एक्स्प्लोर

Indian IT Industry: मंदीचा परिणाम! नव्या आर्थिक वर्षात आयटी क्षेत्रात 40 टक्के नोकऱ्यांची घट?

Indian IT Industry:  यंदाच्या आर्थिक वर्षात आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नोकरकपात होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Indian IT Industry:  जागतिक मंदीचा सर्वाधिक परिणाम आयटी क्षेत्रावर दिसून येत आहे. भारतासह जगभरात मोठ्या प्रमाणावर आयटी कंपन्यांमध्ये नोकर कपात केली जात आहे. यामध्ये अनेक भारतीय कंपन्यांचाही समावेश आहे. आर्थिक मंदीच्या सावटामुळे सुरू असलेल्या नोकरकपातीचा परिणाम कॅम्पस हायरिंगवर दिसून येत आहे. 

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आयटी सेक्टरमधील 40 टक्क्यांपर्यंत नोकऱ्यांची घट होण्याची शक्यता आहे. 'इकॉनॉमिक टाईम्स'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. TeamLease च्या डेटाच्या आधारे हे वृत्त देण्यात आले आहे. वर्ष  2023-24 या आर्थिक वर्षात भारतीय आयटी कंपन्या 40 टक्क्यांपर्यंत कमी भरती करू शकतात, असे TeamLease च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

वर्ष 2023-24 मध्ये नोकर भरतीमध्ये घट होण्याचा अंदाज

TeamLease डेटानुसार, 2023 आर्थिक वर्षात, IT कंपन्यांनी एकूण 2.8 लाख लोकांची भरती केली आहे. त्याचबरोबर पुढील वर्षापर्यंत त्यात सुमारे 30 ते 40 टक्क्यांची मोठी घट नोंदवली जाऊ शकते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे येत्या काही दिवसांत कंपन्यांचा ग्रोथ रेट कमी होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम क्षेत्रातील नोकरभरतीवर दिसून येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नोकरीत घट का होऊ शकते?

विशेष म्हणजे, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रासाठी मागील एक वर्ष चांगले राहिले नाही. आयटी कंपन्यांच्या नफ्यात मोठी घट झाली आहे. एकीकडे रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक आव्हाने वाढली आहेत, तर दुसरीकडे अमेरिका आणि युरोपमधील बँकिंग संकटामुळे अडचणी अनेक पटींनी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत बदलती जागतिक परिस्थिती पाहता भारतीय आयटी कंपन्यांना कमीत कमी पैसा खर्च करायचा आहे. अशा परिस्थितीत त्याचा खर्च कमी करण्यासाठी नवीन भरती कमी करू शकते.

तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वाधिक नोकरकपात

'ब्लूमबर्ग'च्या अहवालानुसार, अमेरिकेच्या आयटी सेक्टरमध्ये या वर्षी एकूण 3 लाखांहून अधिक लोकांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. layoffs.fyi. च्या माहितीनुसार, जानेवारी ते मार्च 2023 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, 500 हून अधिक आयटी कंपन्यांनी 1.5 लाखांहून अधिक लोकांना कामावरून काढून टाकले आहे. 

गेल्या काही महिन्यांत मोठ्या कंपन्यांमध्ये झालेल्या नोकरकपातीमुळे भारतातील किमान 36,400  बेरोजगार झाले आहेत. दुसरीकडे, 2022 मध्ये एकूण 1.6 लाख लोकांना टेक कंपन्यांमधून काढून टाकण्यात आले. यामध्ये ट्विटर, मेटा, अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आदी मोठ्या कंपन्यांच्या नावांचा समावेश आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ice Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP MajhaManoj jarange Patil On Maratha : 13 तारखेपर्यंत थांबा! मराठा समाज बघतोय कोण येतं? कोण नाही? - पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Kolhapur Viral Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Embed widget