एक्स्प्लोर

आगळीवेगळी कांगा लीग क्रिकेट स्पर्धा

रिमझिम पाऊस, ढगाळ वातावरण, ओली निसरडी खेळपट्टी, वाढलेलं गवत आणि ठिकठिकाणी चिखलाने माखलेली आऊटफिल्ड ही आहेत क्रिकेट विश्वातल्या एका आगळ्या वेगळ्या स्पर्धेची वैशिष्टे. ही स्पर्धा आहे पावसाळी मोसमात खेळवली जाणारी जगातील एकमेव अशी मुंबई क्रिकेट असोसिएशनची कांगा लीग क्रिकेट स्पर्धा.

रिमझिम पाऊस, ढगाळ वातावरण, ओली निसरडी खेळपट्टी, वाढलेलं गवत आणि  ठिकठिकाणी चिखलाने माखलेली आऊटफिल्ड ही आहेत क्रिकेट विश्वातल्या एका आगळ्या  वेगळ्या स्पर्धेची वैशिष्टे. ही स्पर्धा आहे पावसाळी मोसमात खेळवली जाणारी जगातील एकमेव अशी मुंबई क्रिकेट असोसिएशनची कांगा लीग क्रिकेट स्पर्धा. मुंबई ही भारतातील क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते. याच मुंबईने आजवर अनेक खेळाडू भारताला दिलेत. किंबहुना मुंबईच्या खेळाडूंशिवाय भारतीय टीम पूर्णच होऊ शकत नाही असा भारतीय क्रिकेट मधील एक मोठा समज आहे. आतापर्यंत अनेक मुंबईकर खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व केल आहे. यात सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, रवी शास्त्री,संदीप पाटील, वासीम जाफर, जहीर खान, अजित आगरकर, रोहित शर्मा, अजिंक्य राहणे या रथीमहारथींचा समावेश आहे. मुंबईतून असे उत्तमोत्तम खेळाडू देशाला लाभतायत याचं मुख्य कारण म्हणजे मुंबईतलं स्थानिक क्रिकेट. मुंबईतील क्रिकेट हंगाम सुरू होतो तो ऐन पावसाळ्यात म्हणजेच जुलै महिन्यात. कांगा लीग ही मोसमातील पहिली स्पर्धा. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पहिले अध्यक्ष डॉ. एच. डी. कांगा यांच्या नावाने ही स्पर्धा 1948 पासून खेळवली जाते. कसे आहे कांगा लीग स्पर्धेचे स्वरूप...? सर्वसाधारणपणे जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत दर रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी या स्पर्धेतील सामने पार पडतात. लीग पद्धतीने चालणार्‍या या स्पर्धेत ए बी सी डी इ एफ जी असे 7 गट असतात. प्रत्येक गटात 14 संघ असे एकूण 98 संघ या स्पर्धेत भाग घेतात. गटातील प्रत्येक संघास 13 सामने खेळावे लागतात. सर्वात शेवटी सर्वाधिक गुणांच्या आधारावर प्रत्येक गटातील विजेत्याची निवड केली जाते. कांगा लीग स्पर्धेवेळी मुंबईत एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल 49 सामने खेळवले जातात. हे  सामने मुंबईतील आझाद मैदान, क्रॉस मैदान, ओव्हल मैदान, माटुंग्यातील दडकर मैदान, शिवाजी पार्क, मरीन लाईन्स वरील जिमखाने, विरार आणि पालघर येथील मैदानांवर पार पडतात. प्रतिकूल परिस्थितित होणार्‍या या सामन्यांमध्ये खेळाडूंचा अक्षरशः कस लागतो. ओल्या  खेळपट्टीवर खेळताना भल्या भल्या फलंदाजांची दांडी गुल होते. त्यामुळे बहुतांशी सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व राहते आणि फार कमी धावसंखेचे सामने बघायला मिळतात. कांगा लीगच्या इतिहासात आतापर्यंत 4 गोलंदाजानी   एकाच डावामध्ये 10 गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. मुंबईचे माजी वेगवान गोलंदाज विठ्ठल पाटील यांनी कांगा लीगमध्ये सर्वाधिक 759 गाडी बाद केले आहेत. तर 1948 पासून 2002 पर्यन्त सलग  55 वर्ष प्रत्येक कांगा लीग स्पर्धेत खेळून माजी कसोटीपटू माधव आपटे आपटे यांनी 5046 धावा कुटल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे हे दोन्ही विक्रम आजही अबाधित आहेत. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी जॉन ब्राइट या क्रिकेट  क्लब कडून पहिल्यांदा या स्पर्धेत खेळाला  होता. तर  अशी  ही आगळी  वेगळी  क्रिकेट स्पर्धा  यावर्षी  9 जुलै ते 1 ऑक्टोबर  या कालावधीत होत आहे. खर तर मुंबई  क्रिकेट  असोसिएशन वर्षभरात अनेक क्रिकेट स्पर्धांचं  आयोजन  करते. पण कांगा लीग चे  महत्व  आणि वेगळेपण  पूर्वीइतकच आजही  टिकून  आहे.
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget