Vastu Tips : सकाळी उठल्याबरोबर या पाच गोष्टी पाहू नका, नाहीतर संपूर्ण दिवस खराब होईल
Vastu Tips : सकाळच्या वेळी धर्म आणि वास्तुशास्त्रात अशुभ मानल्या गेलेल्या गोष्टींचा कधीही विसर पडू नये. अशुभ गोष्टी पाहिल्याने दिवस तर खराब होतोच, शिवाय अनेक अडचणीही निर्माण होतात.

Vastu Tips : सकाळी लवकर उठून शुभ गोष्टी पाहिल्यास संपूर्ण दिवस शुभ जातो असे मानले जाते. त्यामुळे सकाळच्या वेळी धर्म आणि वास्तुशास्त्रात अशुभ मानल्या गेलेल्या गोष्टींचा कधीही विसर पडू नये. अशुभ गोष्टी पाहिल्याने दिवस तर खराब होतोच, शिवाय अनेक अडचणीही निर्माण होतात. अशा वेळी सकाळी डोळे उघडताच या पाच गोष्टी विसरूनही पाहू नयेत.
पक्ष्यांचे चित्र पाहू नका
वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्याबरोबर देवी-देवतांची पूजा करण्यासोबतच असे काही उपक्रम करावेत ज्यामुळे संपूर्ण दिवस आनंदी जाईल. सकाळी उठल्याबरोबर असे चित्र पाहू नये, ज्यामध्ये प्राण्यांची आकृती आक्रमक आहे. अशी चित्रे पाहिल्यास अनेक अडचणी येऊ शकतात. कोणाशीही वाद होऊ शकतो.
सकाळी उठल्यावर आरशात चेहरा पाहू नका
काही लोक सकाळी उठल्याबरोबर आरशात आपला चेहरा पाहतात. वास्तुशास्त्रानुसार असे करणे अशुभ मानले जाते.
सावली पाहू नका
असे मानले जाते की सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला स्वतःची किंवा इतर कोणाचीही सावली दिसू नये. सकाळी सावली पाहणे अशुभ मानले जाते. सावली पाहिल्याने माणसांमध्ये भीती, तणाव आणि गोंधळ वाढतो.
तेल लावलेल्या भांड्याकडे पाहू नका
सकाळी उठल्याबरोबर तेल लावलेली किंवा घाणेरडी भांडी बघू नयेत. असे म्हणतात की सकाळी तेल असलेले भांडे पाहिल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे उरलेली भांडी रात्रीच स्वच्छ करावीत. ते सकाळसाठी सोडले जाऊ नये.
सकाळी उठल्यावर कुत्रे बाहेर भांडताना दिसायला नको. सकाळी उठल्यावर लगेच टॉयलेट कमोड पाहू नये.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :
- Numerology : 'या' तारखांना जन्मलेले लोक स्वभावाने श्रीमंत आणि अहंकारी असतात
- Samudra Shastra : ओठ सांगतात एखाद्या व्यक्तीचे नशीब आणि स्वभाव, कसे ते जाणून घ्या
- Chanakya Niti For Love : प्रेम जीवनातही कधीच अयशस्वी होत नाहीत ‘अशा’ व्यक्ती! जोडीदारात ‘हे’ गुण महत्त्वाचे...
Before You Go
Omraje Thackeray: ठाकरेंचा फोन, ओमराजे म्हणाले, तुम्हीच मोठं केलंय, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही



















