एक्स्प्लोर

Rice production : यंदा तांदळाच्या उत्पादनात होणार घट, कमी पावसाचा परिणाम, किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता 

कमी पावसामुळं यंदा देशात तांदळाच्या उत्पादनात (Rice production) घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अपुऱ्या पावसामुळं यंदा भाताच्या लागवडीत घट झाली आहे.

Rice production : देशातील काही भागात सध्या जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे, तर ठिकाणी अद्याप चांगला पाऊस झालेला नाही. देशातील अनेक ठिकाणी शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र दिसत आहे. कमी पावसामुळं यंदा देशात तांदळाच्या उत्पादनात (Rice production) घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अपुऱ्या पावसामुळं यंदा भाताच्या लागवडीत घट झाली आहे. त्यामुळं गेल्या तीन वर्षांचा विचार केला तर यंदा तांदळाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

यंदा तांदळाचे उत्पादन घटण्याची शक्यता 

भारतात यंदा मान्सूनचा पाऊस कमी झाला आहे. देशातील अनेक भागात पावसामुळं परिस्थिती बिकट असतानाचं, अनेक भागात अजिबात पाऊस झालेला नाही. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. कमी पावसामुळं यंदा तांदळाच्या लागवडीत देखील घट झाल्याचे दिसून येत आहे. भारत हा तांदळाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. मात्र, यंदा मागील तीन वर्षाच्या तुलनेत तांदळाचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळं यंदा जगभरात खाद्यपदार्थांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. तसेच पावसाच्या कमतरतेमुळं यंदा भारतातही भाताच्या लागवडीत घट झाली असल्यानं भाताच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

जगातील एकूण तांदूळ व्यापारात भारताचा वाटा 40 टक्के

तांदळाच्या उत्पादनात घट होण्याच्या भितीनं व्यापारी देखील चिंतेत आहे. भारतात आधीच महागाई वाढली आहे. त्यामुळं निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. भाताची पेरणी कमी झाल्यामुळं देशात तांदळाची टंचाई निर्माण होऊ शकते, त्यामुळं सरकार पुन्हा तांदळाची निर्यात थांबवण्याची शक्यता आहे. दरम्यान, जगातील एकूण तांदूळ व्यापारात भारताचा वाटा 40 टक्के आहे. भारत सरकारने यापूर्वीच गहू आणि साखरेच्या निर्यातीवर बंदी घालून स्थानिक बाजारपेठेतील किमती नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे.

तांदळाच्या किंमतीत 10 टक्क्यांची वाढ

भारतात गेल्या काही दिवसांपासून तांदळाच्या किंमतीत वाढ झाली आहे. देशात दोन आठवड्यांत तांदळाच्या काही जातींच्या किंमती 10 टक्क्यांनी वाढल्या आहेत. पश्चिम बंगाल, ओडिसा, छत्तीसगड या राज्यांमध्ये भाताचे उत्पादन जास्त आहे. मात्र, यावेळी कमी पावसामुळं भाताची पेरणी कमी झाली आहे. यासोबतच बांगलादेशसारख्या देशातूनही तांदळाची मागणी वाढली आहे. त्यामुळं तांदळाचे दरही वाढले आहेत. सप्टेंबरमध्ये तांदूळ निर्यातीची किंमत प्रति टन 400 डॉलरपर्यंत वाढू शकते. दरम्यान, जगभरात पिकवल्या जाणाऱ्या तांदळाचा सर्वाधिक वापर आशियाई देशांमध्ये होतो. त्यानुसार, आशियाई देशांच्या राजकीय आणि आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं तांदूळ ही महत्त्वाचं पिकं आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे यंदा गहू आणि मक्याच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

 Maharashtra Farm Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
Farmers Loan Waiver: राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   
Agriculture News: स्वयंपाकघरापासून औषधांपर्यंत... वर्षभर कायम मागणी; बडीशेप लागवड ठरू शकते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय
स्वयंपाकघरापासून औषधांपर्यंत... वर्षभर कायम मागणी; बडीशेप लागवड ठरू शकते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, आयुक्तांचे आदेश
विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, आयुक्तांचे आदेश
Gold Silver Rate : सोने चांदीच्या दरात मोठी वाढ, सोने 2300 रुपयांनी महागले, जाणून घ्या सोने चांदीचे लेटेस्ट दर
सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ, चांदी 3000 रुपयांनी महागली, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
तुमच्यामुळेच मी राजकारणात पाऊल टाकलं, अमोल कोल्हे भावूक; दिलीप सोपलांना एका वाक्यातच व्यक्त केलं सारं
तुमच्यामुळेच मी राजकारणात पाऊल टाकलं, अमोल कोल्हे भावूक; दिलीप सोपलांना एका वाक्यातच व्यक्त केलं सारं
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
Embed widget