एक्स्प्लोर

आता बँकेचे व्यवहार करताना फ्रॉड होणार नाही, बँकेच्या नव्या 'सिस्टिम'मुळे येणार नवी क्रांती!

सध्या बँकेचे व्यवहार ऑनलाईन पद्धतीने करण्याचे प्रमाण वाढले आहे. पण या व्यवहारादरम्यान फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

मुंबई : सध्या ऑनालाईन पद्धतीने बँकेचे व्यवहार करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. यूपीआय, नेट बँकिंग आदी माध्यमातून आता अनेकजण पैशांची देवाणघेवाण करतात. दरम्यान, ऑनलाईन पद्धतीने व्यवहार वाढल्यामुळे फसवणुकीच्या प्रकारातही वाढ झाली आहे. त्यामुळे सायबर क्राईम रोखण्यासाठी बँका योग्य ती खबरदारी घेत असतात. मात्र तरीदेखील आता ग्राहकांची ऑनलाईन पद्धतीने केली जाणारी आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी  बँकांनी आता विशेष इंटेलिजन्स सिक्योरिटी सिस्टीम तयार केली आहे. या प्रणालीच्या मदतीने ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

इंटेलिजन्स सिक्योरिटी सिस्टीमची निर्मिती

ऑनलाईन व्यवहार करताना बँकेच्या ग्राहकांना अनेक मार्गांनी लुटले जाते. खोटा इमेल, बनावट संकेतस्थळ, बनावट मेसेज या माध्यमातून लोकांची लूट होते. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच बँकांनी इंटेलिजन्स सिक्योरिटी सिस्टीम तयार केली आहे. कोणत्याही ग्राहकाचे एखाद्या संशयास्पद बँक खात्याशी व्यवहार होत असल्याचे दिसल्यावर या सिस्टिमद्वारे ग्राहकांना अलर्ट पाठवले जाईल. व्यवहार पूर्ण होण्याआधीच या सिस्टिमद्वारे ग्राहकांना तसे संदेश पाठवले जातील. 

अशा पद्धतीने काम करणार इंटेलिजन्स सिस्टिम

बँकांकडून एक क्रेडिट इंटेलिजन्स सिक्योरिटी सिस्टीम तयार केली जात आहे. या सिस्टिमच्या मदतीने ऑनलाईन पद्धतीने केल्या जाणाऱ्या संशयास्पद व्यवहाराची संपूर्ण माहिती बँकांना मिळणार आहे. तुमच्याशी संबंधित कोणतेही संशयास्पद व्यवहार दिसून आल्यास, तसा तुम्हाला अलर्ट पाठवला जाईल. तसेच त्या आर्थिक व्यवहारासंदर्भात तुमच्याकडून कन्फॉर्मेशन न मिळाल्यास तो संबंधित व्यवहार रद्द केला जाईल. एचडीएफसी बँकेकडून यूपीआय, नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, क्रेडिट आणि डेबिट कार्ड आदी व्यवहारांना ही सिस्टीम लागू केली जाणार आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या प्रवक्त्यांनीही या अत्याधुनिक प्रणालीविषयी प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या ग्राहकाच्या बँक खात्यावर संशयास्पद व्यवहार केला जात असल्याचे आमच्या निदर्शनास आल्यास आम्ही त्यांना रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर कॉल केला जाईल. त्यानंतर संबंधित व्यवहाराचे कन्फर्मेशन न मिळाल्यास तो व्यवहार रद्द केला जाईल. 

अशा प्रकारे शोधणार संशयास्पद व्यवहार

संशयास्पद व्यवहार रोखण्यासाठी बँकांनी एका अॅनालिटिक्स टीमची स्थापना केलेली आहे. संशयास्पद व्यहारांचा शोध घेणे तसेच त्यांना रोखणे हे या टीमचे काम आहे. या टीमकडून कधीकधी सामान्य व्यवहारांनाही संशयास्पद व्यवहार म्हणून गृहित धरले जाऊ शकते. अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करणारी एचडीएफसी ही पहिली बँक ठरली आहे.  

हेही वाचा :

HDFC बँकेचा SMS अलर्टच्या सुविधेबाबत मोठा निर्णय; नवा नियम 25 जूनपासून लागू!

निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजारात नेमकं काय घडणार? जाणून घ्या मार्केटचा 20 वर्षांचा इतिहास!  

 

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Russian Crude Oil :  मध्य पूर्वेत तणाव वाढला, भारतानं घेतला मोठा निर्णय, रशियाकडून तब्बल 49 हजार कोटी रुपयांच्या तेलाची आयात 
Russian Crude Oil :  मध्य पूर्वेत तणाव वाढला, भारतानं घेतला मोठा निर्णय, रशियाकडून तब्बल 49 हजार कोटी रुपयांच्या तेलाची आयात 
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पुढील आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पुढील आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Vidyadhar Joshi: Old Monk अचानक बाजारातून गायब, मराठी अभिनेत्यासह सोशल मीडियावर अनेकांचे सवाल, नेमकं कारण काय?
Old Monk अचानक बाजारातून गायब, मराठी अभिनेत्यासह सोशल मीडियावर अनेकांचे सवाल, नेमकं कारण काय?
Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 
Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget