एक्स्प्लोर

ऑगस्टमध्ये BSNL ची 4 जी सेवा देशभरात चालू होणार, कंपनीकडून युद्धपातळीवर तयारी!

बीएसएनएल ही संस्था लवकरच संपूर्ण देशात 4 जी सेवा चालू करणार आहे. त्यासाठी या संस्थेकडून तयारी चालू आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या ऑगस्ट महिन्यात ही सेवा देशभरात चालू होईल, अशी शक्यता आहे.

मुंबई : केंद्र सरकारची दूरसंचार कंपीनी बीएसएनएल (BSNL) या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यापासून देशभरात 4 जी सेवा लागू करणार आहे. ही सेवा चालू करण्यासाठीची संपूर्ण यंत्रणा ही भारतीय बनावटीची असणार आहे. बीएसएनलच्या सूत्रांनी तशी माहिती दिली आहे. येत्या ऑगस्टपासून बीएसएनएल 40-45 मेगाबाईट प्रति सेकंद (एमबीपीएस) या वेगाने ही सेवा देणार असल्याचे म्हटले जात आहे.  

लवकरच देशभरात 4 जी सेवा 

बीएसएनएलने माहिती तंत्रज्ञान कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि दूरसंचार संशोधन संस्था C-DOT यांच्या सहकार्याने 4 जी सेवेसाठी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले आहे. याच तंत्रज्ञानाचा वापर बीएसएनएलकडून केला जाणार आहे. बीएसएनएलने याआधी पंजाबमध्ये 4 जी सेवा चालू केलेली आहे. या सेवेच्या माध्यमातून बीएसएनएलने तेथे साधारण आठ लाख ग्राहक जोडलेले आहेत.

बीएसएनएलकडून देशभरात टॉवर लावण्याचे काम 

बीएसएनएल कंपनीकडून सध्या संपूर्ण देशात 4 जी, 5 जी सेवा देण्यासाठी 1.12 लाख टॉवर लावण्याचे काम केले जात आहे.  या कंपनीने 4 जी सेवा देण्यासाठी आतापर्यंत 9,000 पेक्षा अधिक टॉवर्सची स्थापना केलेली आहे. यातील 6,000 पेक्षा अधिक टॉवर हे पंजाब, हिमाचल प्रदेश, पश्चिमी उत्तर प्रदेश, हरियाणा या राज्यांत आहेत. गेल्या चार ते पाच वर्षांपासून बीएसएनएल ही कंपनी 4 जी सेवा देऊ शकणारेच सीमकार्ड विकत आहे. 

प्रतिस्पर्ध्यांशी करावा लागणार सामना

भारतातील टेलिकॉम क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे. यात रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया यासारख्या दिग्गज कंपन्या एकमेकांसमोर उभ्या असतात. या खासगी कंपन्या आधीपासूनच 4जी आणि 5 जी सेवा देत आहेत. त्यामुळे आपल्या प्रतिस्पर्ध्यांना तोंड देण्यासाठी बीएसएनएलला मोठ मेहनत घ्यावी लागणार आहे.  

4 जी सेवेला एवढा उशीर का?

दरम्यान, सध्या देशातील जवळपास सर्वच भागांत 5 जी सेवा चालू झाली आहे. असे असतना बीएसएनएलने हे तंत्रज्ञान आत्मसात का केले नाही. 4 जी सेवा सुरु करायलाच बीएसएनएलला एवढा उशीर का झाला? असे प्रश्न विचारले जात आहेत. याला काही कारणं आहेत. बीएसएनएल कंपनीकडे 2जी आणि 3जी नेटवर्कसाठी लागणारे तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाला 4 जी तंत्रज्ञानात अपग्रेड करणे ही वेळखाऊ आणि किचकट प्रक्रिया आहे. बीएसएनएलकडे पुरेसे 4 जी स्पेक्ट्रम नाही. त्यामुळे बीएसएनएलला त्यांची सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यात अडचणी येतात. बीएसएनएलकडे  हे 4 जी तंत्रज्ञान कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान नाही. त्यामुळेही बीएसएनएलला हे तंत्रज्ञान स्वीकारायला वेळ लागला आहे. 

हेही वाचा :

'या' पाच शेअर्सचा विषय खोल, पैसे गुंतवल्यास मिळू शकतात तब्बल 'इतके' टक्के रिटर्न्स!

निवडणूक संपताच सामान्यांच्या खिशाला बसणार झळ? मोबाईलचा डेटा पॅक महागणार?

जगातील कोणत्या देशाकडे आहे सर्वाधिक सोनं, भारताच्या सरकारी खजान्यात किती टन सोनं?

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Price Today: युद्धज्वर शिगेला, सराफा बाजारात सोने- चांदीच्या दरवाढीला मात्र ब्रेक; जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
युद्धज्वर शिगेला, सराफा बाजारात सोने- चांदीच्या दरवाढीला मात्र ब्रेक; जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
Iran America war unemployment: आखाती देशांमधील हजारो भारतीय कामगारांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार, घरी परतण्यासाठी विमानाचे पैसेही नाहीत
आखाती देशांमधील हजारो भारतीय कामगारांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार, घरी परतण्यासाठी विमानाचे पैसेही नाहीत
Gold Silver Price Today: आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
Mhada : मुंबईच्या नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील 864 सदनिकांचं वितरण 16 मार्चला, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा
मुंबईच्या नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 864 सदनिकांचं वितरण 16 मार्चला, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
Mira Bhayander Hospital News: आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील हादरवणारी घटना
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Embed widget