एक्स्प्लोर

"दिवसभर कधीही बांधा लाडक्या भावाला राखी", रक्षाबंधनाला भद्रा काळ वर्ज्य नसल्याचं पंचांगकर्ते मोहन दातेंचं स्पष्टीकरण

Raksha Bandhan: पारंपरिक पद्धतीने राखी बनवण्यासाठी तांदूळ, सोने आणि पांढऱ्या मोहऱ्या किंवा दुर्वा, अक्षता, केशर, चंदन, मोहरीचे दाणे एकत्र रेशमी कापडात पुरचुंडी बांधून त्याला रंगीत दोरा बांधून राखी तयार करावी. ती देवघरात कलशावर ठेवून तिची पूजा करावी.

 सोलापूर रक्षाबंधनापेक्षा (Raksha Bandhan) अधिक चर्चा  होत आहे ती त्यादिवशी येणाऱ्या भद्रायोगाची... रक्षाबंधनासाठी भद्रा काळ हा वर्ज्य असल्याची सध्या चर्चा आहे. परंतु  पंचागकर्ते दाते गुरूजी म्हणतात भद्रा योगात देखील तुम्हाला  रक्षाबंधन  साजरे करता येणार आहे. रक्षाबंधनाच्या वेळेबाबत लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे  आणि  याचे कारण दुसरे तिसरे कोणी नसून भद्राकाळ आहे. त्यामुळे रक्षाबंधन नेमके किती वाजता करायचे याबाबत लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.  मात्र  हा संभ्रम  पंचागकर्ते मोहन दाते यांनी दूर  केला असून सोमवरी ( 19 ऑगस्ट)  दिवसभरात कोणत्याही वेळी आनंदाने  साजरा  करावा असे म्हणाले. 

यंदाच्या रक्षाबंधनला भद्रा काळ वर्ज्य नाही तसंच मुहूर्ताचीही आवश्यकता नाही. त्यामुळे सोमवारी दिवसभरात कधीही राखीपौर्णिमा साजरी करता येईल, अशी माहिती प्रसिद्ध पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली. सध्या पौराणिक पद्धतीने सहसा रक्षाबंधन साजरी होत नाही. रक्षाबंधन हे आता सामाजिक उत्सव झाल्याने दिवसभरात सोयीने केव्हाही रक्षाबंधन करता येईल. मात्र ज्यांना पौराणिक पद्धतीने रक्षाबंधन साजरे करायचे आहे त्यांनी भद्रा काळ वर्ज्य करावा अशी प्रतिक्रिया मोहन दाते यांनी दिली.

रक्षाहोम करून राखी कशी बांधवी?

पारंपरिक पद्धतीने राखी बनवण्यासाठी तांदूळ, सोने आणि पांढऱ्या मोहऱ्या किंवा दुर्वा, अक्षता, केशर, चंदन, मोहरीचे दाणे एकत्र रेशमी कापडात पुरचुंडी बांधून त्याला रंगीत दोरा बांधून राखी तयार करावी. ती देवघरात कलशावर ठेवून तिची पूजा करावी. रक्षाहोम करून ही राखी बांधवी. भद्रा काळ हा 1 वाजून 33 मिनिटापर्यंत असल्याने त्यानंतर रक्षाबंधन साजरा करता येईल. अशी माहिती प्रसिद्ध पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली. 

दिवसभर साजरा करता येणार सण

होम हवन करून केलेल्या रक्षाबंधनासाठी भद्रा काळ हा वर्ज्य सांगितला आहे. मात्र आत्ता आपण जे रक्षाबंधन साजरे करताना आपण फॅन्सी राख्या बांधतो. त्यामुळे बहिणीने भावाला राखी बांधताना, मित्राने मित्राला बांधताना, समाजबांधवांनी ऐकमेकांना बांधताना भद्रा काळ वर्ज्य करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे सोमवारी रक्षाबंधन दिवसभरात कोणत्याही वेळी आनंदाने  साजरा  करावा असे  पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितले आहे.  त्यामुळे या दिवशी भाऊ-बहिणी दिवसभर रक्षाबंधनाचा सण साजरा करू शकतात.

हे ही वाचा :

Raksha Bandhan 2024 Wishes : रक्षाबंधनाच्या भावाबहिणींना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्याचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश

 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gajkesari Rajyog 2026: मे महिना 5 राशींचं भाग्य घेऊन आला! चंद्र-गुरू युतीनं पॉवरफुल गजकेसरी योग, लक्ष्मी-कुबेराचा धनवर्षाव...
मे महिना 5 राशींचं भाग्य घेऊन आला! चंद्र-गुरू युतीनं पॉवरफुल गजकेसरी योग बनतोय, लक्ष्मी-कुबेराचा धनवर्षाव...
Lucky Zodiac Signs : 4 मेचा दिवस ठरणार भाग्याचा! भगवान शंकराच्या कृपेने धन-संपत्तीत होणार भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता
4 मेचा दिवस ठरणार भाग्याचा! भगवान शंकराच्या कृपेने धन-संपत्तीत होणार भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता
Surya Nakshatra Gochar 2026 : रोहिणी नक्षत्रात सूर्याचा होतोय प्रवेश; 'या' 3 राशींच्या बॅंक बॅलेन्समध्ये होणार वाढ, पदरात फक्त पुण्य
रोहिणी नक्षत्रात सूर्याचा होतोय प्रवेश; 'या' 3 राशींच्या बॅंक बॅलेन्समध्ये होणार वाढ, पदरात फक्त पुण्य
Shani Dhaiyya: खूप सोसलं, आता फक्त 1 च वर्ष! 2027 पर्यंत 2 राशींवर शनिची ढैय्या कायम, पैसा, करिअर, प्रेमात 'अशी' काळजी घ्याल...
खूप सोसलं, आता फक्त 1 च वर्ष! 2027 पर्यंत 2 राशींवर शनिची ढैय्या कायम, पैसा, करिअर, प्रेमात 'अशी' काळजी घ्याल...

व्हिडीओ

New Labour Code Salary Rule : दरमहा 50,000 पगार असेल तर हातात किती रक्कम येणार?
Devendra Fadnavis on Nasrapur : नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देणार- फडणवीस
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, संजय राऊतांचा निशाणा
Pravin Tarde on Nasrapur : एक घाव दोन तुकडे करा ना! नसरापूर घटनेवर प्रविण तरटे संतप्त
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, जनतेनं सरकारला ताब्यात घेतलं पाहिजे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
Kerala Elections : आमदार झाल्यासारखं वाटतंय,निकाल जाहीर होण्याआधीच भाजप नेत्याकडून 1 कोटींची पैज लावण्याचं चॅलेंज,नेमकं काय म्हणाला?
भाजप नेत्याकडून विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधीच 1 कोटींची पैज लावण्याचं चॅलेंज,नेमकं काय म्हणाला?
EPFO :  पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता, सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? जाणून घ्या महत्त्वाची अपडेट, केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता
Rajasthan Royals New Owner : आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, लक्ष्मी मित्तल बनले नवे मालक, किती पैसे खर्च केले?
आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, किती कोटींना झाली डील?
Vinesh Phogat Brij Bhushan Singh: 'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
West Bengal Election: बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
Kharegaon Toll Naka : खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
Embed widget