एक्स्प्लोर

Rice production : यंदा तांदळाच्या उत्पादनात होणार घट, कमी पावसाचा परिणाम, किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता 

कमी पावसामुळं यंदा देशात तांदळाच्या उत्पादनात (Rice production) घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अपुऱ्या पावसामुळं यंदा भाताच्या लागवडीत घट झाली आहे.

Rice production : देशातील काही भागात सध्या जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे, तर ठिकाणी अद्याप चांगला पाऊस झालेला नाही. देशातील अनेक ठिकाणी शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र दिसत आहे. कमी पावसामुळं यंदा देशात तांदळाच्या उत्पादनात (Rice production) घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अपुऱ्या पावसामुळं यंदा भाताच्या लागवडीत घट झाली आहे. त्यामुळं गेल्या तीन वर्षांचा विचार केला तर यंदा तांदळाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

यंदा तांदळाचे उत्पादन घटण्याची शक्यता 

भारतात यंदा मान्सूनचा पाऊस कमी झाला आहे. देशातील अनेक भागात पावसामुळं परिस्थिती बिकट असतानाचं, अनेक भागात अजिबात पाऊस झालेला नाही. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. कमी पावसामुळं यंदा तांदळाच्या लागवडीत देखील घट झाल्याचे दिसून येत आहे. भारत हा तांदळाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. मात्र, यंदा मागील तीन वर्षाच्या तुलनेत तांदळाचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळं यंदा जगभरात खाद्यपदार्थांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. तसेच पावसाच्या कमतरतेमुळं यंदा भारतातही भाताच्या लागवडीत घट झाली असल्यानं भाताच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

जगातील एकूण तांदूळ व्यापारात भारताचा वाटा 40 टक्के

तांदळाच्या उत्पादनात घट होण्याच्या भितीनं व्यापारी देखील चिंतेत आहे. भारतात आधीच महागाई वाढली आहे. त्यामुळं निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. भाताची पेरणी कमी झाल्यामुळं देशात तांदळाची टंचाई निर्माण होऊ शकते, त्यामुळं सरकार पुन्हा तांदळाची निर्यात थांबवण्याची शक्यता आहे. दरम्यान, जगातील एकूण तांदूळ व्यापारात भारताचा वाटा 40 टक्के आहे. भारत सरकारने यापूर्वीच गहू आणि साखरेच्या निर्यातीवर बंदी घालून स्थानिक बाजारपेठेतील किमती नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे.

तांदळाच्या किंमतीत 10 टक्क्यांची वाढ

भारतात गेल्या काही दिवसांपासून तांदळाच्या किंमतीत वाढ झाली आहे. देशात दोन आठवड्यांत तांदळाच्या काही जातींच्या किंमती 10 टक्क्यांनी वाढल्या आहेत. पश्चिम बंगाल, ओडिसा, छत्तीसगड या राज्यांमध्ये भाताचे उत्पादन जास्त आहे. मात्र, यावेळी कमी पावसामुळं भाताची पेरणी कमी झाली आहे. यासोबतच बांगलादेशसारख्या देशातूनही तांदळाची मागणी वाढली आहे. त्यामुळं तांदळाचे दरही वाढले आहेत. सप्टेंबरमध्ये तांदूळ निर्यातीची किंमत प्रति टन 400 डॉलरपर्यंत वाढू शकते. दरम्यान, जगभरात पिकवल्या जाणाऱ्या तांदळाचा सर्वाधिक वापर आशियाई देशांमध्ये होतो. त्यानुसार, आशियाई देशांच्या राजकीय आणि आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं तांदूळ ही महत्त्वाचं पिकं आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे यंदा गहू आणि मक्याच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा धुमाकूळ, शेती पिकांना मोठा फटका, शेतकरी चिंतेत
राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा धुमाकूळ, शेती पिकांना मोठा फटका, शेतकरी चिंतेत
राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार, मंत्री मुश्रीफांची माहिती, विरोधकांवर टीका
राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार, मंत्री मुश्रीफांची माहिती, विरोधकांवर टीका
आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा, घराचे छप्पर कोसळून वृद्धाचा मृत्यू,  शेती पिकांचंगी मोठं नुकसान
आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा, घराचे छप्पर कोसळून वृद्धाचा मृत्यू,  शेती पिकांचंगी मोठं नुकसान
1200 एकरवर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारणार, निर्यात व्यवस्था बळकट करणार : जयकुमार रावल
1200 एकरवर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारणार, निर्यात व्यवस्था बळकट करणार : जयकुमार रावल

व्हिडीओ

Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market Crash : अमेरिकेत AI कंपन्यांचा फुगा फुटला, 2026 मधील सर्वात मोठी घसरण, भारताला फायदा होणार, तज्ज्ञांनी काय सांगितलं?
अमेरिकेत AI कंपन्यांचा फुगा फुटला, 2026 मधील सर्वात मोठी घसरण, भारताला फायदा होणार, तज्ज्ञांनी काय सांगितलं?
Nagpur Crime: नागपूरमध्ये देवीच्या मंदिरात चोरी, पाया पडल्यानंतर चोराने गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र खेचलं, पाहा PHOTOs
नागपूरमध्ये देवीच्या मंदिरात चोरी, पाया पडल्यानंतर चोराने गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र खेचलं, पाहा PHOTOs
US Share Market Crash : अमेरिकेन शेअर बाजारात हाहाकार, 2 ट्रिलियन डॉलर बुडाले, भारतीय शेअर बाजाराची धाकधूक वाढली, ब्लॅक मंडेची भीती 
ज्याची भीती होती तेच घडलं, अमेरिकेत AI कंपन्यांचे शेअर्स कोसळले, आता भारतीय शेअर मार्केटमध्ये 'ब्लॅक मंडे'चे संकेत
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, लक्झरी बसचा चेंदामेंदा, प्रवासी बसमध्येच अडकले
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, लक्झरी बसचा चेंदामेंदा, प्रवासी बसमध्येच अडकले
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
Rajendra Jain: प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
Bachchu Kadu on Devendra Fadnavis: विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
Sunil Tatkare: सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
Embed widget