एक्स्प्लोर

जागे व्हा मुंबईकर... जागे व्हा!

तुमचं स्टेटस, पोस्ट, फोटो टाकून आणि हो आदरांजली वाहून झाली असेलचं... आता तरी जागे व्हा, सुजाण व्हा, सजग व्हा, तत्पर व्हा! त्या मोबाईलच्या दुनियेतून खऱ्या माणुसकीच्या दुनियेत या आणि आपल्या हक्कासाठी लढा

काय झालं का तुमचं स्टेटस, पोस्ट, फोटो टाकून आणि हो आदरांजली वाहून... आता तरी त्या मोबाईलमधून बाहेर या आणि जागे व्हा! अरे लोकांसाठी नाही तर स्वतःसाठी. गुरुवारी सीएसएमटी जवळील पूल कोसळला. यात निष्पाप तीन महिलांसह सहा जणांचा मृत्यू झाला, तर ३१ जण गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेची बातमी ऐकली आणि धक्का बसला. पण या घटनेनंतर मनाला भांबावून टाकणारी आणखी एक घटना घडली. एरवी आपत्कालीन परिस्थितीत एकमेकांना मदतीचा हात देत धावणाऱ्या मुंबईकरांच वेगळं रूप पाहायला मिळालं. काल ही घटना घडली आणि मुंबईकर पुन्हा एकदा थांबले, पण या वेळी मदत करण्यासाठी नसून तर मोबाईलमध्ये व्हिडीओ बनवण्यासाठी. का आणि कशासाठी? हाच एक प्रश्न माझ्या मनात आला. म्हणून मुंबईकर या नात्याने मला याबद्दल गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. आपण किती निष्ठूर होत चाललो आहोत? ह्या मोबाईलने एवढं वेड लावलं आहे की आपण माणुसकीसुद्धा विसरत चाललो आहोत. आपल्यासमोर दिवसभरात एवढं काही घडत तरीही आपण त्याकडे सोयीस्कररित्या कानाडोळा करत पुढे निघून जातो. काल एवढी मोठी घटना घडली पण एकाही माणसातली माणुसकी काही पाहायला मिळाली नाही. जर ती माणुसकी दिसली असती तर काही लोकांचा जीव वाचला असता. मृत जाहिद खानच्या भावानेच याबद्दल वक्तव्य केलं आहे. आणि हो मी तर म्हणेन की मुंबईकरांनी मदत देखील केली असेल पण वेळ निघून गेल्यावर केलेल्या गोष्टींचा उपयोग शून्यच. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही दुर्घटना आणि आपलं निष्क्रिय प्रशासन! ज्या पुलाच्या ऑडिटमध्ये पूल धोकादायक नाही असा उल्लेख होतो. तोच पूल कोसळतो. मग रेल्वे आणि महापालिका प्रशासनाची एकमेकांवर चिखलफेक सुरू होते. पण आमचा मुंबईकर मात्र मुंबई स्पिरिट म्हणत दुसऱ्या दिवशी आपल्या कामाला लागतो. काही असतात ते आपलं मतं व्यक्त करतात तर काही मेणबत्त्या घेऊन शोक. पण या विरुद्ध कोणताही सामान्य मुंबईकर आवाज उठवत नाही. मागे सुद्धा अशाच घटना घडल्या. एल्फिन्स्टन पूल, अंधेरी पूल याच घटना घ्या. घटना घडल्यानंतर अनेक चौकश्या झाल्या, अनेक ऑडिट झाले, नवीन पूल बांधले. पण प्रत्यक्षात यातून निष्पन्न काय झालं काहीच नाही. आणि so called मुंबईकर सगळं विसरून आपलं रोजच आयुष्य जगू लागला. पण ठोस असं काहीच केलं नाही. आता तरी सुजाण, सजग, तत्पर अशा मुंबईकरांनी आवाज उठवायलाच हवा. किती दिवस असे किड्या मुंग्यांसारखे मरत राहणार? आता हीच वेळ आहे उठा जागे व्हा त्या मोबाईलच्या दुनियेतून खऱ्या माणुसकीच्या दुनियेत या आणि आपल्या हक्कासाठी लढा... एवढीचं आशा!
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बायकोनं नवऱ्याला रात्रीतच गुप्तांग दाबून संपवलं; सकाळी उठताच चहासोबत टोस्ट खाऊन घरातून बाहेर पडली, सासूला जाताना म्हणाली, तो उशीरा झोपून उठेल
बायकोनं नवऱ्याला रात्रीतच गुप्तांग दाबून संपवलं; सकाळी उठताच चहासोबत टोस्ट खाऊन घरातून बाहेर पडली, सासूला जाताना म्हणाली, तो उशीरा झोपून उठेल
Mumbai Metro: कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
Sanjay Raut on BJP: भाजप कामाठीपुऱ्यात उभी, कोणीही या, अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत छुपी युती, मग आता हिरवे झाले नाहीत का? भाजप हा दुतोंडी गांडूळ; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजप कामाठीपुऱ्यात उभी, कोणीही या, अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत छुपी युती, मग आता हिरवे झाले नाहीत का? भाजप हा दुतोंडी गांडूळ; संजय राऊतांचा हल्लाबोल
PMC  Election 2026: पुण्यातील निवडणुकीत नामचीन भाईंना उमेदवारी, पोलिसांची करडी नजर, एकही चूक झाल्यास...
पुण्यातील निवडणुकीत नामचीन भाईंना उमेदवारी, पोलिसांची करडी नजर, एकही चूक झाल्यास...
ABP Premium

व्हिडीओ

Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार
Akhil Chitre On Nitesh Rane : नितेश राणे ढोंगी आणि लोचट व्यक्ती, त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये..
Rohit Pawar MCA Vastav 261 : रेवती सुळे, कुंती रोहित पवार यांच्या समावेशाचा वाद पेटला;न्यायालयाचा चाप
Navneet Rana Amravati Speech : तेरी दादागिरी पाकिस्तानमें चलेगी..,नवनीत राणांचा ओवैसींवर घणाघात
Thackeray Brothers : महायुती प्रचारात ठाकरे अजूनही विचारात? महायुतीत सभांची दाटी, ठाकरे शाखांवर बिझी Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बायकोनं नवऱ्याला रात्रीतच गुप्तांग दाबून संपवलं; सकाळी उठताच चहासोबत टोस्ट खाऊन घरातून बाहेर पडली, सासूला जाताना म्हणाली, तो उशीरा झोपून उठेल
बायकोनं नवऱ्याला रात्रीतच गुप्तांग दाबून संपवलं; सकाळी उठताच चहासोबत टोस्ट खाऊन घरातून बाहेर पडली, सासूला जाताना म्हणाली, तो उशीरा झोपून उठेल
Mumbai Metro: कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
Sanjay Raut on BJP: भाजप कामाठीपुऱ्यात उभी, कोणीही या, अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत छुपी युती, मग आता हिरवे झाले नाहीत का? भाजप हा दुतोंडी गांडूळ; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजप कामाठीपुऱ्यात उभी, कोणीही या, अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत छुपी युती, मग आता हिरवे झाले नाहीत का? भाजप हा दुतोंडी गांडूळ; संजय राऊतांचा हल्लाबोल
PMC  Election 2026: पुण्यातील निवडणुकीत नामचीन भाईंना उमेदवारी, पोलिसांची करडी नजर, एकही चूक झाल्यास...
पुण्यातील निवडणुकीत नामचीन भाईंना उमेदवारी, पोलिसांची करडी नजर, एकही चूक झाल्यास...
महिला अन् विद्यार्थ्यांना मोफत केएमटी, महिलांना आरोग्य कवच, रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट, कोल्हापूरची हद्दवाढ, जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेणार; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय काय?
टक्केवारी संपवणार, महिला अन् विद्यार्थ्यांना मोफत केएमटी, रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट, कोल्हापूरची हद्दवाढ, जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेणार; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय काय?
Pune Election 2026 BJP VS NCP: भाजपच्या 'मिशन 125'मध्ये अजितदादांचा अडसर, देवेंद्र फडणवीसांकडून पुण्यातील बड्या नेत्यांची कानउघडणी? बंद दाराआड गुप्त खलबतं
भाजपच्या 'मिशन 125'मध्ये अजितदादांचा अडसर, देवेंद्र फडणवीसांकडून पुण्यातील बड्या नेत्यांची कानउघडणी? बंद दाराआड गुप्त खलबतं
Thane Mahangarpalika Election 2026: ठाण्यातील दोन प्रभागांमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजप-शिंदे गटाचा बिनविरोधचा डाव उधळला, नेमकं काय केलं?
ठाण्यातील दोन प्रभागांमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजप-शिंदे गटाचा बिनविरोधचा डाव उधळला, नेमकं काय केलं?
Amit Deshmukh: भाजपच्या चुकीचा लातूरकरांना नाहक त्रास नको, येत्या काळात योग्य उत्तर देऊ; अमित देशमुखांचे लातूर बंद न करण्याचे आवाहन
भाजपच्या चुकीचा लातूरकरांना नाहक त्रास नको, येत्या काळात योग्य उत्तर देऊ; अमित देशमुखांचे लातूर बंद न करण्याचे आवाहन
Embed widget