एक्स्प्लोर

Yavatmal News : मृत्युपूर्वी तो मुलांशी व्हिडीओ कॉलवर अखेरचा बोलला आणि जीव सोडला; शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले

Yavatmal News : भाऊबिजेच्या पूर्वसंध्येला एका अल्पभूधारक शेतकऱ्याने विष प्राशन करुन मृत्यूला कवटाळले.

Yavatmal News : यवतमाळच्या (Yavatmal) मारेगाव तालुक्यात भाऊबिजेच्या पूर्वसंध्येला एका अल्पभूधारक शेतकऱ्याने (Farmer) विष प्राशन करुन मृत्यूला कवटाळले. विष प्राशन केल्यानंतर मृत्यूपूर्वी तो आपल्या मुलांशी आणि पत्नीशी व्हिडीओ कॉलवर अखेरचा बोलला आणि त्याने जीव सोडला. सचिन विठ्ठल ढोरे (वय 37 वर्षे रा.चोपण) असे अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (25 ऑक्टोबर) रात्री साडे अकराच्या सुमारास उघडकीस आली. 

सचिन ढोरे यांच्याकडे पाच एकर पेक्षा कमी शेती आहे. यावरच कुटुंबाचा गाडा हाकत असताना अतिवृष्टीने उभी पिके मातीमोल झाली. या विवंचनेत असताना शासनाची मदतीची घोषणाही दिवाळीसारख्या सणात पदरी पडली नाही. त्यामुळे दिवाळी सारखा सण अंधकारमय त्याच्या वाट्याला आला. त्यामुळे आता कसे कसे जगावे असा प्रश्न त्याच्या समोर होता.

25 ऑक्टोबर म्हणजेच मंगळवारी तो शेतात गेला. सायंकाळी विष प्राशन केल्यानंतर त्याने पत्नीला व्हिडीओ कॉल केला. मला मुलांशी अखेरचे बोलायचे आहे, त्यांचा चेहरा बघायचा आहे, असं त्याने सांगितलं. त्याच्या या वक्तव्याने पत्नी काही क्षण हादरली. मात्र तो चेष्टा करत असावा, असं तिने मोबाईल फोन मुलांकडे दिला. यानंतर सचिनने मुलांशी बोलली आणि फोन बंद करुन जगाचा निरोप घेतला.

नापिकी आणि कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून भंडाऱ्यात शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवलं
सततच्या नापिकीला कंटाळून तसेच मित्र मंडळीकडून व पत संस्था, बँक आणि सोसायटीतून घेतलेले कर्ज कसे परतफेड करायचे या विवंचनेतून 55 वर्षीय शेतकऱ्याने गावातीलच ग्रामपंचायतजवळच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तर्री मिन्सी येथे घडली आहे. राजेंद्र वासुदेव शांतलवार असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी अड्याळ पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद केली गेली आहे.

औरंगाबादमध्ये नुकसानीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
औरंगाबादमधील शेतकऱ्याने ऐन दिवाळीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीला कंटाळून आत्महत्या केली होती. कन्नड तालुक्यातील नादरपूर शिवारात रविवारी (23 ऑक्टोबर) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली होती. पंडित एकनाथ निकम (वय 47 वर्षे) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. सतत पडत असलेल्या पावसाने पिके मातीमोल झाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या पंडित यांनी लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन मृत्युला कवटाळले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Parrot Crop Damage: पोपटांनी डाळिंबांचा फडशा पाडला, हायकोर्टात तब्बल 10 वर्ष खटला चालला, अखेर शेतकरी जिंकला, फडणवीस सरकारला भरपाई देण्याचे आदेश
पोपटांनी डाळिंबांचा फडशा पाडला, हायकोर्टात तब्बल 10 वर्ष खटला चालला, अखेर शेतकरी जिंकला, फडणवीस सरकारला भरपाई देण्याचे आदेश
राज्यभरातील 85 हजार कृषी सेवा केंद्र आजपासून बेमुदत संपावर; अनेक राज्यातील कृषी केंद्र चालकांचा पाठिंबा, शेतकऱ्यांवर थेट परिणाम होण्याची शक्यता, मागण्या काय?
राज्यभरातील 85 हजार कृषी सेवा केंद्र आजपासून बेमुदत संपावर; अनेक राज्यातील केंद्र चालकांचा पाठिंबा, खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता
धक्कादायक! पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळला, अहिल्यानगरमध्ये खळबळ
धक्कादायक! पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळला, अहिल्यानगरमध्ये खळबळ
साताऱ्याच्या घाट परिसरात शेतकऱ्यानं फुलवली सफरचंद बाग, राज्यभर गाजतोय प्रयोग, बाग पाहण्यासाठी मोठी गर्दी
साताऱ्याच्या घाट परिसरात शेतकऱ्यानं फुलवली सफरचंद बाग, राज्यभर गाजतोय प्रयोग, बाग पाहण्यासाठी मोठी गर्दी

व्हिडीओ

Devendra Fadnavis PC : शिवरायांचा कुणीही अपमान करू शकत नाही, गरज नसताना वाद सुरू करण्यात आला
Rohit Pawar PC : पैशांची उलाढाल,दादांच्या घराबाहेर काळी पूजा,खरातचा संबंध,रोहित पवारांचे स्फोटक आरोप
Vishal Patil Speech On Ramdas Athawale : आठवलेंची राज्यसभेवर फेरनिवड, विशाल पाटलांचं जोरदार भाषण!
Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस बाकी, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, शिवसेना कोणाला संधी देणार?
पक्षांतर्गत नाराजी, नेत्यांची वक्तव्य ते विधानपरिषदेची उमेदवार निवड, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे
संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे
Parth Pawar : एकीकडे रोहित पवार व्हीएसआर विरोधात आक्रमक, दुसरीकडे पार्थ पवारांचा VSR च्या विमानातून मुंबई ते पुणे प्रवास, कारण समोर
रोहित पवार व्हीएसआर विरोधात आक्रमक, पार्थ पवारांकडून VSR च्याच विमानाचा वापर, मुंबई ते पुणे प्रवास
सिद्धेश्वर एक्सप्रेस 7 तास उशिरा, आजची वंदे भारतही रद्द; पुण्यात कोच घसरल्याने मुंबई सोलापूरच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम
सिद्धेश्वर एक्सप्रेस 7 तास उशिरा, आजची वंदे भारतही रद्द; पुण्यात कोच घसरल्याने मुंबई सोलापूरच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम
चिमुकलीचं भाषण, क्रिकेटचा देव पाहातच राहिला; सचिन तेंडुलकरची 4 थी शिकणाऱ्या विद्यार्थीनीला शाबासकी
चिमुकलीचं भाषण, क्रिकेटचा देव पाहातच राहिला; सचिन तेंडुलकरची 4 थी शिकणाऱ्या विद्यार्थीनीला शाबासकी
फडणवीस म्हणाले, नाहीतर तुम्हीच माझं नाव बदला; सोलापूरला वाढवण बंदराशी जोडणार, लवकरच आयटी पार्कही सुरू होणार
फडणवीस म्हणाले, नाहीतर तुम्हीच माझं नाव बदला; सोलापूरला वाढवण बंदराशी जोडणार, लवकरच आयटी पार्कही सुरू होणार
Embed widget