एक्स्प्लोर

एका शेतकऱ्याचा निर्णय गावासाठी वरदान, मिरचीनं संपूर्ण गाव केलं श्रीमंत, कोट्यावधी रुपयांची उलाढाल 

Chilli Production : आज आपण अशाच एका गावची यशोगाथा पाहणार आहोत, ज्या गावाला मिरचीनं श्रीमंत केलं आहे.

Chilli Production : अलिकडच्या काळात शेती नवनवीन प्रयोग होत आहेत. या माध्यमातून शेतकरी भरघोस उत्पादन घेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आज आपण अशाच एका गावची यशोगाथा पाहणार आहोत, ज्या गावाला मिरचीनं श्रीमंत केलं आहे. 10 वर्षापूर्वी राजस्थानमधील एका गावातील एका शेतकऱ्याने मिरची लागवड करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय या गावातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे. आज हे संपूर्ण गाव मिरचीच्या उत्पादनातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल करत आहे. 

शेतकऱ्यांच्या जीवनात मिरचीच्या उत्पादनातून भरभराटी

राजस्थानमधील भरतपूरमधील रुपवास शहराच्या बुराना या छोट्याशा गावातील शेतकऱ्यांच्या जीवनात मिरचीच्या उत्पादनातून भरभराटी आणली आहे. मिरचीमुळं या गावातील अनेक शेतकऱ्यांचे स्थलांतर थांबलं आहे.  बुराना गावात पूर्वी गहू-मोहरीची शेती पारंपारिकपणे केली जात होती, त्यामुळे शेतकऱ्यांना नफा कमी आणि बचतही कमी होत असे. अशा परिस्थितीत गावातील शेतकरी कुटुंबे शेती सोडून मोलमजुरी करून उदरनिर्वाहासाठी शहरांकडे स्थलांतर जात होती. मात्र सुमारे 10 वर्षांपूर्वी एका शेतकऱ्याने उचललेले पाऊल या गावासाठी वरदान ठरले आहे. आता संपूर्ण गावात हंगामात 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मिरचीचे उत्पादन होते. 

मिरचीला जयपूर, आग्रा आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये मोठी मागणी

एका शेतकऱ्याने 10 वर्षांपूर्वी आपल्या गावात मिरचीची लागवड केली होती. त्याला या पिकातून चांगला नफा मिळाला. त्यानंतर गावातील इतर शेतकऱ्यांना कळताच त्यांनीही मिरचीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. आता गावातील 80 टक्क्यांहून अधिक शेतकरी मिरचीची लागवड करतात. जवळपास सर्वच मिरचीचे शेतकरी करोडपती आहेत. आज बुराना गावातील मिरचीला जयपूर, आग्रा आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये मोठी मागणी आहे. या मिरचीच्या विक्रीतून या गावातील सर्व शेतकऱ्यांनी मोठं उत्पादन घेत नफा मिळवला आहे. त्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी आली आहे.

 गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात वाढ

बुराना येथील शेतकरी लहान ईगल मिरचीची लागवड करतात. ही मिरची चवीला खूप तिखट असते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात वाढ झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पूर्वी शेतकरी गहू आणि मोहरीची लागवड करत असे, त्यातून फारसा नफा मिळत नसे. काही वर्षांपासून करत असलेल्या हिरव्या मिरचीच्या लागवडीतून शेतकऱ्यांना मोठा नफा मिळत आहे. संपूर्ण हंगामात मिरची सुमारे 5 वेळा काढतात. या पिकासाठी 30 ते 35 अंश सेल्सिअस तापमानात आवश्यक असते. सुमारे 50 दिवसांत मिरचीचे उत्पादन होते. .

महत्त्वाच्या बातम्या

Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Embed widget