एक्स्प्लोर

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाच्या दिवशी भावाने बहिणीच्या घरी का जाऊ नये? देवी लक्ष्मीशी संबंधित पौराणिक कथा, शास्त्रांत सांगितलेलं कारण जाणून व्हाल थक्क 

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाच्या दिवशी भावाने बहिणीच्या घरी का जाऊ नये? यामागे अद्भूत पौराणिक कथा आणि शास्त्रातही कारण दिलंय. जाणून घ्या..

Raksha Bandhan 2025: बहिण-भाऊ ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात, तो दिवस म्हणजे रक्षाबंधन, यंदा या वर्षी रक्षाबंधनाचा सण हा 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. आपण पाहतो दरवर्षी बहिणी आपल्या भावाच्या घरी येतात आणि त्यांना राखी बांधतात. आणि त्यांच्या सुख-समृद्धीची कामना करतात. बऱ्याचदा असेही दिसून येते की, भाऊही रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहिणीच्या घरी जातात, परंतु असे चुकूनही करू नये. कारण यामागे असलेलं धार्मिक कारण जाणून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.

हिंदू धर्मात रक्षाबंधनबद्दल अनेक श्रद्धा आणि नियम

भाऊ आणि बहिणीमधील अतूट प्रेमाचा सण असलेल्या रक्षाबंधनाबद्दल हिंदू धर्मात अनेक श्रद्धा आणि नियम आहेत. जसे की राखी बांधण्याची योग्य पद्धत, भद्रा काळात राखी न बांधणे, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीचे भावाच्या घरी येणे इत्यादी. तसं पाहायला गेलं तर अनेक वेळा विविध कारणांमुळे बहीण तिच्या पालकांच्या घरी येऊ शकत नाही, म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी राखी बांधण्यासाठी जातो. तर शास्त्रांनुसार पाहायला गेलं तर, असे चुकूनही करू नये... काय आहे यामागील कारण? जाणून घ्या..

रक्षाबंधन सणाशी संबंधित एक पौराणिक कथा

रक्षाबंधनाच्या सणाशी संबंधित एक पौराणिक कथा आहे, त्यानुसार एकदा राक्षस राजा बळीने भगवान विष्णूंना प्रसन्न केले होते आणि त्यांच्याकडून अमरत्वाचे वरदान मिळवले होते, ज्यामुळे सर्व देवदेवतांना काळजी वाटली की राजा बळी त्याचा गैरवापर करेल. मग देवतांनी भगवान विष्णूंना त्यांची चिंता व्यक्त केली.

मग भगवान विष्णूने राजा बळीचा अभिमान मोडण्यासाठी वामनाचे रूप धारण केले आणि राजा बळीकडून भिक्षा म्हणून 3 पावले जमीन मागितली. राजा बळीने वामन यांची विनंती स्वीकारताच, देवाच्या वामन अवताराने एक विशाल रूप धारण केले. मग त्याने पहिल्या पावलात स्वर्ग आणि दुसऱ्या पावलात पृथ्वी मोजली. तिसऱ्या पावलासाठी, राजा बळीने वामनसमोर आपले डोके ठेवले.

जेव्हा भगवान विष्णू वैकुंठ सोडून पाताळ लोकात राहू लागले..

राजा बळीला समजले की भगवान विष्णू स्वतः भिकारी वामनच्या रूपात आले आहेत. म्हणून, त्याने तिसरे पाऊल उचलण्यासाठी स्वतःचे शरीर परमेश्वराला समर्पित केले. यामुळे भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी बळीला पाताळलोकाचा राजा बनवले.

बळी पाताळ लोकाचा राजा होताच, त्यांनी भगवान विष्णूंनाही पाताळ लोकात राहण्याची विनंती केली. मग राजा बळीच्या आग्रहावरून भगवान विष्णू वैकुंठ सोडून पाताळ लोकात राहू लागले. यामुळे देवी लक्ष्मीला काळजी वाटली.

पतीला वैकुंठात परत आणण्यासाठी देवी लक्ष्मीची रणनीती..

देवी लक्ष्मीने तिच्या पतीला वैकुंठात परत आणण्यासाठी एक रणनीती अवलंबली. तिने ब्राह्मण स्त्रीचे रूप धारण केले आणि पाताळ लोकात गेली आणि राजा बळीला आपला भाऊ बनवण्याची इच्छा व्यक्त केली. राजा बळीने आनंदाने तिची इच्छा मान्य केली आणि आई लक्ष्मीने बालीच्या मनगटावर राखी बांधताच तिने राजा बळीला तिचा पती विष्णूला परत पाठवण्यास सांगितले. राजा बळीने त्याचे वचन पाळत भगवान विष्णूला वैकुंठात परत येण्याची परवानगी दिली. तेव्हापासून असे मानले जाते की रक्षाबंधनाच्या दिवशी, नेहमीच बहिणीने तिच्या भावाच्या घरी जावे, भावाने त्याच्या बहिणीच्या घरी जाऊ नये. भाऊबीजच्या दिवशी, भावाने त्याच्या बहिणीच्या घरी जावे.

हेही वाचा :           

Numerology: मागच्या जन्माचं कर्ज या जन्मी फेडतातच, 'या' जन्मतारखेच्या लोकांना कर्मांचं फळ भोगावंच लागतं, यातून सुटका नसते, अंकशास्त्रात म्हटलंय..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget