कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, अन्यथा महागात पडेल, रोहित पवारांचा इशारा, लासलगावमध्ये करणार एल्गार
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. या मुद्यावरुन आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे.
Rohit Pawar on Onion Prices : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा 2 ते 3 रुपये किलो दरानं विकावा लागत आहे. त्यामुळे पिकासाठी केलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे. या मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी रोहित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार ?
कांद्याचे साधारणपणे एकरी 5 ट्रॉली होणारे उत्पादन यंदा अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे दोन तीन ट्रॉलीवर येऊन उत्पादनात निम्म्यापेक्षाही अधिक घट झाली आहे. अशी स्थिती असताना “उत्पादन अधिक आहे आणि खरीददार कमी असल्याने कांद्याचे दर कोसळले” या आशयाचे राज्याच्या प्रमुखांचे वक्तव्य शेतकऱ्यांची थट्टा करणारे नाही का? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. एवढी असंवेदनशील वक्तव्य करणे योग्य नाहीत. कदाचित या सरकारला संवेदनशील मार्गाची भाषा कळत नसावी. बाहेर देशांमध्ये केंद्रीय नेतृत्वाने इतक्या चकरा मारुनही आपला कांदा बाहेर देशात जात नाही हे केंद्र सरकारच्या धोरणांचे अपयश नाही का? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, अन्यथा महागात पडेल असा इशारा देखील रोहित पवारांनी दिला आहे. याबाबत उद्या सकाळी 9 वाजता लासलगावमध्ये सविस्तर बोलणार असल्याचे रोहित पवार म्हणाले.
राज्यात कांद्याचे दर कोसळल्यामुळे शेतकरी हवालदिल
राज्यात कांद्याचे दर कोसळल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आखाती देशातील युद्ध, निर्यात बंदी आणि निसर्गाच्या प्रकोपामुळे कांद्याचा खर्चही (Onion Price Crisis) निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी आज प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने कांद्याला किमान 2 ते 3 हजार हमीभाव द्यावा तसेच प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान द्यावे. नाफेडमार्फत कांदा खरेदी (Onion Price) सुरू करावी. केंद्र सरकारशी समन्वय साधून दीर्घकालीन स्थिर निर्यात धोरण लागू करावे अशा अनेक मागण्याशेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत.
12 रुपये 35 पैशांनी कांद्याची खरेदी सुरु करण्याचा निर्णय
आमचा कांद्याचा शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, अनेक शेतकरी कांद्याला एक रुपये भाव मिळतो म्हणून कांदे फेकून द्यायला निघाले आहेत. म्हणून मी कृषीमंत्री शिवराज सिंह चौहानांना सांगितलं, काही झालं तरी कांदा विकत घ्या, कांद्याचं शेल्फ लाईफ जास्त नाही. त्याची खरेदी, साठवणूक करुन तो पुन्हा बाजारात आणायचा, हे सगळं अडचणीचं असतं. पण आपल्या विनंतीला मान देऊन आजपासून महाराष्ट्रात शिवराज सिंह चौहान आणि पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्त्वात 12 रुपये 35 पैशांनी कांद्याची खरेदी सुरु होत आहे.
महत्वाच्या बातम्या:
Devendra Fadnavis: कांदा उत्पादकांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, केंद्र सरकार किती भावाने खरेदी करणार? साताऱ्याच्या सभेत सांगितला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या इकॉनॉमीचा मास्टरप्लॅन
Before You Go
Dharashiv Crop Loss : धाराशिवमध्ये अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल






















