एक्स्प्लोर

34 वर्षांच्या मेहनतीतून उभारली 67500 कोटींची कंपनी, शेतकरी कुटुंबातील उद्योगपतीची यशोगाथा

आज आपण देशातील एका अशा उद्योगपतीबद्दल माहिती पाहणार आहोत, जे एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले आहेत. मोठ्या मेहनतीने त्यांनी 67500 कोटी रुपयांची कंपनी उभी केली आहे.

Success Story: भारतात (India) अनेकजण अब्जाधीश उद्योगपती आहेत. अनेक व्यावसायिकांना वारसाहक्कानं प्रचंड व्यावसायिक साम्राज्य मिळालं तर काहींनी स्वतःहून करोडो आणि अब्जावधी रुपयांचे व्यवसाय उभे केले आहेत. आज आपण देशातील एका अशा उद्योगपतीबद्दल माहिती पाहणार आहोत, जे एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले आहेत. मोठ्या मेहनतीने त्यांनी 67500 कोटी रुपयांची कंपनी उभी केली आहे. विशेष म्हणजे देशातील या दिग्गज उद्योगपतीने 34 वर्षांच्या मेहनतीनंतर हे स्थान मिळवले आहे. 

अभियांत्रिकी आणि बांधकाम व्यवसायातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

पीपी रेड्डी (PP Reddy) हे एक अभियंता आहेत. ते भारतातील बांधकाम व्यवसायाशी संबंधित व्यावसायिक आहेत. पीपी रेड्डी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. फोर्ब्स मासिकानुसार त्यांची एकूण संपत्ती 16,591 कोटी रुपये आहे. त्याचवेळी, 360 वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 नुसार, ते अभियांत्रिकी आणि बांधकाम व्यवसायातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

शेतकरी कुटुंबातील उद्योगपती 

विशेष बाब म्हणजे पीपी रेड्डी यांना वारसाहक्काने काहीही मिळालं नाही, त्यांनी हे व्यवसाय साम्राज्य स्वबळावर उभे केले आहे. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पीपी रेड्डी यांच्या यशाची आणि संघर्षाची कहाणी लाखो तरुणांना प्रेरणादायी आहे. पीपी रेड्डी यांच्या कुटुंबाचा व्यवसायाशी काहीही संबंध नव्हता. 1989 मध्ये रेड्डी यांनी काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला आणि दोन कर्मचाऱ्यांसह मेघा इंजिनिअरिंग एंटरप्रायझेसची स्थापना केली. गेल्या 34 वर्षांत, पीपी रेड्डी यांच्या कंपनीची झपाट्याने वाढ झाली आहे. ती भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींमध्ये सूचिबद्ध झाली आहे. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर (MEIL) चे मार्केट कॅप 67,500 कोटी रुपये आहे.

छोटीशी सुरुवात, आज कोट्यवधींचा व्यवसाय

पीपी रेड्डी यांच्या कंपनीनं सुरुवातीला छोटे पाईप बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. यानंतर कंपनीने भारतातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प उभारला. यानंतर कंपनीने मोठे पायाभूत प्रकल्प उभारण्यात एक प्रमुख म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पीपी रेड्डी यांच्या कंपनीने भारतातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प उभारला आहे. कल्लेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प तेलंगणामध्ये 14 अब्ज डॉलर्स खर्चून बांधला गेला. गोदावरी नदीवर बांधलेल्या या प्रकल्पामुळे 13 जिल्ह्यांतील 18.26 लाख एकर जमीन सिंचनाखाली येते. पीपी रेड्डी हे हैदराबादमधील ‘डायमंड हाऊस’ या आलिशान बंगल्यात राहतात. पीपी रेड्डी यांचा खासगी गोल्फ कोर्स देखील आहे.

महत्वाच्या बातम्या:

कर्ज घेऊन व्यवसायाची सुरुवात, आज 17 हजार कोटींच्या कंपनीचे मालक; TS कल्याणरामन यांची यशोगाथा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026 Live Updates : शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
Maharashtra Budget 2026: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; काय स्वस्त, काय महाग? A टू Z माहिती एका क्लिकवर
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; काय स्वस्त, काय महाग? A टू Z माहिती एका क्लिकवर

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget