एक्स्प्लोर

आता बँकेचे व्यवहार करताना फ्रॉड होणार नाही, बँकेच्या नव्या 'सिस्टिम'मुळे येणार नवी क्रांती!

सध्या बँकेचे व्यवहार ऑनलाईन पद्धतीने करण्याचे प्रमाण वाढले आहे. पण या व्यवहारादरम्यान फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

मुंबई : सध्या ऑनालाईन पद्धतीने बँकेचे व्यवहार करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. यूपीआय, नेट बँकिंग आदी माध्यमातून आता अनेकजण पैशांची देवाणघेवाण करतात. दरम्यान, ऑनलाईन पद्धतीने व्यवहार वाढल्यामुळे फसवणुकीच्या प्रकारातही वाढ झाली आहे. त्यामुळे सायबर क्राईम रोखण्यासाठी बँका योग्य ती खबरदारी घेत असतात. मात्र तरीदेखील आता ग्राहकांची ऑनलाईन पद्धतीने केली जाणारी आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी  बँकांनी आता विशेष इंटेलिजन्स सिक्योरिटी सिस्टीम तयार केली आहे. या प्रणालीच्या मदतीने ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

इंटेलिजन्स सिक्योरिटी सिस्टीमची निर्मिती

ऑनलाईन व्यवहार करताना बँकेच्या ग्राहकांना अनेक मार्गांनी लुटले जाते. खोटा इमेल, बनावट संकेतस्थळ, बनावट मेसेज या माध्यमातून लोकांची लूट होते. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच बँकांनी इंटेलिजन्स सिक्योरिटी सिस्टीम तयार केली आहे. कोणत्याही ग्राहकाचे एखाद्या संशयास्पद बँक खात्याशी व्यवहार होत असल्याचे दिसल्यावर या सिस्टिमद्वारे ग्राहकांना अलर्ट पाठवले जाईल. व्यवहार पूर्ण होण्याआधीच या सिस्टिमद्वारे ग्राहकांना तसे संदेश पाठवले जातील. 

अशा पद्धतीने काम करणार इंटेलिजन्स सिस्टिम

बँकांकडून एक क्रेडिट इंटेलिजन्स सिक्योरिटी सिस्टीम तयार केली जात आहे. या सिस्टिमच्या मदतीने ऑनलाईन पद्धतीने केल्या जाणाऱ्या संशयास्पद व्यवहाराची संपूर्ण माहिती बँकांना मिळणार आहे. तुमच्याशी संबंधित कोणतेही संशयास्पद व्यवहार दिसून आल्यास, तसा तुम्हाला अलर्ट पाठवला जाईल. तसेच त्या आर्थिक व्यवहारासंदर्भात तुमच्याकडून कन्फॉर्मेशन न मिळाल्यास तो संबंधित व्यवहार रद्द केला जाईल. एचडीएफसी बँकेकडून यूपीआय, नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, क्रेडिट आणि डेबिट कार्ड आदी व्यवहारांना ही सिस्टीम लागू केली जाणार आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या प्रवक्त्यांनीही या अत्याधुनिक प्रणालीविषयी प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या ग्राहकाच्या बँक खात्यावर संशयास्पद व्यवहार केला जात असल्याचे आमच्या निदर्शनास आल्यास आम्ही त्यांना रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर कॉल केला जाईल. त्यानंतर संबंधित व्यवहाराचे कन्फर्मेशन न मिळाल्यास तो व्यवहार रद्द केला जाईल. 

अशा प्रकारे शोधणार संशयास्पद व्यवहार

संशयास्पद व्यवहार रोखण्यासाठी बँकांनी एका अॅनालिटिक्स टीमची स्थापना केलेली आहे. संशयास्पद व्यहारांचा शोध घेणे तसेच त्यांना रोखणे हे या टीमचे काम आहे. या टीमकडून कधीकधी सामान्य व्यवहारांनाही संशयास्पद व्यवहार म्हणून गृहित धरले जाऊ शकते. अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करणारी एचडीएफसी ही पहिली बँक ठरली आहे.  

हेही वाचा :

HDFC बँकेचा SMS अलर्टच्या सुविधेबाबत मोठा निर्णय; नवा नियम 25 जूनपासून लागू!

निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजारात नेमकं काय घडणार? जाणून घ्या मार्केटचा 20 वर्षांचा इतिहास!  

 

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
LPG price cut today: व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?
व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget