एक्स्प्लोर

Yavatmal News : मृत्युपूर्वी तो मुलांशी व्हिडीओ कॉलवर अखेरचा बोलला आणि जीव सोडला; शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले

Yavatmal News : भाऊबिजेच्या पूर्वसंध्येला एका अल्पभूधारक शेतकऱ्याने विष प्राशन करुन मृत्यूला कवटाळले.

Yavatmal News : यवतमाळच्या (Yavatmal) मारेगाव तालुक्यात भाऊबिजेच्या पूर्वसंध्येला एका अल्पभूधारक शेतकऱ्याने (Farmer) विष प्राशन करुन मृत्यूला कवटाळले. विष प्राशन केल्यानंतर मृत्यूपूर्वी तो आपल्या मुलांशी आणि पत्नीशी व्हिडीओ कॉलवर अखेरचा बोलला आणि त्याने जीव सोडला. सचिन विठ्ठल ढोरे (वय 37 वर्षे रा.चोपण) असे अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (25 ऑक्टोबर) रात्री साडे अकराच्या सुमारास उघडकीस आली. 

सचिन ढोरे यांच्याकडे पाच एकर पेक्षा कमी शेती आहे. यावरच कुटुंबाचा गाडा हाकत असताना अतिवृष्टीने उभी पिके मातीमोल झाली. या विवंचनेत असताना शासनाची मदतीची घोषणाही दिवाळीसारख्या सणात पदरी पडली नाही. त्यामुळे दिवाळी सारखा सण अंधकारमय त्याच्या वाट्याला आला. त्यामुळे आता कसे कसे जगावे असा प्रश्न त्याच्या समोर होता.

25 ऑक्टोबर म्हणजेच मंगळवारी तो शेतात गेला. सायंकाळी विष प्राशन केल्यानंतर त्याने पत्नीला व्हिडीओ कॉल केला. मला मुलांशी अखेरचे बोलायचे आहे, त्यांचा चेहरा बघायचा आहे, असं त्याने सांगितलं. त्याच्या या वक्तव्याने पत्नी काही क्षण हादरली. मात्र तो चेष्टा करत असावा, असं तिने मोबाईल फोन मुलांकडे दिला. यानंतर सचिनने मुलांशी बोलली आणि फोन बंद करुन जगाचा निरोप घेतला.

नापिकी आणि कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून भंडाऱ्यात शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवलं
सततच्या नापिकीला कंटाळून तसेच मित्र मंडळीकडून व पत संस्था, बँक आणि सोसायटीतून घेतलेले कर्ज कसे परतफेड करायचे या विवंचनेतून 55 वर्षीय शेतकऱ्याने गावातीलच ग्रामपंचायतजवळच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तर्री मिन्सी येथे घडली आहे. राजेंद्र वासुदेव शांतलवार असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी अड्याळ पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद केली गेली आहे.

औरंगाबादमध्ये नुकसानीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
औरंगाबादमधील शेतकऱ्याने ऐन दिवाळीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीला कंटाळून आत्महत्या केली होती. कन्नड तालुक्यातील नादरपूर शिवारात रविवारी (23 ऑक्टोबर) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली होती. पंडित एकनाथ निकम (वय 47 वर्षे) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. सतत पडत असलेल्या पावसाने पिके मातीमोल झाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या पंडित यांनी लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन मृत्युला कवटाळले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कांद्याच्या दरात मोठी घसरण, उत्पादन खर्चही निघेना, शेतकरी संघटना आक्रमक, 1500 रुपये अनुदान देण्याची मागणी 
कांद्याच्या दरात मोठी घसरण, उत्पादन खर्चही निघेना, शेतकरी संघटना आक्रमक, 1500 रुपये अनुदान देण्याची मागणी 
दोन एकरवरील केळीची बाग अज्ञाताने टाकली तोडून, शेतकऱ्याचं 10 लाख रुपयांचं नुकसान, करमाळ्यात धक्कादायक प्रकार
दोन एकरवरील केळीची बाग अज्ञाताने टाकली तोडून, शेतकऱ्याचं 10 लाख रुपयांचं नुकसान, करमाळ्यात धक्कादायक प्रकार
Nagpur News: राज्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे पुनर्गठन होणार; सहकार क्षेत्राचे बळकटीकरणाचे उद्दिष्ट की भाजपची राजकीय खेळी?
राज्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे पुनर्गठन होणार; सहकार क्षेत्राचे बळकटीकरण कि गाव पातळीवरील सहकारी क्षेत्रात पाय रोवण्याचा भाजपचा प्रयत्न?
पाकिस्तानची स्थिती गंभीर! अन्न संकटाचा मोठा धोका, अहवालातून धक्कादायक माहिती समोर  
पाकिस्तानची स्थिती गंभीर! अन्न संकटाचा मोठा धोका, अहवालातून धक्कादायक माहिती समोर  

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
Maharashtra Rajya Sabha Election: आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
Sanjay Raut: दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
Rohit Pawar on VSR: ..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
Nashik Crime: गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; इगतपुरीच्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
Maharashtra Rajya Sabha Election: राज्यसभेसाठी भाजपकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी, एका महिलेचाही समावेश, पण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं काय?
राज्यसभेसाठी भाजपकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी, एका महिलेचाही समावेश, पण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं काय?
Vasai Crime News: 5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
Embed widget