एक्स्प्लोर

'बळीराजानं' दिवाळी साजरी करायची कशी ?

BLOG : राज्यात परतीच्या पावसानं थैमान घातलय. आभाळ फाटल्यागत पाऊस पडतोय आणि पडणाऱ्या पावसात बळीराजा उद्धवस्त होतोय. या पावसानं हातची पिकं वाया गेलीत. सगळीकडं पाणीच पाणी दिसतंय. सगळ्यात जास्त फटका मराठवाडा आणि विदर्भाला बसलाय. तसेच अहमदनगर, नाशिक त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातही शेती पिकांचं मोठं नुकसान झालय!

सोयाबीनची माती आणि कापसाच्या वाती झाल्यात, ही परिस्थिती खरी आहे. भाजीपाला, कांदा, द्राक्ष, केळी यांचं देखील मोठं नुकसान झालंय. सुरुवातीला अतिवृष्टी झाली, त्यात काही पिकं वाया गेली, काही ठिकाणची कशी बशी वाचली, पुढं गोगलगायच संकट आलं, या संकटातून शेतकरी सावरत असताना उरलं सुरल सगळं पिकं परतीच्या पावसानं हिरवून घेतलय. हाती काहीच लागणार नसल्यानं दिवाळी साजरी करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसोर पडलाय.

असो इतकं सगळं होत असताना राज्यात 'ओला दुष्काळ' जाहीर करण्याची मागणी होतेय. पण माननीय राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणतायेत की ओला दुष्काळ जाहीर करावा अशी स्थिती नाही. आता सत्तारांना एकच प्रश्न आहे की, ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी नेमकं काय होणं अपेक्षित आहे?आणखी किती पावसाची गरज आहे? सद्या #पिकं पाण्यावर तरंगतायेत, आता माणसं पाण्यावर तरंगण तुम्हाला अपेक्षित आहे का?  संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करणं तुम्हाला शक्य होत नसेल तर, जिथं अतिवृष्टी झाली तिथं तरी ओला दुष्काळ जाहीर करा.

मागच्या तीन चार दिवसात नुकसानग्रस्त भागातील काही शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललय. विदर्भात 3 दिवसात 3 आत्महत्या झाल्यात. यामध्ये भंडारा, यवतमाळ आणि बुलडाणा जिल्ह्याचा समावेश आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यात परभणी 2 नांदेड 1 आणि बीड 1 अशा चार शेतकरी आत्महत्या मराठवाड्यात झाल्या आहेत. हे खूप भयाण आहे. याला जबाबदार कोण. खरंतर आत्महत्या करणं हा पर्याय नाही, पण तरीदेखील शेतकरी आत्महत्या करतायेत. त्यामुळं या काळात त्यांना दिलासा देणं गरजेचं आहे.एक एक जीव जात असताना राजकारणी मात्र फेकाफेकी, फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त आहेत.

परभणी, लातूर आणि औरंगाबादमधील काही शेतकऱ्यांशी बोललो. खरच परिस्थिती विदारक आहे. हाती काहीच लागण्याची शक्यता नाही. जे काही उरलं सुरल आहे त्यात गुडघाभर पाणी आहे. सद्या पाऊस सुरूच आहे, कधी वापसा होणार आणि कधी पिकं हाती येणार? हे काहीच सांगू शकत नाही. राजकारण्यांचं, स्थानिक लोकप्रतिनिधीच काहीच लक्ष नाही, सगळे दोष मात्र, शेतकऱ्यांना देतायेत. शेतकऱ्यांना पण आय, बहीण, भाऊ, बायको, लेकरं, बाळ आहेत. याची जाणीव सरकारला, राजकारण्यांना असेल तर तत्काळ बळीराजाला दिलासा द्यावा!

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
Adinath Maharaj :  तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP Premium

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
Adinath Maharaj :  तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
West Bengal Election in 2 phases: केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
Embed widget