एक्स्प्लोर

मुंबईकरांनो.... जाने भी दो यारों!

सिस्टिम निगरगट्ट असते... तिला हलवावं लागतं हे खरंय... पण दुसरा कुणी तरी सिस्टिमला जागं करेल म्हणून मुंबईकर निवांत राहिला... आणि अशा अपघातांमध्ये रोजच्या रोज खपत राहिला... खरं तर कोणत्याही शहराने जितकं दिलं नसेल... तितकं भरभरुन ही मुंबई देशाला देते. पण त्या बदल्यात मुंबईला काय मिळतं? हा चाऊन चोथा झालेला विषय आहे...

मुंबईमध्ये उभारलेला पूल जमीनदोस्त होतो... दोन फोटोग्राफर्सच्या कॅमेऱ्यात योगायोगाने एका खुनाचा फोटो कैद होतो. त्या फोटोच्या आधारे दोघेजण मारेकऱ्यांचा शोध घेतात. त्यातून पूल दुर्घटनेचा पर्दाफाश होतो... एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान महाभारत घडतं... आणि अधिकारी, राजकारणी, पोलीस यांच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश होतो... पण ज्या दोघांनी पूल दुर्घटनेचा पर्दाफाश केला... त्यांनाच पूल दुर्घटनेचा मास्टरमाईंड ठरवलं जातं...

80 च्या दशकातली जाने भी दो यारो ही ब्लॅक कॉमेडी मुंबईकरांच्या आजच्या अवस्थेचं तंतोतंत चित्रण करते.. म्हणजे जे चित्र 30 वर्षांपूर्वी होतं, तेच आजही आहे..... तेव्हाही भ्रष्ट राजकारणी होते, आजही आहेत... तेव्हाही मुजोर नोकरशाही होती, आजही आहे... तेव्हाही सुस्त यंत्रणा होती, आजही आहे.... तेव्हाही मुंबईकर म्हणायचे.... जाने भी दो यारो.... आजही...? ........

त्या वरच्या रिकाम्या जागांमध्ये काय भरायचं हे तुम्हाला नेमकं माहित आहे.... किंबहुना जाने भी दो यारों, हे मुंबईकरांचं ब्रिदवाक्य झालं आहे.... आजूबाजूला कितीही मोठं संकट असलं, तरी जोपर्यंत ते आपल्यावर येत नाही, तोपर्यंत मुंबईकर म्हणतच राहतो.... जाने भी दो यारों.... आणि बहुदा मुंबईकरांच्या जीवावर हेच वाक्य उठतंय....

मुंबईत दिवसाला इतक्या वावग्या गोष्टी होत असतात, पण कुणीही त्यावर ना व्यक्त होतो... ना हस्तक्षेप करतो... आपल्याला काय करायचंय? हा अॅटिट्यूडच मुंबईला मारक ठरतोय.... अर्थात अशा किती वावग्या गोष्टींमध्ये प्रत्येकाने हस्तक्षेप करायचा हा मुद्दा आहे... पण अशा दुर्घटना टाळायच्या असतील... तर ते आता प्रत्येक मुंबईकराला करावं लागेल...

आपण कोणत्याही स्टेशनच्या पुलावरून गेलो... आणि पुलाखालून गाडी गेली... की पूल धडधडतोच... पण लक्षात कोण घेतो... कुणी तक्रार करतं? कुणी ट्वीट करतं? कुणी फेसबुकवर लिहितं? नाही...

हे सगळ्यांना नेहमीचं झालंय... हे जे नेहमीचं होणं आहे ना? तेच जीवावर उठतंय... आणि मग बसतो आपण मृतांच्या नावाने मेणबत्त्या पेटवत... रस्त्यात सुरु असलेलं निकृष्ट काम उघड्या डोळ्याने बघतो... पण त्याची तक्रार करतो का? नाही... त्या भानगडीत आम्ही कशाला पडायचं?

बरोबर आहे... त्या खड्ड्यात बाईक जाऊन तुमचं कपाळ फुटल्याशिवाय तुम्हाला जाग येणार नाही... हातात फोन आहे... त्याचा वापर करा.... करा क्लिक... आणि टाका सोशल मीडियावर... करा रितरस तक्रार... एकाच्या जागी दहा जणांच्या तक्रारी गेल्या, तरी सिस्टिम हलेल...

आता जो पूल कोसळला... त्या पुलावरून रोजच्या रोज किती माणसं जात असतील... एकाने तरी पुलाच्या दुरवस्थेबद्दल विचार केला होता का? कुणीच नाही... कारण जन्माला आलेल्या प्रत्येकाला वाटत असतं... ती वाईट वेळ आपल्यावर येणार नाही... आणि हाच सर्वात मोठा भ्रम आहे...

सिस्टिम निगरगट्ट असते... तिला हलवावं लागतं हे खरंय... पण दुसरा कुणी तरी सिस्टिमला जागं करेल म्हणून मुंबईकर निवांत राहिला... आणि अशा अपघातांमध्ये रोजच्या रोज खपत राहिला... खरं तर कोणत्याही शहराने जितकं दिलं नसेल... तितकं भरभरुन ही मुंबई देशाला देते. पण त्या बदल्यात मुंबईला काय मिळतं? हा चाऊन चोथा झालेला विषय आहे...

माझ्या मित्राने ट्टिटरवर मांडलेल्या एका मताशी मी हजार टक्के सहमत आहे... देशात काहीही होऊ दे... पण मुंबईत शिवसेनाच हवी... या एका वाक्याने मुंबईची पार वाट लावली आहे... कोणताही सत्ता एकाच हातात अनंत काळ राहिली... तर त्या अनिर्बंध सत्तेमुळे सत्ताधाऱ्यांमध्ये एक विशिष्ट कोडगेपणा येतो... मुंबईत सध्या तेच झालंय... सत्ताधारी असोत.... किंवा नोकरशाही.... त्यांनी मुंबईकरांना गृहित धरलंय...

मुंबईच्या मागून आलेली शहरं आज कुठल्या कुठे गेली आहेत... दिल्ली, हैदराबाद, चंदिगड, भोपाळ, बंगळुरु अशी किती नावे घ्यावीत... अर्थात या शहरांना पसरण्यास वाव आहे.... मुंबईला ती सोय नाही, हे मान्य... पण म्हणून मुंबईचा कोंडवाडा होण्यापासून रोखणं हे व्यवस्थेच्या हातात नव्हतं...?

परप्रांतीय म्हणा... किंवा आणखी काही... मुंबईत येणाऱ्यांचा रेटा कमी कधी झालाच नाही... झोपड्या वाढल्या... मतदारसंघ वाढले... मतांची गरज वाढली... झोपड्यांची पक्की घरे करुन देण्याची आश्वासने आली... बनावट ओळखपत्रे तयार झाली... त्यांचे मतदार झाले.... त्या मतदारांची लॉबी झाली... त्यांना खुश करण्यासाठी आश्वासने आली... मुंबई बोकाळत गेली... तिला दशदिशांनी फक्त ओरबाडलं जाऊ लागलं... आणि मग गरजेपेक्षा फुगलेल्या मुंबईने आपले अवतार दाखवायला सुरुवात केली.

2005 साली महाप्रलयाने सुरुवात केली... आज 14 वर्षांनीही आम्ही शिकलो नाही... पण आपल्या हातात काय आहे? असा प्रश्न तुम्हाला पडेल... गरज पडेल तिथे व्यक्त व्हा... गरज पडेल तिथे हस्तक्षेप करा.. फुटलेला कठडा दिसला तर तक्रार करा. तुटलेलं रेलिंग दिसलं तर यंत्रणेला कळवा. संशयास्पद हालचाल दिसली, तर पोलिसांना कळवा. सरकारी लेटलतिफी दिसली, तर तातडीने हस्तक्षेप करा...

वेळीच घातलेला एक टाका पुढचे दहा टाके वाचवतो असं म्हणतात. तुमची एक तक्रार कदाचित पुढचा अनर्थ टाळू शकते.... वाचून वाटलं अनुकरण करावं तर नक्की करा...

"जाने भी दो यारों"पासून मुंबईला मुक्त करा!

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीत खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीतबीड जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयात एका कुटुंबाने महसूल अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलीस प्रशासनाने प्रतिबंध केल्याने मोठा अनर्थ टळला.केज न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीची मोजणी करून सीमांकन दाखविण्याचे तहसीलदारांचे आदेश असतानाही मंडळ अधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी कर्मचाऱ्याला सहकार्य न केल्याने लांडगे कुटुंबातील चौघांनी काल केज तहसील कार्यालयाच्या दारातच अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. केज-बीड राष्ट्रीय महामार्गालगतच्या गायरान जमिनीतील वडिलोपार्जित जमीन लांडगे कुटुंबाकडे वहिवाट आहे. त्यांना या जमिनीचा ताबा मिळालेला नाही. जमिनीची मोजणी करून सीमांकन करून देण्यासाठी तहसीलदारांनी ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी व भूमी अभिलेख कार्यालयाचे मोजणी कर्मचाऱ्यांना 12 जानेवारी रोजी प्रत्यक्ष जायमोक्यावर हजर राहून कार्यवाही करीत अहवाल तहसील कार्यालयाला पाठविण्याचे आदेश दिले होते, परंतु मंडळ अधिकाऱ्यांनी मोजणी करताना सहकार्य केले नसल्याने लांडगे कुटुंबातील चार जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
'जेव्हा मी मुंबई महाराष्ट्र, मुंबई वाचवत होतो, त्यावेळी भाजप शासित उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये मैदानात चिता जळत होत्या' उद्धव ठाकरे ठाण्यात काय काय म्हणाले?
'जेव्हा मी मुंबई महाराष्ट्र, मुंबई वाचवत होतो, त्यावेळी भाजप शासित उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये मैदानात चिता जळत होत्या' उद्धव ठाकरे ठाण्यात काय काय म्हणाले?
Bachchu Kadu: चंद्रशेखर बावनकुळेंच्या खाणी अन् ट्रक, लवकरच प्रकरण बाहेर काढू, बच्चू कडूंचा महसूलमंत्र्यांना इशारा
चंद्रशेखर बावनकुळेंच्या खाणी अन् ट्रक, लवकरच प्रकरण बाहेर काढू, बच्चू कडूंचा महसूलमंत्र्यांना इशारा
Nashik Municipal Election 2026: नाशिकमध्ये निवडणुकीला गालबोट, 'आप'च्या उमेदवारावर रोखली थेट बंदूक, जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश लोंढेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप
नाशिकमध्ये निवडणुकीला गालबोट, 'आप'च्या उमेदवारावर रोखली थेट बंदूक, जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश लोंढेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप
ABP Premium

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीत खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीतबीड जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयात एका कुटुंबाने महसूल अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलीस प्रशासनाने प्रतिबंध केल्याने मोठा अनर्थ टळला.केज न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीची मोजणी करून सीमांकन दाखविण्याचे तहसीलदारांचे आदेश असतानाही मंडळ अधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी कर्मचाऱ्याला सहकार्य न केल्याने लांडगे कुटुंबातील चौघांनी काल केज तहसील कार्यालयाच्या दारातच अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. केज-बीड राष्ट्रीय महामार्गालगतच्या गायरान जमिनीतील वडिलोपार्जित जमीन लांडगे कुटुंबाकडे वहिवाट आहे. त्यांना या जमिनीचा ताबा मिळालेला नाही. जमिनीची मोजणी करून सीमांकन करून देण्यासाठी तहसीलदारांनी ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी व भूमी अभिलेख कार्यालयाचे मोजणी कर्मचाऱ्यांना 12 जानेवारी रोजी प्रत्यक्ष जायमोक्यावर हजर राहून कार्यवाही करीत अहवाल तहसील कार्यालयाला पाठविण्याचे आदेश दिले होते, परंतु मंडळ अधिकाऱ्यांनी मोजणी करताना सहकार्य केले नसल्याने लांडगे कुटुंबातील चार जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
'जेव्हा मी मुंबई महाराष्ट्र, मुंबई वाचवत होतो, त्यावेळी भाजप शासित उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये मैदानात चिता जळत होत्या' उद्धव ठाकरे ठाण्यात काय काय म्हणाले?
'जेव्हा मी मुंबई महाराष्ट्र, मुंबई वाचवत होतो, त्यावेळी भाजप शासित उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये मैदानात चिता जळत होत्या' उद्धव ठाकरे ठाण्यात काय काय म्हणाले?
Bachchu Kadu: चंद्रशेखर बावनकुळेंच्या खाणी अन् ट्रक, लवकरच प्रकरण बाहेर काढू, बच्चू कडूंचा महसूलमंत्र्यांना इशारा
चंद्रशेखर बावनकुळेंच्या खाणी अन् ट्रक, लवकरच प्रकरण बाहेर काढू, बच्चू कडूंचा महसूलमंत्र्यांना इशारा
Nashik Municipal Election 2026: नाशिकमध्ये निवडणुकीला गालबोट, 'आप'च्या उमेदवारावर रोखली थेट बंदूक, जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश लोंढेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप
नाशिकमध्ये निवडणुकीला गालबोट, 'आप'च्या उमेदवारावर रोखली थेट बंदूक, जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश लोंढेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप
Devendra Fadnavis: अदानी किंवा कोणीही असो, महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागतच करु; फडणवीसांनी राज ठाकरेंना ठणकावून सांगितलं
अदानी किंवा कोणीही असो, महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागतच करु; फडणवीसांनी राज ठाकरेंना ठणकावून सांगितलं
Sanjay Raut: अण्णामलाईंचं मुंबईविषयी वादग्रस्त वक्तव्य अन् रवींद्र चव्हाण लुंगी नेसून शिवाजी पार्कच्या सभेला आले, संजय राऊतांचं ट्विट म्हणाले...
अण्णामलाईंचं मुंबईविषयी वादग्रस्त वक्तव्य अन् रवींद्र चव्हाण लुंगी नेसून शिवाजी पार्कच्या सभेला आले, संजय राऊतांचं ट्विट म्हणाले...
Devendra Fadnavis On Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी सलग दोन-तीन सभेत केली देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री; आता मुख्यमंत्री म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी सलग दोन-तीन सभेत केली देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री; आता मुख्यमंत्री म्हणाले...
BMC Election 2026: ठाकरेंची साथ सोडलेल्या नेत्याची मध्यरात्री वरळीत धाड, हेमांगी वरळीकरांच्या नवऱ्याला पकडलं, पैसे वाटपाचा आरोप
ठाकरेंची साथ सोडलेल्या नेत्याची मध्यरात्री वरळीत धाड, हेमांगी वरळीकरांच्या नवऱ्याला पकडलं, पैसे वाटपाचा आरोप
Embed widget