एक्स्प्लोर

अरुण काकडे : प्रायोगिक रंगभूमीचं पर्व

काकडे काका गेल्याची बातमी मोबाईलवर फिरली. अर्थात त्याची खातरजमा करुन घ्यावी लागते. त्यासाठी आविष्कारच्याच रवीला फोन केला. रवी म्हणाला, हो.. मी चाललो आहे तिकडेच. मी म्हणालो, अंत्यसंस्कार कुठे करणार? खरंतर ज्या माहीमच्या शाळेत काकडे काकांनी नाट्यधर्म जिवंंत ठेवला तिथे त्यांना शेवटी नेणार आहेत का? रवी म्हणाला, तिथे कसं नेणार.. ती आता आपली जागा नाही.

'गेल्या जवळपास साठेक वर्षांपासून आविष्कार काम करते आहे. पण आता स्थिती गंभीर आहे रे. आम्हाला ही शाळेची जागा सोडायला सांगितली आहे. सर्वच सरकारी शाळांमधल्या इतर कार्यांना आता मज्जाव घातलाय. पण मुद्दा असा की आता जायचं कुठे? या विंगा, ही प्रॉपर्टी हे सगळं कुठे घेऊन जायचं सांग. आणि मुद्दा फक्त आविष्कारचा नाहीय. आज या निमित्ताने दादरसारख्या भागात काहीतरी प्रायोगिक काम चालू आहे. आम्ही शक्यतो प्रयोग इथे करत असतो. पण मुळातच प्रायोगिक नाटकवाल्यांना व्यासपीठ हवं. ते कधी मिळणार? सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्कात आहेच मी. ते मदत करणार आहेत, पण यावर लवकर तोडगा निघायला हवा,' असे काहीसे हतबल उद्गार होते ९४ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष अरुण काकडे यांचे.
जवळपास सहा दशकं आविष्कारसोबत काकडे काका काम करत होते. छबिलदासच्या चळवळीपासून पालिका शाळेतल्या प्रयोगांपर्यंतचं सगळं व्यवस्थापन काकडे काका करायचे. अगदी अलिकडेपर्यंत सादर होणाऱ्या प्रयोगांआधी टेबलावर तिकीटांपाशी काकडेकाका बसलेले असायचे अत्यंत शांत चित्त आणि कमालीच्या चिकाटीने काकडेकाकांनी आविष्कार सुरु ठेवली. अरविंद-सुलभा देशपांडे, सत्यदेव दुबे, रोहिणी-जयदेव हट्टंगडी, विजय तेंडुलकर, चेतन दातार, गिरीश पतके, रवी सावंत यांच्यापासून अगदी चंद्रकांत कुलकर्णी, सचिन खेडेकर, विश्वास सोहोनी, सुषमा देशपांडे आदी अनेकांसोबत काकडे काकांनी जुळवून घेतलं आणि संस्था सुरु ठेवली.  त्यांनी अभिनय केला नाही अशातला भाग नाही. काही नाटकं, एकांकिकांमधून त्यांनी उत्तम अभिनय केल्याचं आविष्कारची मंडळी सांगतात. पण नंतरच्या काळात संस्थेला असलेली गरज लक्षात घेऊन काकडे काका या संस्थेचे संयोजक, समन्वयक बनले.  त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना नाट्यपरिषदेनं नाट्यसंमेलनाध्यक्ष म्हणूनही नियुक्त केलं. ९४ व्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यावेळी केलेल्या भाषणातही त्यांनी प्रायोगिक रंगभूमीसाठी उपलब्ध असलेल्या व्यासपीठाबाबात.. बालरंगभूमीबाबत आपली ठोस मतं मांडली होती. एकीकडे अध्यक्षपदाची माळ गळ्यात आल्यानंतरही अत्यंत शांतपणे काकडे काकांनी प्रायोगिक रंगभूमीबद्दलची आपली मतं मांडली होती. कारण काका थेट रंगभूमीवर जरी कार्यरत नसले तरी भारतभरातल्या प्रायोगिक संस्थांशी त्यांचा संपर्क होता. या निमित्ताने, संस्थेत काम करणाऱ्या प्रत्येक रंगकर्मीला काकडे काका माहित होते. म्हणूनच काकडे काकांना प्रायोगिक रंगभूमीचं पर्व म्हटलं तर वावगं ठरु नये.
एकीकडे यशवंत नाट्यसंकुलात बालरंगभूमीसाठी झालेलं आंदोलन होतं. ज्यात तेंडुलकरांपासून दामू केंकरे, अरुण काकडे, सुलभा देशपांडे अशी नामी मंडळी सहभागी झाली होती. तत्कालीन अध्यक्ष मोहन जोशी यांनी नाट्यसंकुलात बालरंगभूमीसाठी जागा द्यावी यासाठी केलेल आंदोलन होतं ते. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी काकडे काका आविष्कारच्या जागेबद्दल  बोलत होते. इथे होणारं काम.. येणारी नाटकं.. येणारे रंगकर्मी यांना मिळणारी जागा.. मिळणारं व्यासपीठ याबाबत ते सतत चिंतातूर होते.
अगदी शेवटी शेवटी पालिका शाळेतल्या एका वर्गात आविष्कारचं सगळं सामान ठेवण्यात आलं होतं. तिथल्याच मधोमध ठेवलेल्या टेबलाजवळ दोन खुर्च्या मांडल्या गेल्या होत्या. एकावर काकडे काका बसले होते आणि दुसरीवर कॉम्प्युटरसमोर आणखी एखादा संस्थेचा शिलेदार बसलेला असायचा. पण तशाही जागेत काकडे काका नव्या जागेबद्दल संस्थेच्या पुढच्या नाट्यप्रयोगाबद्दल बोलत असायचे. जोवर शक्य आहे तोवर काम करत रहायचं असं ते अगदी प्रेमानं सांगत होते.
अर्थात आपल्या आणि पुढच्या पिढीसाठी त्यांनी केलेली मोठी सोय म्हणजे, त्यांचं पुस्तक. अमका. यात त्यांनी आपला प्रवास मांडला आहेच. पण वयाच्या नव्वदीतही त्यांचा उत्साह थक्क करणारा होता. या ऊर्जेचं आपण काय करायचं हा प्रश्न आहे. अर्थात रवी सावंतसारखी मंडळी आविष्कारमध्ये आजही काम करताहेत. पण हा सगळा अट्टहास ज्यासाठी चाललाय त्या प्रयोगिक रंगभूमीसाठी हव्या असणाऱ्या व्यासपीठाचं काय करायचं हा खरा प्रश्न आहे.
आणखी एक..
काकडे काका गेल्याची बातमी मोबाईलवर फिरली. अर्थात त्याची खातरजमा करुन घ्यावी लागते. त्यासाठी आविष्कारच्याच रवीला फोन केला. रवी म्हणाला, हो.. मी चाललो आहे तिकडेच. मी म्हणालो, अंत्यसंस्कार कुठे करणार? खरंतर ज्या माहीमच्या शाळेत काकडे काकांनी नाट्यधर्म जिवंंत ठेवला तिथे त्यांना शेवटी नेणार आहेत का? रवी म्हणाला, तिथे कसं नेणार.. ती आता आपली जागा नाही.
पुढे आमचं संभाषण थांबलं.
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
Maharashtra Budget 2026: देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
Maharashtra Budget 2026 : मेट्रो मार्गांचं जाळं वाढवणार, द्रूतगती मार्गांची उभारणी ते शेतकरी कर्जमाफी आणि  स्टार्टअप हब, देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
विकसित महाराष्ट्राच्या दिशेनं पाऊल, मेट्रोचा विस्तार, द्रूतगती मार्गांची उभारणी ते कर्जमाफी, अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा
Maharashtra Budget 2026: गावांना कॉंक्रिट रस्त्याने जोडणार ते पशूधन ते शेतपाणंद; शेतकरी, ग्रामीण महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पातील 5 मोठ्या घोषणा
गावांना कॉंक्रिट रस्त्याने जोडणार ते पशूधन ते शेतपाणंद; शेतकरी, ग्रामीण महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पातील 5 मोठ्या घोषणा
Aaditya Thackeray: राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
Embed widget