एक्स्प्लोर

गेम ऑफ थ्रोन्स... सत्ता, संघर्ष आणि राजकारण

‘गेम ऑफ थ्रोन्स’ बस नाम ही काफी है… जगभरात गेल्या सात वर्षांपासून या नावाने अनेकांना वेड लावलं आहे. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ जगभरात सर्वात जास्त लोकप्रिय टीव्ही मालिकांपैकी एक आहे. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ म्हणजेच सत्तेचा खेळ, सत्ता मिळवण्यासाठी होणारं राजकारण, स्वत:चं साम्राज्य वाचवण्यासाठीचा संघर्ष, साम्राज्य वाढवण्याची भूक असलेले एकापेक्षा एक धुरंधर राजे आणि त्यांचे सैन्य! गेम ऑफ थ्रोन्स... सत्ता, संघर्ष आणि राजकारण ‘वेस्टोरॉस’ साम्राज्याला जिंकण्यासाठी झालेल्या संघर्षाची कहाणी या मालिकेत आहे. जॉर्ज आर. आर. मार्टनी यांच्या ‘साँग्स ऑफ आईस अ‍ॅण्ड फायर’ कादंबरीवर ‘गेम ऑफ थ्रोन्स’ आधारित आहे. 2011 साली सुरू झालेल्या भन्नाट प्रवासातील महत्वाचा टप्पा यावर्षी जुलै महिन्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे. ‘साँग्स ऑफ आईस अ‍ॅण्ड फायर’ कादंबरी सात भागात विभागलेली आहे. त्यानुसारच ‘गेम ऑफ थ्रोन्स’ मालिकेचेही सात भाग पाहायला मिळणार हे नक्की होते. आतापर्यंत या मालिकेचे सहा पर्व येऊन गेले. आता प्रतिक्षा आहे ती सातव्या भागाची. 16 जुलैला ही प्रतिक्षा संपणार आहे. गेम ऑफ थ्रोन्स... सत्ता, संघर्ष आणि राजकारण स्टार्क ऑफ विंटरफेल, ट्ली ऑफ रिव्हरन, अ‍ॅरेन ऑफ द एरी, लॅनिस्टर ऑफ कॅस्टर्ली रॉक, ब्रॅथॉन ऑफ स्टॉम्र्स एंड, ट्रेल ऑफ हायगार्डन, मार्टेल ऑफ सन्सस्पेअर या सात राज्यांचे मिळून वेस्टोरॉस या साम्राज्याची निर्मिती झाली आहे. सातही राज्यांवर राज्य करणारा राजा ज्या सिंहासनावर बसतो, त्याला आयर्न ‘थ्रोन’ म्हटलं जाते. किंग्स लँडिंग ही वेस्टोरॉस साम्राज्याची राजधानी आहे. आता अर्थात सगळा खेळ सुरु असतो तो ‘आयर्न थ्रोन’ची ताकद मिळवण्याचा. मालिकेच्या पहिल्या पर्वापासून आपल्याला राजकारण पाहायला मिळते. गेम ऑफ थ्रोन्स... सत्ता, संघर्ष आणि राजकारण बरं राजकारणाबरोबरच ‘वेस्टोरॉस’ साम्राज्याला आणखी एका साम्राज्याचा धोका असतो. त्यापासून वेस्टोरॉसला वाचवण्यासाठी ‘वेस्टोरॉस’भोवती एक मोठी भिंत उभारली आहे. ‘वेस्टोरॉस’च्या शासनात न राहणारे लोक या भिंतीपलीकडे राहत असतात. त्यांना ‘वाईल्ड लिग्स’ म्हणतात. यांना राज्यात येण्यापासून रोखण्यासाठी भिंतीजवळ मोठी फौज तैनात केलेली असते. त्यांनाच ‘नाईट्स वॉच’ म्हणतात. ‘वेस्टोरॉस’मधील सातही राज्यांच्या संघर्षाबरोबरच ‘वाईल्ड लिग्स’सोबतचा युद्धही पाहायला मिळतो. गेम ऑफ थ्रोन्स... सत्ता, संघर्ष आणि राजकारण मालिकेतील राजकारण आणि मालिकेतील लैंगिक दृश्य. ते दृश्य चित्रित करताना दिग्दर्शकाने दोन शतकांपूर्वीच्या स्त्री-पुरुषांची शरीरसंबंधांविषयीची मानसिकता लक्षात घेतली आहे. त्यामुळे या दृश्यांमध्ये स्त्रीच्या तुलनेत पुरुष खूपच आक्रमक दाखवले आहेत. परिणामी ही दृश्य इतकी अंगावर येतात की, सर्वसामान्य प्रेक्षक उत्तेजित न होता, त्याच्या मनात स्त्री पात्राविषयी सहानुभूतीची भावना निर्माण होते. पण विशेष म्हणजे शरीरसंबंधाच्या या दृश्यांमधून त्या स्त्रीवर अत्याचार होत नसल्याचंही नेमकं व्यक्त करण्यात आलं आहे. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ची पटकथा आणि दिग्दर्शन हे त्याच्या अफाट यशाचं प्रमुख कारण आहे. दिग्दर्शक डेव्हिड बेनिऑफ आणि डी. बी. वाईस यांनी गेल्या सहा सत्रामध्ये मालिकेवर खुप घेतलेली मेहनत यामधून दिसून येते. महाभारतात जशा भीष्म, भगवान कृष्ण, अर्जुन, कर्ण, भीम अशा अनेक व्यक्तिरेखा आहेत. प्रत्येक व्यक्तिरेखेची स्वत:ची एक पार्श्वभूमी आहे आणि त्याचा थेट परिणाम शेवटी हस्तिनापूरचे साम्राज्य मिळवण्यासाठी कौरव आणि पांडव यांच्यातील युद्धात दिसून येतो. महाभारताप्रमाणे ‘गेम ऑफ थ्रोन्स’मध्येही अशीच काही पात्र आणि त्यांच्या कहाण्या पाहायला मिळतात. उत्साह, हिंमत, जबरदस्त संगीत, अत्याधुनिक तंत्रज्ञान, थ्रीडी अ‍ॅनिमेशन, चित्रीकरणासाठीचे भव्य सेट, आकर्षित करणारी वेशभूषा यामधून सजणाऱ्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही मालिका दिग्दर्शक आणि कलाकारांच्या आयुष्याला कलाटणी आहे. असो. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ जगातील असंख्य सिनेरसिकांच्या मनात अनेक वर्षे जिवंत राहणार हे नक्की... गेम ऑफ थ्रोन्स’च्या सातव्या भागाचे ट्रेलर :
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!';  उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget