एक्स्प्लोर

'बळीराजानं' दिवाळी साजरी करायची कशी ?

BLOG : राज्यात परतीच्या पावसानं थैमान घातलय. आभाळ फाटल्यागत पाऊस पडतोय आणि पडणाऱ्या पावसात बळीराजा उद्धवस्त होतोय. या पावसानं हातची पिकं वाया गेलीत. सगळीकडं पाणीच पाणी दिसतंय. सगळ्यात जास्त फटका मराठवाडा आणि विदर्भाला बसलाय. तसेच अहमदनगर, नाशिक त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातही शेती पिकांचं मोठं नुकसान झालय!

सोयाबीनची माती आणि कापसाच्या वाती झाल्यात, ही परिस्थिती खरी आहे. भाजीपाला, कांदा, द्राक्ष, केळी यांचं देखील मोठं नुकसान झालंय. सुरुवातीला अतिवृष्टी झाली, त्यात काही पिकं वाया गेली, काही ठिकाणची कशी बशी वाचली, पुढं गोगलगायच संकट आलं, या संकटातून शेतकरी सावरत असताना उरलं सुरल सगळं पिकं परतीच्या पावसानं हिरवून घेतलय. हाती काहीच लागणार नसल्यानं दिवाळी साजरी करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसोर पडलाय.

असो इतकं सगळं होत असताना राज्यात 'ओला दुष्काळ' जाहीर करण्याची मागणी होतेय. पण माननीय राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणतायेत की ओला दुष्काळ जाहीर करावा अशी स्थिती नाही. आता सत्तारांना एकच प्रश्न आहे की, ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी नेमकं काय होणं अपेक्षित आहे?आणखी किती पावसाची गरज आहे? सद्या #पिकं पाण्यावर तरंगतायेत, आता माणसं पाण्यावर तरंगण तुम्हाला अपेक्षित आहे का?  संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करणं तुम्हाला शक्य होत नसेल तर, जिथं अतिवृष्टी झाली तिथं तरी ओला दुष्काळ जाहीर करा.

मागच्या तीन चार दिवसात नुकसानग्रस्त भागातील काही शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललय. विदर्भात 3 दिवसात 3 आत्महत्या झाल्यात. यामध्ये भंडारा, यवतमाळ आणि बुलडाणा जिल्ह्याचा समावेश आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यात परभणी 2 नांदेड 1 आणि बीड 1 अशा चार शेतकरी आत्महत्या मराठवाड्यात झाल्या आहेत. हे खूप भयाण आहे. याला जबाबदार कोण. खरंतर आत्महत्या करणं हा पर्याय नाही, पण तरीदेखील शेतकरी आत्महत्या करतायेत. त्यामुळं या काळात त्यांना दिलासा देणं गरजेचं आहे.एक एक जीव जात असताना राजकारणी मात्र फेकाफेकी, फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त आहेत.

परभणी, लातूर आणि औरंगाबादमधील काही शेतकऱ्यांशी बोललो. खरच परिस्थिती विदारक आहे. हाती काहीच लागण्याची शक्यता नाही. जे काही उरलं सुरल आहे त्यात गुडघाभर पाणी आहे. सद्या पाऊस सुरूच आहे, कधी वापसा होणार आणि कधी पिकं हाती येणार? हे काहीच सांगू शकत नाही. राजकारण्यांचं, स्थानिक लोकप्रतिनिधीच काहीच लक्ष नाही, सगळे दोष मात्र, शेतकऱ्यांना देतायेत. शेतकऱ्यांना पण आय, बहीण, भाऊ, बायको, लेकरं, बाळ आहेत. याची जाणीव सरकारला, राजकारण्यांना असेल तर तत्काळ बळीराजाला दिलासा द्यावा!

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

 IND vs NZ: दुसऱ्या वनडेतील भारताच्या पराभवाची तीन मोठी कारणं, शुभमन गिलचा निर्णय ठरला चुकीचा 
 IND vs NZ: दुसऱ्या वनडेतील भारताच्या पराभवाची तीन मोठी कारणं, शुभमन गिलचा निर्णय ठरला चुकीचा 
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून टॅरिफ संदर्भातील निर्णय आणखी एकदा लांबणीवर 
डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून टॅरिफ संदर्भातील निर्णय आणखी एकदा लांबणीवर 
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
ABP Premium

व्हिडीओ

Makar Sankranti Politics : संपला प्रचार कडवा, आता तीळगुळाचा गोडवा Special Report
Ajit Pawar Irrigation Scam : सिंचन घोटाळ्याच्या आरोपांची दादांकडून परतफेड Special Report
Raj Thackeray PADU Machine : निवडणुकीत आलं 'पाडू''इंजिन'लागलं धडधडू Special Report
Solapur Mahapalika Election : भाजप उमेदवाराच्या मुलाकडून पैसे वाटप? धक्कादायक व्हिडीओ समोर
Ram Kadam BJP : ठाकरे बंधुंनी मराठी माणसाचा ठेका घेतलाय का? राम कदम यांची टीका

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 IND vs NZ: दुसऱ्या वनडेतील भारताच्या पराभवाची तीन मोठी कारणं, शुभमन गिलचा निर्णय ठरला चुकीचा 
 IND vs NZ: दुसऱ्या वनडेतील भारताच्या पराभवाची तीन मोठी कारणं, शुभमन गिलचा निर्णय ठरला चुकीचा 
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून टॅरिफ संदर्भातील निर्णय आणखी एकदा लांबणीवर 
डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून टॅरिफ संदर्भातील निर्णय आणखी एकदा लांबणीवर 
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली,  बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशिया-इराण-पाकिस्तानसह 75 देशांच्या नागरिकांना व्हिसा देण्यावर बंदी, भारताचं काय?  
पाकिस्तानसह 75 देशांच्या नागरिकांना अमेरिकेची दारं बंद, ट्रम्प यांचा मोठा निर्णय, 21 जानेवारीपासून अंमलबजावणी
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
Embed widget