एक्स्प्लोर

Sharad Pawar on Organic Farming : सेंद्रीय शेतीला गती देण्यासाठी प्रयत्न करणार, उत्पादन आणि मार्केटिंगबाबत केंद्र आणि राज्य सरकारबरोबर बैठक घेणार : शरद पवार

Sharad Pawar on Organic Farming : सेंद्रीय शेतीला गती देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. मोर्फाच्या राज्यस्तरीय संचालक व जिल्हा अध्यक्षांच्या बैठकीत पवार बोलत होते.

Sharad Pawar on Organic Farming : सेंद्रीय शेती उत्पादनांचे महत्त्व जगभरात वाढत आहे. त्यामुळं सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देऊन त्यांच्या उत्पादन व मार्केटिंग बाबतच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्य सरकार आणि केंद्र सरकार बरोबर बैठक घेणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं. सेंद्रीय शेतीला गती देण्यासाठी प्रयत्न करणार आसल्याचं त्यांनी सांगितलं.

कन्हेरी येथे महा ऑरगॅनिक ॲन्ड रेश्युड्युफ्री फार्मर्स असोशिएशन अर्थात मोर्फा च्या राज्यस्तरीय संचालक व जिल्हा अध्यक्षांच्या बैठकीत पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मोर्फाचे तज्ञ संचालक युगेंद्र पवार, अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे, उपाध्यक्ष स्वाती शिंगाडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. राज्यभरातील सेंद्रीय शेतीच्या अडचणी व मार्केटिंगसाठी शासनाची मदत कशी आवश्यक असल्याचे अंकुश पडवळे म्हणाले. 


Sharad Pawar on Organic Farming : सेंद्रीय शेतीला गती देण्यासाठी प्रयत्न करणार, उत्पादन आणि मार्केटिंगबाबत केंद्र आणि राज्य सरकारबरोबर बैठक घेणार : शरद पवार

राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यात काही वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने घेतली जातात. तसेच ज्या फळपिकांना राज्यात जीआय मानांकन मिळाले आहे, अशा पिकांवर लक्ष देऊन त्या फळपिकांतील सेंद्रीय उत्पादनाबाबत आपण मोर्फाच्या माध्यमातून पुढाकार घेऊन प्रयत्न करावा असेही पवार म्हणाले. सेंद्रीय शेतीमध्ये मातीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळं सर्वांनी जमीनीचे आरोग्य व जमीनीचा सेंद्रीय कर्ब वाढवण्यासाठी प्रयत्न केले तरच सेंद्रिय शेती सोपी होऊ शकते. त्यामुळं यापुढे राज्यभरातील शेतकऱ्यांना मोर्फाने सेंद्रिय शेतीसाठी मार्गदर्शकाची भुमिका वठवावी असा सल्लाही शरद पवार यांनी दिला.


Sharad Pawar on Organic Farming : सेंद्रीय शेतीला गती देण्यासाठी प्रयत्न करणार, उत्पादन आणि मार्केटिंगबाबत केंद्र आणि राज्य सरकारबरोबर बैठक घेणार : शरद पवार

जगभरात आरोग्याच्या दृष्टीनं कमालीची जागृकता आली आहे. त्यामुळं सेंद्रिय शेती उत्पादनांना भविष्यात मोठी मागणी वाढणार आहे.  त्यादृष्टीनं राज्यातील शेतकऱ्यांनी सावध पावलं उचलून सेंद्रीय शेती वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. सेंद्रिय शेतीच्या असलेल्या आपल्या अडचणीबाबत मी स्वतः मोर्फा पदाधिकाऱ्यांसमवेत राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

आज बारामतीतील कन्हेरी येथे मोर्फाची राज्यस्तरीय बैठक आयोजीत केली होती. यावेळी राज्यभरातील विविध ठिकाणाहून मोर्फाचे संचालक आले होते. या सर्व संचालकांनी त्यांच्या त्यांचा भागातील माहिती शरद पवार यांना दिली. त्यानंतर शरद पवार यांनीही त्यांना मार्गदर्शन केले. तसेच सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देणं त्यांच्या उत्पादन व मार्केटिंग बाबतच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार बरोबर बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Shetkari Kajmafi : मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget