एक्स्प्लोर

आतापर्यंत देशात किती अर्थसंकल्प सादर? मोदी सरकारमध्ये अर्थसंकल्प सादर करणारे मंत्री कोणते?

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत देशात एकूण 91 अर्थसंकल्प सादर करण्यात आले. दरम्यान, मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाचा आतापर्यंतचा प्रवास तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

Budget 2024 : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Minister Nirmala Sitharaman) या 1 फेब्रुवारी 2024 रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून विविध स्तरातील लोकांना मोठ्या अपेक्षा आहेत. मोदी सरकारचा हा अंतरीम अर्थसंकल्प असणार आहे. कारण यानंतर देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यापुढचा पूर्ण अर्थसंकल्प हा नवीन सरकार मांडणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत देशात एकूण 91 अर्थसंकल्प सादर करण्यात आले आहेत. दरम्यान, मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाचा आतापर्यंतचा प्रवास तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

मोदी सरकारमध्ये अर्थसंकल्प सादर करणारे मंत्री कोणते?

1 फेब्रुवारी 2024 ला अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आपला सहावा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. स्वातंत्र्यानंतर दरवर्षी अर्थसंकल्प सादर केला जात आहे. 2014 मध्ये केंद्रात मोदी सरकार स्थापन झाल्यापासून आतापर्यंत एकूण तीन अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देशाचे आर्थिक चित्र मांडले आहे. 2014 मध्ये केंद्रात मोदी सरकार स्थापन झाल्यापासून आतापर्यंत एकूण 11 अर्थसंकल्प सादर करण्यात आले आहेत. 1 फेब्रुवारी 2024 रोजी मोदी सरकारचा हा 12वा अर्थसंकल्प असणार आहे. त्यापैकी 10 सर्वसाधारण आणि 2 अंतरिम अर्थसंकल्प असून त्यात 2024 च्या अर्थसंकल्पाचा समावेश आहे. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात 2014 ते 2018 दरम्यान तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 5 अर्थसंकल्प सादर केले. 2019 चा अंतरिम अर्थसंकल्प पियुष गोयल यांनी सादर केला. तर विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2019 ते 2023 या कालावधीत 5 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. दरम्यान, 1 फेब्रुवारी 2024 रोजी सादर होणारा अर्थसंकल्प हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा सहावा अर्थसंकल्प असणार आहे. तो अंतरिम अर्थसंकल्प असेल.

स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत किती अर्थसंकल्प सादर? 

भारताच्या स्वातंत्र्यापासून आतापर्यंत देशात एकूण 91 अर्थसंकल्प सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी सर्वसाधारण अर्थसंकल्पांची संख्या 77 असून, 14 अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आले आहेत. 1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प (अंतरिम अर्थसंकल्प 2024) हा देशाचा 92 वा अर्थसंकल्प असेल. विशेष बाब म्हणजे 17व्या लोकसभेचा हा शेवटचा अर्थसंकल्प असून संसदेचे हे विशेष अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2024 या कालावधीत चालणार आहे.

पुढच्या दोन आठवड्यानंतर संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर होणार आहे. बजेटमध्ये विविध घोषणा केल्या जाऊ शकतात. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 1 फेब्रुवारी रोजी सलग सहावा अर्थसंकल्प सादर करतील, तेव्हा महागाई नियंत्रणात ठेवताना उपभोग आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करतील अशी अपेक्षा आहे. उपभोग वाढवण्याचा एक मार्ग म्हणजे लोकांच्या हातात अधिक पैसे मिळवणे. स्टँडर्ड डिडक्शनची व्याप्ती वाढवून किंवा टॅक्स स्लॅब बदलून कर ओझे कमी करण्याचा दुसरा मार्ग असू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या:

Budget Expectations : सर्वसामान्यांच्या हातात येणार अधिक पैसा? अर्थसंकल्पात काय होणार घोषणा? 

महत्त्वाच्या बातम्या

फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget