Holashtak 2026: सावधान! आजपासून होलाष्टक सुरू झालंय, पुढचे 8 दिवस सांभाळा, कोणते शुभ कार्य वर्जित आहेत? काय आहे कारण?
Holashtak 2026: हिंदू धर्मात होलाष्टक म्हणजे होळीच्या आधीचे 8 दिवस अत्यंत सतर्कतेचे असतात. शुभ कार्यांसाठी हा काळ वर्जित असतो. जाणून घ्या कारण..

Holashtak 2026: होळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीय. मात्र त्याच्या 8 दिवसापूर्वी होलाष्टक सुरू होतंय. हिंदू धर्मात होळीच्या आधीचे 8 दिवस अत्यंत सावधगिरीचे असतात, वैदिक पंचांगानुसार, फाल्गुन शुक्ल अष्टमी ते फाल्गुन पौर्णिमा या काळात ग्रहांचे स्वरूप उग्र असते, असे मानले जाते, त्यामुळे शुभ कार्यांसाठी हा काळ वर्जित असतो. 2026 मध्ये होलाष्टक 25 फेब्रुवारी ते 3 मार्च या काळात असेल. या काळात केलेले कार्य अपेक्षित फळ देत नाही असे मानले जाते..जाणून घ्या या काळात कोणती कार्य वर्जित असतात? तसेच यामागचे कारण काय?
होलाष्टक आरंभ: 24 फेब्रुवारी 2026, सकाळी 7:02 वाजता
समाप्ती: 3 मार्च 2026 (होलिका दहन)
कालावधी: 8 दिवस निषिद्ध
उपक्रम: लग्न, वास्तुशांती, मुंज करणे यासह सर्व शुभ कार्ये
होलाष्टक काळात कोणती कार्ये वर्जित असतात?
ज्योतिषशास्त्रानुसार या 8 दिवसांत 'शुभारंभ' टाळला जातो, कारण या काळात केलेले कार्य अपेक्षित फळ देत नाही असे मानले जाते..
- विवाह कार्य: लग्नाच्या गाठी बांधणे किंवा साखरपुडा करणे निषिद्ध आहे.
- वास्तू शांती व गृहप्रवेश: नवीन घरात प्रवेश करणे किंवा भूमीपूजन करणे टाळावे.
- नामकरण व मुंज: मुलांचे बारसे किंवा मुंज (उपनयन संस्कार) या काळात करत नाहीत.
- नवीन व्यवसाय: नवीन दुकान, ऑफिस किंवा मोठ्या व्यवसायाचा श्रीगणेशा करू नये.
- मौल्यवान खरेदी: शक्यतो नवीन वाहन, सोने किंवा मालमत्ता (Property) खरेदी करणे टाळले जाते.
होलाष्टक काळात कोणती स्वप्ने शुभ मानली जातात?
हिंदू धर्मात होलाष्टक हा काळ भक्ती आणि साधनेचा मानला जातो. कारण याच काळात भक्त प्रल्हादाने विष्णूची कठोर भक्ती केली होती. या काळात पडलेली काही स्वप्ने विशेष फलदायी मानली जातात:
- पांढरा हत्ती किंवा गाय: प्रगती आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते.
- अग्नी किंवा पेटलेली होळी: जुन्या संकटांचा नाश होऊन नवीन सुरुवात होण्याचे संकेत.
- देवतांचे दर्शन: जर स्वप्नात विष्णू, लक्ष्मी किंवा आपले कुलदैवत दिसले, तर ते अत्यंत शुभ असून तुमची भक्ती सफल होत असल्याचे लक्षण आहे.
- पाणी किंवा समुद्र: स्वप्नात स्वच्छ पाणी दिसणे म्हणजे मानसिक शांतता आणि धनलाभाचे संकेत आहेत.
- फळांनी लगडलेले झाड: संतती सुख किंवा रखडलेली कामे पूर्ण होण्याचे चिन्ह आहे.
होलाष्टकात काय करावे? (उपाय)
- जरी शुभ कार्ये वर्जित असली, धार्मिक अनुष्ठाने करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे:
- हनुमान चालीसा किंवा विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा.
- महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने आरोग्य सुधारते.
- या काळात दानधर्म केल्यास त्याचे अनेक पटीने फळ मिळते.
हेही वाचा,
Shubh Yog: 5 राशींची चिंता मिटली! आज सर्वार्थ सिद्धी योगासह जुळले अनेक शुभ संयोग, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने पैसा दुप्पट, मोठी संधी...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



















