एक्स्प्लोर

Geeta Gyan: परिस्थिती कशीही असो, बदलणार नक्की! आयुष्याचं सार सांगणारी श्रीमद्भगवद्गीता

Geeta Gyan: गीतेची ही शिकवण श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारताच्या युद्धक्षेत्रात दिली होती. गीतेत दिलेली शिकवण आजही तितकीच समर्पक आहे आणि माणसाला जीवनाचा योग्य मार्ग दाखवते.

Geeta Gyan: पुराणातील पवित्र हिंदू ग्रंथांपैकी एक म्हणजे श्रीमद्भगवद्गीता. गीता केवला एक ग्रंथ नसून, संपूर्ण आयुष्याचं सार आहे. व्यक्तीने आपल्या आयुष्यात कसं जगावं आणि कोणत्या गोष्टी आचरणात आणाव्यात हे सांगणारा आणि अधर्माचा त्याग करून धर्माच्या वाटेवर चालायला शिकवणारा हा ग्रंथ आहे. महाभारताचं युद्ध सुरु असताना श्रीकृष्णाने अजुर्नाला दिलेलं हे महत्त्वाचं ज्ञान या ग्रंथातून आजही व्यक्तीला आदर्श जीवनाचं महत्त्व सांगतं. या ग्रंथात सांगितलेली शिकवण आजही माणसाच्या कामी येणारी आहे.

गीतेची ही शिकवण श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारताच्या युद्धक्षेत्रात दिली होती. गीतेत दिलेली शिकवण आजही तितकीच समर्पक आहे आणि माणसाला जीवनाचा योग्य मार्ग दाखवते. गीतेतील वचने जीवनात अंगीकारल्याने माणसाची खूप प्रगती होते. गीता जीवनात धर्म, कर्म आणि प्रेमाचे धडे देते. गीता हे संपूर्ण जीवनाचे तत्त्वज्ञान आहे आणि त्याचे पालन करणारा व्यक्ती सर्वश्रेष्ठ आहे. गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की, परिस्थिती कितीही वाईट असली, तरी ती नेहमी सारखी नसतात. प्रत्येक परीस्थितीत बदल हा होतोच.

श्रीमद्भगवद्गीतेतील शिकवण

* गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात की, मनुष्याची परिस्थिती कितीही वाईट असली तरी, ती नेहमीच सारखी राहणार नाही. प्रत्येक गोष्टीत बदल हे होतातच, त्यामुळे माणसाने धीर सोडू नये. भगवान श्रीकृष्ण सांगतात की, देव कधीही कोणत्या व्यक्तीवर अन्याय होऊ देत नाही. जो ज्यासाठी पात्र आहे, त्याला ती गोष्ट मिळतेच.

* गीतेच्या शिकवणीनुसार भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, तुला तुझी लढाई स्वतः लढायची आहे आणि स्वतःला सावरायचं देखील आहे. यात कुणीही तुझी साथ देणार नाही. व्यक्ती त्याला जे हवं ते बनू शकतो, फक्त ध्येय निश्चित करून त्याच मार्गाने चालले पाहिजे.

* श्रीमद्भगवद्गीतेतील शिकवणीनुसार, आयुष्यात कोणतीही गोष्ट स्थायी नाही. म्हणूनच कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नका.

* कुणाच्याही सोबतीची अपेक्षा ठेवून चालल्याने ना लक्ष साध्य होत, ना आनंद मिळत. म्हणूनच मनुष्याला स्वतःच्या कर्मांवर विश्वास ठेवून एकट्यानेच चालत राहायचे आहे.

* गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात की, भयभीत होऊन दुसऱ्याच्या कर्तव्याचे पालन करण्यापेक्षा स्वधर्माचे आचरण करून मृत्यू पत्करणे सोपे आहे. अर्थात दुसऱ्याच्या कृतीची नक्कल करण्यापेक्षा आपल्या धर्माच्या मार्गावर चालून सद्गती मिळवली. दुसऱ्याच्या कृतींचे अनुकरण करताना मनात सतत भय असते.

 * श्रीकृष्ण म्हणतात की, भय संपवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वधर्माची जाण ठेवून त्याच मार्गावर चालणे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ketu Nakshatra Parivartan 2026 : केतूचं मघा नक्षत्रात होणार महासंक्रमण; 29 मार्चपासून 'या' राशींचा सुवर्णकाळ सुरु, नोकरी, पैसा, करिअर सगळंच...
केतूचं मघा नक्षत्रात होणार महासंक्रमण; 29 मार्चपासून 'या' राशींचा सुवर्णकाळ सुरु, नोकरी, पैसा, करिअर सगळंच...
Gudi Padwa 2026 : लाल, केशरी की गुलाबी? गुढी उभारताना गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी? वाचा ज्योतिषशास्त्रात काय म्हटलंय...
लाल, केशरी की गुलाबी? गुढी उभारताना गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी? वाचा ज्योतिषशास्त्रात काय म्हटलंय...
Chanakya Niti : यशस्वी व्हायचं असेल तर 'या' गोष्टी इतरांना चुकूनही सांगू नका; आयुष्यात प्रगती आणि पैसा मिळवण्यासाठी चाणक्य सांगतात...
यशस्वी व्हायचं असेल तर 'या' गोष्टी इतरांना चुकूनही सांगू नका; आयुष्यात प्रगती आणि पैसा मिळवण्यासाठी चाणक्य सांगतात...
Weekly Horoscope : पैसा, नोकरी, प्रसिद्धी आणि संपत्ती...मार्चचा दुसरा आठवडा भरभराटीचा; वाचा मेष ते मीन 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
पैसा, नोकरी, प्रसिद्धी आणि संपत्ती...मार्चचा दुसरा आठवडा भरभराटीचा; वाचा मेष ते मीन 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप
Team India Win T20 World Cup सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियानं टी-20 विश्वचषकावर कोरलं नाव

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
Mumbai Bike Taxi : मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
Buldhana Crime: सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार  
प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते, राष्ट्रवादीच्या आमदारांचं रोहित पवारांना उत्तर; महाराष्ट्राचा 'पप्पू' म्हणत पाटलांची टीका
प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते, राष्ट्रवादीच्या आमदारांचं रोहित पवारांना उत्तर; महाराष्ट्राचा 'पप्पू' म्हणत पाटलांची टीका
Embed widget