एक्स्प्लोर

एका शेतकऱ्याचा निर्णय गावासाठी वरदान, मिरचीनं संपूर्ण गाव केलं श्रीमंत, कोट्यावधी रुपयांची उलाढाल 

Chilli Production : आज आपण अशाच एका गावची यशोगाथा पाहणार आहोत, ज्या गावाला मिरचीनं श्रीमंत केलं आहे.

Chilli Production : अलिकडच्या काळात शेती नवनवीन प्रयोग होत आहेत. या माध्यमातून शेतकरी भरघोस उत्पादन घेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आज आपण अशाच एका गावची यशोगाथा पाहणार आहोत, ज्या गावाला मिरचीनं श्रीमंत केलं आहे. 10 वर्षापूर्वी राजस्थानमधील एका गावातील एका शेतकऱ्याने मिरची लागवड करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय या गावातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे. आज हे संपूर्ण गाव मिरचीच्या उत्पादनातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल करत आहे. 

शेतकऱ्यांच्या जीवनात मिरचीच्या उत्पादनातून भरभराटी

राजस्थानमधील भरतपूरमधील रुपवास शहराच्या बुराना या छोट्याशा गावातील शेतकऱ्यांच्या जीवनात मिरचीच्या उत्पादनातून भरभराटी आणली आहे. मिरचीमुळं या गावातील अनेक शेतकऱ्यांचे स्थलांतर थांबलं आहे.  बुराना गावात पूर्वी गहू-मोहरीची शेती पारंपारिकपणे केली जात होती, त्यामुळे शेतकऱ्यांना नफा कमी आणि बचतही कमी होत असे. अशा परिस्थितीत गावातील शेतकरी कुटुंबे शेती सोडून मोलमजुरी करून उदरनिर्वाहासाठी शहरांकडे स्थलांतर जात होती. मात्र सुमारे 10 वर्षांपूर्वी एका शेतकऱ्याने उचललेले पाऊल या गावासाठी वरदान ठरले आहे. आता संपूर्ण गावात हंगामात 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मिरचीचे उत्पादन होते. 

मिरचीला जयपूर, आग्रा आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये मोठी मागणी

एका शेतकऱ्याने 10 वर्षांपूर्वी आपल्या गावात मिरचीची लागवड केली होती. त्याला या पिकातून चांगला नफा मिळाला. त्यानंतर गावातील इतर शेतकऱ्यांना कळताच त्यांनीही मिरचीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. आता गावातील 80 टक्क्यांहून अधिक शेतकरी मिरचीची लागवड करतात. जवळपास सर्वच मिरचीचे शेतकरी करोडपती आहेत. आज बुराना गावातील मिरचीला जयपूर, आग्रा आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये मोठी मागणी आहे. या मिरचीच्या विक्रीतून या गावातील सर्व शेतकऱ्यांनी मोठं उत्पादन घेत नफा मिळवला आहे. त्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी आली आहे.

 गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात वाढ

बुराना येथील शेतकरी लहान ईगल मिरचीची लागवड करतात. ही मिरची चवीला खूप तिखट असते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात वाढ झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पूर्वी शेतकरी गहू आणि मोहरीची लागवड करत असे, त्यातून फारसा नफा मिळत नसे. काही वर्षांपासून करत असलेल्या हिरव्या मिरचीच्या लागवडीतून शेतकऱ्यांना मोठा नफा मिळत आहे. संपूर्ण हंगामात मिरची सुमारे 5 वेळा काढतात. या पिकासाठी 30 ते 35 अंश सेल्सिअस तापमानात आवश्यक असते. सुमारे 50 दिवसांत मिरचीचे उत्पादन होते. .

महत्त्वाच्या बातम्या

सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
Devendra Fadnavis Karj Mafi : कर्जमाफीसाठी 5029 कोटी वर्ग, 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; प्रोत्साहनपर रकमेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य
6.22 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये 5029 कोटी रुपये जमा, मुख्यमंत्र्यांकडून प्रोत्साहनपर रकमेबाबत महत्त्वाची अपडेट
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती

व्हिडीओ

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Embed widget