एक्स्प्लोर

Indian Railway : लहान मुलांबाबतचा एक नियम बदलला, अन् रेल्वेने कमावले 2800 कोटी; काय आहे नियम?

Indian Railway Income : लहान मुलांबाबत असलेल्या एका नियमात बदल करून भारतीय रेल्वेने 2800 कोटी रुपये कमावले आहेत.

नवी दिल्ली मागील काही वर्षात भारतीय रेल्वेने (Indian Railway Income) उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळे मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये तिकीट दरवाढीपासून ते इतर उपाययोजनांचाही समावेश आहे. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या लहान मुलांसाठी असलेल्या एक नियमात बदल करून रेल्वेने चांगले उत्पन्न मिळवले आहे. मागील 7 वर्षात रेल्वेने 2800 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. माहिती अधिकारातंर्गत ही बाब समोर आली आहे. 

एका वृत्तसंकेत स्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, 'सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम'ने माहितीच्या अधिकाराखाली उत्तर दिले. फक्त 2022-23 या आर्थिक वर्षातच नियमांमधील बदलांमुळे रेल्वेला 560 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. लहान मुलांच्या प्रवास दराशी संबंधित नियमात बदल झाल्याने रेल्वेला फायदा झाला आहे. 

रेल्वेने केला होता हा बदल

31 मार्च 2016 रोजी भारतीय रेल्वेने पाच वर्ष ते 12 वर्षापर्यंतच्या बालक प्रवाशांना वेगळा बर्थ हवा असल्यास पूर्ण भाडे वसूल करण्याचा निर्णय घेतला होता. रेल्वेने हा नियम 21 एप्रिल 2016 पासून लागू केला. माहिती अधिकारातंर्गत मिळालेल्या माहितीनुसार, लहान मुलांशी संबंधित असलेल्या या नियमांमध्ये बदल केल्याने भारतीय रेल्वेने मागील सात वर्षात 2800 कोटींची कमाई केली आहे. 

पूर्वी नियम काय होता?

यापूर्वी रेल्वे 5 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना अर्धे भाडे आकारून आरक्षित बर्थ देत असे. दुसऱ्या पर्यायांतर्गत, जर मुलाने स्वतंत्र बर्थ घेण्याऐवजी सोबतच्या प्रौढ व्यक्तीच्या बर्थवर प्रवास केला, तर त्याला अर्धे भाडे द्यावे लागेल. CRIS ने 2016-17 ते 2022-23 या आर्थिक वर्षातील मुलांच्या दोन श्रेणींसाठी भाडे पर्यायांवर आधारित डेटा दिला आहे. CRIS ने आरटीआय अंतर्गत मागवलेल्या माहितीत म्हटले आहे की, गेल्या सात वर्षांत 3.6 कोटींहून अधिक मुलांनी आरक्षित सीट किंवा बर्थचा पर्याय न निवडता अर्धे भाडे देऊन प्रवास केला. दुसरीकडे, 10 कोटींहून अधिक मुलांनी स्वतंत्र बर्थ किंवा आसन निवडले आणि संपूर्ण भाडे दिले.

विनातिकीट प्रवाशांमुळे रेल्वेची बंपर कमाई

रेल्वेने 2022-23 मध्ये चुकीच्या तिकिटांसह किंवा विना तिकीट प्रवास करणाऱ्या 3.6 कोटी प्रवाशांना पकडले. वर्ष 2021-22 च्या तुलनेत अशा प्रवाशांची संख्या एक कोटींहून अधिक वाढली आहे. माहितीच्या अधिकाराखाली (RTI) मिळालेल्या उत्तरात ही माहिती समोर आली आहे. आरटीआयच्या उत्तरानुसार, 2019-2020 मध्ये 1.10 कोटी लोक विना तिकीट किंवा चुकीच्या तिकिटांसह प्रवास करताना पकडले गेले, तर 2021-22 मध्ये ही संख्या 2.7 कोटी आणि 2022-23 मध्ये 3.6 कोटी इतकी झाली. तर 2020-21 मध्ये कोविड-19 महासाथीच्या आजाराची लाट पसरली होती. त्या वर्षी हा आकडा 32.56 लाख होता. 

मध्य प्रदेशातील सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांच्या आरटीआय प्रश्नाच्या (RTI) उत्तरात, रेल्वेने गेल्या तीन वर्षांत अशा प्रवाशांकडून वसूल केलेल्या दंडाच्या रक्कमेची माहिती दिली आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने चुकीच्या तिकिटावर प्रवास करणाऱ्या, विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 152 कोटी रुपये, 2021-22 मध्ये 1,574.73 कोटी रुपये आणि 2022-23 मध्ये 2,260.05 कोटी रुपये दंड वसूल केला आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raju Shetti: ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
सांगोल्यात शहाजी बापूंची भाजपशी हातमिळवणी; नगरपालिकेच्या 2 जागा बिनविरोध, बापूंचा मावळला विरोध
सांगोल्यात शहाजी बापूंची भाजपशी हातमिळवणी; नगरपालिकेच्या 2 जागा बिनविरोध, बापूंचा मावळला विरोध
Ladki Bahin Yojana : सुनील प्रभूंनी लाडकी बहीणची जिल्हावार बोगस लाभार्थ्यांची आकडेवारी वाचून दाखवली, आदिती तटकरे उत्तर देत म्हणाल्या...
लाडकी बहीण योजनेच्या किती महिलांनी ई- केवायसी पूर्ण केली? आदिती तटकरेंनी उत्तर देताना आकडेवारी सांगितली
Delhi High Court on Indigo Crisis: इंडिगो अपयशी होताच सरकारने काय केलं? 4 ते 5 हजारांचे तिकीट 30 हजार कसं झालं? तुमच्यामुळेच ही वेळ आली; हायकोर्टाकडून केंद्र सरकारची खरडपट्टी करत फटकार
इंडिगो अपयशी होताच सरकारने काय केलं? 4 ते 5 हजारांचे तिकीट 30 हजार कसं झालं? तुमच्यामुळेच ही वेळ आली; हायकोर्टाकडून केंद्र सरकारची खरडपट्टी करत फटकार

व्हिडीओ

Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप
Krishna Khopde BJP : Tukaram Mundhe विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti: ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
सांगोल्यात शहाजी बापूंची भाजपशी हातमिळवणी; नगरपालिकेच्या 2 जागा बिनविरोध, बापूंचा मावळला विरोध
सांगोल्यात शहाजी बापूंची भाजपशी हातमिळवणी; नगरपालिकेच्या 2 जागा बिनविरोध, बापूंचा मावळला विरोध
Ladki Bahin Yojana : सुनील प्रभूंनी लाडकी बहीणची जिल्हावार बोगस लाभार्थ्यांची आकडेवारी वाचून दाखवली, आदिती तटकरे उत्तर देत म्हणाल्या...
लाडकी बहीण योजनेच्या किती महिलांनी ई- केवायसी पूर्ण केली? आदिती तटकरेंनी उत्तर देताना आकडेवारी सांगितली
Delhi High Court on Indigo Crisis: इंडिगो अपयशी होताच सरकारने काय केलं? 4 ते 5 हजारांचे तिकीट 30 हजार कसं झालं? तुमच्यामुळेच ही वेळ आली; हायकोर्टाकडून केंद्र सरकारची खरडपट्टी करत फटकार
इंडिगो अपयशी होताच सरकारने काय केलं? 4 ते 5 हजारांचे तिकीट 30 हजार कसं झालं? तुमच्यामुळेच ही वेळ आली; हायकोर्टाकडून केंद्र सरकारची खरडपट्टी करत फटकार
लाचखोर तहसीलदारास रंगेहात अटक; शेतकऱ्याकडून अडीच लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
लाचखोर तहसीलदारास रंगेहात अटक; शेतकऱ्याकडून अडीच लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
Navi Mumbai foreigner died: मित्राच्या लग्नासाठी नवी मुंबईत आलेल्या स्वीडनच्या तरुणाचा सानपाड्यात संशयास्पद मृत्यू, नेमकं काय घडलं?
मित्राच्या लग्नासाठी नवी मुंबईत आलेल्या स्वीडनच्या तरुणाचा सानपाड्यात संशयास्पद मृत्यू, नेमकं काय घडलं?
Video: लाडकी बहीण योजना आणणारे 1 नंबरवरुन 2 वर गेले; विधानसभेत जयंत पाटील अन् शंभुराज देसाईंची जुगलबंदी
Video: लाडकी बहीण योजना आणणारे 1 नंबरवरुन 2 वर गेले; विधानसभेत जयंत पाटील अन् शंभुराज देसाईंची जुगलबंदी
Devendra Fadnavis On E-Challan: गाडीचे चलान न भरणाऱ्यांना पेट्रोल-डिझेल देऊ नका; मनीषा कायंदेंची मागणी, देवेंद्र फडणवीसांनी घोषणा करुन टाकली, सभागृहात काय घडलं?
गाडीचे चलान न भरणाऱ्यांना पेट्रोल-डिझेल देऊ नका; मनीषा कायंदेंची मागणी, देवेंद्र फडणवीसांनी घोषणा करुन टाकली, सभागृहात काय घडलं?
Embed widget