एक्स्प्लोर

BLOG | इमर्जन्सी

रस्त्यावर एखादा छोटासा अपघात झाला तरी त्यात जखमी व्यक्तीला मदत करण्याऐवजी अपघाताला जबाबदार कोण? हे शोधून त्याला धोपटण्याची सरधोपट पद्धत आपल्याकडे आहे. जे घडले आहे ते जसेच्या तसे पाहता आले तरच खरी 'दृष्टी' लाभली असे म्हणता येईल. 'मन सुद्ध तुझं' या मालिकेच्या सातव्या भागात आत्महत्या करू पाहणार्‍या अशाच एका आजीची गोष्ट येते. ही मालिका सध्या एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर सुरू आहे.

क्लिनिक बंद करण्याच्या वेळेला म्हणजे रात्री मानसतज्ञ डॉ. उदय देशपांडे यांना एका अनोळखी नंबरवरून फोन येतो. पलीकडून कुणीच बोलत नाही. फक्त हुंदक्यांचा आवाज. डॉक्टरांच्या लक्षात येते की, पलीकडे कुणीतरी त्रस्त व्यक्ती आहे आणि तिला आपल्या मदतीची गरज आहे. फोन कट होतो. त्या रात्री रीसर्च पेपर लिहिण्यासाठी डॉक्टर दवाखान्यातच थांबतात. पुन्हा रात्री दोन वाजता तोच फोन येतो. या वेळी मात्र पलीकडून एक बाई बोलतात. त्या नाव, गाव आधी सांगत नाहीत, पण त्यांना आत्महत्या करायची आहे, असे सांगतात. हळूहळू डॉक्टर त्यांना बोलते करतात तेव्हा कळते की, त्या सुनीता सबनीस आहेत. त्यांचा मुलगा व सून परदेशात नोकरी करतात. परंतु नातू आपल्या जवळ रहावा म्हणून सुनीताबाईंनी त्याला दिल्लीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला लावलेला असतो. दरम्यान दोन वर्षांपूर्वी सुनिताबाई एका स्नेहसंमेलनाला बाहेरगावी जातात आणि इकडे दिल्लीत त्यांच्या नातवाचा मोटरसायकवर अपघात होतो. त्यात तो रस्त्यावरच मरतो. 

सुनीताबाई तीन दिवसांनी परत आल्यावर त्यांना नातवाबद्दल कळते. या घटनेला दोन वर्षे उलटली तरी हे दुःख कमी होत नाही. नातवाला आपण भारतात ठेवून घेतले म्हणूनच त्याचा अपघात झाला. त्याच्या मृत्यूला आपणच जबाबदार आहोत, असा विचार करून त्या दररोज रडत असतात. डॉक्टरांना हे सगळे सांगून झाल्यावर झोपेच्या गोळ्या घेऊन मरण्याची त्यांची योजना असते. या आणीबाणीच्या परिस्थितीत केवळ फोनवर रुग्णाला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात डॉक्टरांचे मानसशास्त्राचे कसब पणाला लागते.

डॉक्टर त्यांना सांगतात की,"तुमचा नातू कुठेही राहिला असता तरी त्याचा अपघात होऊ शकला असता. तुम्ही मुद्दाम तो अपघात घडवून आणलेला नाही. त्यामुळे त्याच्या मृत्यूला तुम्ही जबाबदार कशा ठरता?" तांदूळ सुपात घेऊन गारगोटीचे कण निवडून फेकतात. तसे आयुष्यातले प्रश्नही सुपात घेऊन त्यातले चुकीचे विचार निवडून बाजूला करावे लागतात हे सुनिताबाईंना शेवटी पटते आणि त्या आत्महत्या रद्द करतात.दुसर्‍या दिवशी सकाळी प्रसन्न चेहर्‍याने एक पुष्पगुच्छ घेऊन त्या दवाखान्यात येतात.

येथे हा सातवा भाग संपतो. जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यात दुर्घटना होतात. पण त्यासाठी नकळत झालेल्या चुकांना जबाबदार धरून स्वतः किती नैराश्यात जावे याला मर्यादा असते. ही मर्यादा ओलांडली की ते 'मन शुद्ध' करण्यासाठी मानसतज्ञच लागतो.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....
Lionel Messi : कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report
Rural Area Students Studies : अभ्यासाचा भोंगा, मोबाईलला ठेंगा, सकाळ-संध्याकाळ फक्त अभ्यास Special Report
Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....
Lionel Messi : कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
Share Market Holidays 2026 : पुढील वर्षी शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? NSE कडून सुट्ट्यांची यादी जाहीर
2026 मध्ये शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून सुट्ट्यांची यादी जाहीर
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Embed widget