एक्स्प्लोर

अश्विनला संघाबाहेर ठेवणं योग्य की अयोग्य ?

92 सामने, 434 विकेट, 3129 धावा, 5 शतके अन् 13 अर्धशतके... ही अचंबित करणारी आकडेवारी आहे आर. अश्विनची..... जागतिक दर्जाच्या या अष्टपैलू खेळाडूला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळाले नाही...  रोहित शर्माने नाणेफेकीचा कौल जिंकला पण पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाने निर्विवाद वर्चस्व गाजवले... त्यानंतर प्रत्येक भारतीय क्रीडा प्रेमीला आर. अश्विनची आठवण आली..  त्याला कारणही तसेच आहे.. अश्विनच्या फिरकीपुढे डाव्या हाताचे फलंदाज फारकाळ टिकाव धरत नाही.. ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ डावखुऱ्या फलंदाजांनी सजलाय.. असे असताना रोहित शर्माने आर. अश्विनला संघाबाहेर ठेवले. इंग्लंडमधील खेळपट्टी वेगवान माऱ्याला मदत करते, हे कारण देत अश्विनचा पत्ता कट झाला. पण मुळात अश्विनसारख्या दिग्गज गोलंदाजाला खेळपट्टी कधीच थांबवू शकत नाही, कोणत्याही खेळपट्टीवर प्रभावी मारा करण्याचे लकब अश्विनकडे आहे.. मग असे असताना अश्विनला बाहेर बसवत रोहित शर्माने आपल्याच पायावर दगड मारलाय का?  

रिकी पाँटिंग, सुनील गावस्कर, आकाश चोप्रा, सौरव गांगुली यांच्यासह अनेक माजी दिग्गजांनाही रोहित शर्माचा हा निर्णय पटला नाही. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग यानेही अश्विनला संघाबाहेर ठेवल्यानंतर आश्चर्य व्यक्त केलेय. सामना पुढे सरकल्यानंतर ओव्हलची खेळपट्टी फिरकीला मदत करु शकते. ऑस्ट्रेलियाच्या संघात अनेक डाव्या हाताचे फलंदाज आहेत, जे अश्विनची शिकार झाले असते.. अश्विनला बाहेर बसवणे ही भारताची सर्वात मोठी चूक ठरू शकते, असे स्पष्ट शब्दात पाँटिंगने सांगितलेय.  अश्विन सारख्या गोलंदाजाला खेळवण्यासाठी तुम्ही खेळपट्टी पाहू शकत नाही, असे म्हणत सुनील गावसकर यांनीही नाराजी व्यक्त केली. 

ट्रेविस हेड या डाव्या हाताच्या फलंदाजाने टीम इंडियाची गोलंदाजी फोडून काढली. स्मिथ याने संयमी फलंदाजी करत एक बाजू सांभाळली. चिवट फलंदाजी करणारा स्मिथ अश्विनच्या फिरकीपुढे ढेपाळतो हे अनेकदा दिसलेय. दोन वर्षांच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या सर्कलमध्ये अश्विन याने भारताकडून सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. अश्विनने 13 सामन्यात 61 विकेट घेतल्या आहेत.  जाडेजा आणि अश्विन या जोडीने प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडला होता. अश्विन याने ऑस्ट्रेलियात आपली प्रतिभा दाखवून दिली आहे. 400 पेक्षा जास्त विकेट घेतल्या असतानाही अश्विन याला पुन्हा स्वत: ला सिद्ध करावे लागत असेल तर याहून वाईट बाब नाही. तळाला खंबीरपणे फलंदाजी ही त्याची जमेची बाजू आहे. अश्विन सारख्या अनुभवी खेळाडू संघाबाहेर ठेवण्याची किंमत भारताला मोजावू लागू शकते. 2021 मध्ये विराट कोहलीने जी चूक केली.. तीच चूक रोहित शर्माने केली आहे. विराट कोहलीनेही इंग्लंडमध्ये अश्विनला प्लेईंग 11 मध्ये खेळवले नाही. इंग्लंडमध्ये झालेल्या मागील सहा कसोटी सामन्यात अश्विन संघाबाहेर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये अश्विनने चार विकेट घेतल्या होत्या.  असे असतानाही रोहित शर्माने अश्विनला खेळवले नाही.. त्याला याबाबत विचारलेही... रोहित शर्मा म्हणाला की, 'अश्विन हा मॅचविनर आहे यात वादच नाही आणि वर्षानुवर्षे तो आम्हाला सामने जिंकून देत आहे. पण आम्हाला संघाच्या गरजा लक्षात ठेवाव्या लागतात. त्यानुसार आम्हाला अश्विनला संघात घेता आले नाही.' पण अश्विनसारख्या गोलंदाजासाठी खेळपट्टी महत्वाची नाही. अश्विन कोणत्याही खेळपट्टीवर विकेट घेऊ शकतो, हे नाकारु शकत नाही. 

ओव्हलची खेळपट्टी फिरकीला पोषक असल्याचे अनेक रिपोर्ट्सनुसार समोर आलेय. ओव्हलच्या खेळपट्टीवर चेंडू वळू लागला, तर उसळीदेखील घेईल. त्यामुळे भारतीय संघाने दोन फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरायला हवे होते.  ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना फिरकीचा सामना करणे कठीण जाते.. खासकरुन भारतीय फिरकी गोलंदाजीसमोर फलंदाज चाचपडताना पाहिलेय. असे असतानाही जगातील आघाडीच्या फिरकी गोलंदाजाला संघाबाहेर बसवण्यात आलेय. ही चूक रोहित शर्माला महागात पडू नये, म्हणजे झालं. अश्विन सारख्या क्लास वन खेळाडूला बाहेर बसवण्याचा निर्णय योग्य की अयोग्य... हे येत्या तीन दिवसात कळेलच शेवटी फक्त एकच गोष्ट, दहा वर्षांचा चषकाचा दुष्काळ संपावा म्हणजे झाले. 

 

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report :  निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
Embed widget