एक्स्प्लोर

'बळीराजानं' दिवाळी साजरी करायची कशी ?

BLOG : राज्यात परतीच्या पावसानं थैमान घातलय. आभाळ फाटल्यागत पाऊस पडतोय आणि पडणाऱ्या पावसात बळीराजा उद्धवस्त होतोय. या पावसानं हातची पिकं वाया गेलीत. सगळीकडं पाणीच पाणी दिसतंय. सगळ्यात जास्त फटका मराठवाडा आणि विदर्भाला बसलाय. तसेच अहमदनगर, नाशिक त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातही शेती पिकांचं मोठं नुकसान झालय!

सोयाबीनची माती आणि कापसाच्या वाती झाल्यात, ही परिस्थिती खरी आहे. भाजीपाला, कांदा, द्राक्ष, केळी यांचं देखील मोठं नुकसान झालंय. सुरुवातीला अतिवृष्टी झाली, त्यात काही पिकं वाया गेली, काही ठिकाणची कशी बशी वाचली, पुढं गोगलगायच संकट आलं, या संकटातून शेतकरी सावरत असताना उरलं सुरल सगळं पिकं परतीच्या पावसानं हिरवून घेतलय. हाती काहीच लागणार नसल्यानं दिवाळी साजरी करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसोर पडलाय.

असो इतकं सगळं होत असताना राज्यात 'ओला दुष्काळ' जाहीर करण्याची मागणी होतेय. पण माननीय राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणतायेत की ओला दुष्काळ जाहीर करावा अशी स्थिती नाही. आता सत्तारांना एकच प्रश्न आहे की, ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी नेमकं काय होणं अपेक्षित आहे?आणखी किती पावसाची गरज आहे? सद्या #पिकं पाण्यावर तरंगतायेत, आता माणसं पाण्यावर तरंगण तुम्हाला अपेक्षित आहे का?  संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करणं तुम्हाला शक्य होत नसेल तर, जिथं अतिवृष्टी झाली तिथं तरी ओला दुष्काळ जाहीर करा.

मागच्या तीन चार दिवसात नुकसानग्रस्त भागातील काही शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललय. विदर्भात 3 दिवसात 3 आत्महत्या झाल्यात. यामध्ये भंडारा, यवतमाळ आणि बुलडाणा जिल्ह्याचा समावेश आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यात परभणी 2 नांदेड 1 आणि बीड 1 अशा चार शेतकरी आत्महत्या मराठवाड्यात झाल्या आहेत. हे खूप भयाण आहे. याला जबाबदार कोण. खरंतर आत्महत्या करणं हा पर्याय नाही, पण तरीदेखील शेतकरी आत्महत्या करतायेत. त्यामुळं या काळात त्यांना दिलासा देणं गरजेचं आहे.एक एक जीव जात असताना राजकारणी मात्र फेकाफेकी, फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त आहेत.

परभणी, लातूर आणि औरंगाबादमधील काही शेतकऱ्यांशी बोललो. खरच परिस्थिती विदारक आहे. हाती काहीच लागण्याची शक्यता नाही. जे काही उरलं सुरल आहे त्यात गुडघाभर पाणी आहे. सद्या पाऊस सुरूच आहे, कधी वापसा होणार आणि कधी पिकं हाती येणार? हे काहीच सांगू शकत नाही. राजकारण्यांचं, स्थानिक लोकप्रतिनिधीच काहीच लक्ष नाही, सगळे दोष मात्र, शेतकऱ्यांना देतायेत. शेतकऱ्यांना पण आय, बहीण, भाऊ, बायको, लेकरं, बाळ आहेत. याची जाणीव सरकारला, राजकारण्यांना असेल तर तत्काळ बळीराजाला दिलासा द्यावा!

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना  शुभेच्छा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Beed Crime News: दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
Embed widget