शाश्वत आणि जलद पुनर्प्राप्ती होऊ शकेल. आर्थिक सुधारणेवर पुढे जाण्यासाठी पुरवठा बाजू अबाधित ठेवणे आवश्यक आहे. आतापर्यंत पुरवठा साखळी चांगली चालली आहे पण त्याची काळजी न घेतल्यास आर्थिक विकासाच्या मार्गात अडथळा ठरू शकतो असं अर्थतज्ज्ञांचं मत आहे. 

आव्हानांचा सामना कसा करायचा?

कर्ज महाग होण्याची भीती असताना, कर्जदारांना त्याच्या पर्यायाचा विचार करावा लागेल.  ग्राहक ईसीबी आणि बाँड मार्केटकडे वळू शकतात असं जाणकारांना वाटतं. याशिवाय पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सरकारने तांदूळ आणि गव्हासह अनेक उत्पादनांच्या निर्यातीवर आधीच बंदी घातली आहे.

यामुळे आता आगामी चलनविषयक धोरणात काय नेमका निर्णय होतो आहे याकडे सर्वसामान्य माणसांचं लक्ष लागलं आहेच शिवाय जर मोठा निर्णय घेतला तर त्याचे अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम मात्र दूरगामी असणार आहेत. 

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीत मोठी भर, सोने आणि विदेशी गुंतवणुकीमुळं वर्षभरातच 20.6 टक्क्यांची वाढ
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीत मोठी भर, सोने आणि विदेशी गुंतवणुकीमुळं वर्षभरातच 20.6 टक्क्यांची वाढ
तुम्हाला माहीत आहे का की कमजोर रुपया तुमचा पोर्टफोलिओ परतावा कसा वाढवू शकतो?
तुम्हाला माहीत आहे का की कमजोर रुपया तुमचा पोर्टफोलिओ परतावा कसा वाढवू शकतो?
Loan vs Investment : कर्ज परतफेड करावी की गुंतवणुकीला प्राधान्य द्यावं? पगारादारांनी प्रथम कोणती गोष्ट करावी?
कर्ज परतफेड करावी की गुंतवणुकीला प्राधान्य द्यावं? पगारादारांनी प्रथम कोणती गोष्ट करावी?
Share Market : ट्रम्प यांच्या वेटिंगमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी स्वाहा
शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी स्वाहा

व्हिडीओ

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
Vaibhav Sooryavanshi IPL 2026 : IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
Lalit Modi on Sanjiv Goenka: 'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
Embed widget