एक्स्प्लोर

दुष्काळी गाव म्हणून जिथं लग्नासाठी मुली देण्यासही नकार दिला जायचा! असं दुष्काळी हिंगणगाव झालं पाणीदार

Ahmednagar Hingangaon village story सिंचन आणि शाश्वत पाण्याची उपलब्धता नसल्याने काही वर्षांपूर्वी गावातील युवकांना सोयरीक देखील मिळत नव्हती, मात्र आता गावाची वाटचाल बागायती गावाकडे सुरू आहे.

अहमदनगर : पाणीटंचाई आणि दुष्काळी गाव म्हणून अहमदनगरच्या हिंगणगावात लग्नासाठी मुली देण्यासही नकार दिला जायचा. दुष्काळ जणू पाचविलाच पुजलेला, अशीच काहीशी अवस्था हिंगणगावची होती. मात्र, इथल्या नागरिकांनी लोकसहभाग, सरकारी निधीतून गाव पाणीदार केलंय. जिथे पिण्याच्या पाण्याची वानवा होती, त्या गावशिवारात तब्बल तीनशे एकर उसाची लागवड करण्यात आली आहे.

अहमदनगरपासून पंधरा किमी अंतरावर वसलेलं हिंगणगाव. खरं तर काही वर्षांपूर्वी हिंगणगाव हे दुष्काळी गाव म्हणून ओळखलं जायचं. उन्हाळ्यातच काय तर बाराही महिने या गावात पिण्याच्या पाण्याची वाणवा असायची. जिथे हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागायची तिथे शेती सिंचनाचा विषय दुरच. हीच गोष्ट लक्षात घेऊन गावकऱ्यांनी लोकसहभागातून आणि सरकारी निधीतून जलसंधारणाचे काम हाती घेतले.. उंबरनाला आणि जामगाव नाला या दोन ओढ्यांवर सुरुवातीला एक बंधारा बांधला. त्याचा परिणाम जाणवू लागल्याने ग्रामस्थांनी तब्बल अकरा बंधारे बांधले.

बंधारे बांधल्याने गावच्या पाणीपातळीत वाढ झाली, त्यामुळे पीकपद्धतीत बदल झाला. जिरायती शिवार बागायती झालं. दरवर्षी उन्हाळ्यात सातत्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागणाऱ्या हिंगणगावात हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट व्हायची, गावातील युवकांना दूरवरून ड्रमने पाणी आणावं लागायचं, मात्र, पाणी टंचाई दूर झाल्याने गावाच्या महिलांनीही समाधान व्यक्त केलंय.

सिंचन आणि शाश्वत पाण्याची उपलब्धता नसल्याने काही वर्षांपूर्वी गावातील युवकांना सोयरीक देखील मिळत नव्हती, मात्र आता गावाची वाटचाल बागायती गावाकडे सुरू आहे.

जिल्हा परिषद आणि अन्य निधीतून अकरा बंधाऱ्यांची साखळी तयार करण्यात आली. जवळपास एक कोटी रुपयांच्या जलसंधारणाची कामे गावात झाली. बंधाऱ्यातील साठलेला गाळ काढण्यात आला. ओढ्याचे खोलीकरण, बांधऱ्यांची दुरुस्ती, नवीन बंधाऱ्यांची कामे झाली. परिणामी गावशिवार पाणीदार होऊ लागला. पिण्याच्या पाण्यासाठी सरकारी टँकरची वाट पाहावी लागणाऱ्या हिंगणगावात आता पाणीपातळीत कमालीची वाढ झालीये. हिंगणगावात सुमारे 770 हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील साधारण चाळीस हेक्टर क्षेत्र पडीक होत आता या पडीक क्षेत्राचाही सिंचनाचा प्रश्न सुटला आहे. भर उन्हाळ्यातही या बंधाऱ्यामध्ये पाणी दिसत आहे.

मागच्या एक वर्षापासून एबीपी माझा सोबत कार्यरत...8 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत... व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Dattatray Bharane: शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
नाशिकच्या NCCF खरेदी केंद्रावर पर राज्यातील हलक्या प्रतीचा कांदा, शेतकऱ्यांनी अडवले 20 ते 35 ट्रक, सखोल चौकशी करण्याची मागणी
नाशिकच्या NCCF खरेदी केंद्रावर पर राज्यातील हलक्या प्रतीचा कांदा, शेतकऱ्यांनी अडवले 20 ते 35 ट्रक, सखोल चौकशी करण्याची मागणी
सावधान! राज्यातील 'या' भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, पुढील तीन दिवस कसं असणार हवामान? 
सावधान! राज्यातील 'या' भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, पुढील तीन दिवस कसं असणार हवामान? 

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget