एक्स्प्लोर

एका शेतकऱ्याचा निर्णय गावासाठी वरदान, मिरचीनं संपूर्ण गाव केलं श्रीमंत, कोट्यावधी रुपयांची उलाढाल 

Chilli Production : आज आपण अशाच एका गावची यशोगाथा पाहणार आहोत, ज्या गावाला मिरचीनं श्रीमंत केलं आहे.

Chilli Production : अलिकडच्या काळात शेती नवनवीन प्रयोग होत आहेत. या माध्यमातून शेतकरी भरघोस उत्पादन घेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आज आपण अशाच एका गावची यशोगाथा पाहणार आहोत, ज्या गावाला मिरचीनं श्रीमंत केलं आहे. 10 वर्षापूर्वी राजस्थानमधील एका गावातील एका शेतकऱ्याने मिरची लागवड करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय या गावातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे. आज हे संपूर्ण गाव मिरचीच्या उत्पादनातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल करत आहे. 

शेतकऱ्यांच्या जीवनात मिरचीच्या उत्पादनातून भरभराटी

राजस्थानमधील भरतपूरमधील रुपवास शहराच्या बुराना या छोट्याशा गावातील शेतकऱ्यांच्या जीवनात मिरचीच्या उत्पादनातून भरभराटी आणली आहे. मिरचीमुळं या गावातील अनेक शेतकऱ्यांचे स्थलांतर थांबलं आहे.  बुराना गावात पूर्वी गहू-मोहरीची शेती पारंपारिकपणे केली जात होती, त्यामुळे शेतकऱ्यांना नफा कमी आणि बचतही कमी होत असे. अशा परिस्थितीत गावातील शेतकरी कुटुंबे शेती सोडून मोलमजुरी करून उदरनिर्वाहासाठी शहरांकडे स्थलांतर जात होती. मात्र सुमारे 10 वर्षांपूर्वी एका शेतकऱ्याने उचललेले पाऊल या गावासाठी वरदान ठरले आहे. आता संपूर्ण गावात हंगामात 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मिरचीचे उत्पादन होते. 

मिरचीला जयपूर, आग्रा आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये मोठी मागणी

एका शेतकऱ्याने 10 वर्षांपूर्वी आपल्या गावात मिरचीची लागवड केली होती. त्याला या पिकातून चांगला नफा मिळाला. त्यानंतर गावातील इतर शेतकऱ्यांना कळताच त्यांनीही मिरचीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. आता गावातील 80 टक्क्यांहून अधिक शेतकरी मिरचीची लागवड करतात. जवळपास सर्वच मिरचीचे शेतकरी करोडपती आहेत. आज बुराना गावातील मिरचीला जयपूर, आग्रा आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये मोठी मागणी आहे. या मिरचीच्या विक्रीतून या गावातील सर्व शेतकऱ्यांनी मोठं उत्पादन घेत नफा मिळवला आहे. त्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी आली आहे.

 गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात वाढ

बुराना येथील शेतकरी लहान ईगल मिरचीची लागवड करतात. ही मिरची चवीला खूप तिखट असते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात वाढ झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पूर्वी शेतकरी गहू आणि मोहरीची लागवड करत असे, त्यातून फारसा नफा मिळत नसे. काही वर्षांपासून करत असलेल्या हिरव्या मिरचीच्या लागवडीतून शेतकऱ्यांना मोठा नफा मिळत आहे. संपूर्ण हंगामात मिरची सुमारे 5 वेळा काढतात. या पिकासाठी 30 ते 35 अंश सेल्सिअस तापमानात आवश्यक असते. सुमारे 50 दिवसांत मिरचीचे उत्पादन होते. .

महत्त्वाच्या बातम्या

Gold and Silver Rates: सोन्याच्या भावात चकाकी, चांदीही महागली; दर पुन्हा गडाडले, आजचा 24 कॅरेट 1 तोळे सोन्याचा दर किती?
सोन्याच्या भावात चकाकी, चांदीही महागली; दर पुन्हा गडाडले, आजचा 24 कॅरेट 1 तोळे सोन्याचा दर किती?
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळवायचे असतील तर आधी 'ही' तीन कामे करा, अन्यथा...
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळवायचे असतील तर आधी 'ही' तीन कामे करा, अन्यथा...
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? श्रावण महिन्यात दरात घसरण होणार की वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? श्रावण महिन्यात दरात घसरण होणार की वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
Cockroach Janata Party: तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
Rohit Pawar: MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
Embed widget