एक्स्प्लोर

Onion Prices Fall : कांद्याच्या दरात घसरण झाल्यानं बळीराजाच्या डोळ्यात पाणी, लहरी वातावरणामुळं उत्पन्नातही घट

सध्या कांद्याला मातीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. आधीच शेतकरी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करतोय. त्यातच पुन्हा शेतमालाला दर मिळत नसल्याचे शेतकरी अडचणीत आहे.

Onion Prices Fall  : अहमदनगर जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात उन्हाळी कांदा काढणीला वेग आला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात कांद्यांच्या लागवडी झाल्या आहेत. मागील नोव्हेंबर महिन्यात कांदा लागवडी झालेल्या पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी कांद्यावर नांगर फिरवला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा नव्या जोमानं कांदा लागवड केली होती. त्यातच मजूर टंचाई, विजेच्या लपंडाव, रासायनिक खते व औषधांचा वाढता खर्च अशा सर्व अडचणींवर मात करत शेतकर्‍यांनी आपला कांदा आणला. पण, सध्या त्याच्या कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्यानं कांद्यानं शेतकर्‍यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणल्याची स्थिती आहे.

आधीच राज्यातील शेतकरी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करतोय. अशातच त्यांच्या शेतमालाला दर मिळत नसल्याने त्याच्यावर दुहेर संकट येत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे क्षेत्र असते. मात्र, सध्या या कांद्याला दर मिळत नसल्याने बळीराजा चिंतेत आहे. उन्हाळी कांदा काढणीला सध्या वेग आला असला तरी या अपेक्षित उत्पन्नात निम्म्याने घट झाली आहे. अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्यानं शेतकर्‍यांचा खर्च देखील निघणार नाही, असे चित्र दिसत आहे.
 
सुरुवातीच्या कांद्याला बाराशे ते चौदाशे रुपयांचा जागेवर भाव मिळाला. मात्र, सध्या कांद्याला सातशे ते आठशे रुपये भाव मिळत आहे. परिसरात अजूनही बराच कांदा काढणीचा बाकी आहे. एप्रिल महिन्यात सर्व शेतकर्‍यांचा कांदा काढून होईल असा अंदाज आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचा सर्व कांदा काढून झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात येईल, त्यामुळं भावात अजून मोठी घसरण होण्याचे शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी सध्या धास्तावल्याचे चित्र दिसत आहे. 

लहरी वातावरणामुळे कांदा पिकाच्या उत्पन्नात निम्यानं घट

दरवर्षी साधारण मला एकरी उत्पन्न अठरा ते एकोणीस टनापर्यंत मिळते. मात्र, लहरी वातावरणामुळं यंदा कांदा पिकाच्या उत्पन्नात निम्यानं घट झाली आहे. त्यातच भरमसाठ खर्च झाल्यानं खर्च देखील निघणार नाही अशी अवस्था आहे. बाजार समितीत जरी कांद्याला 1 हजार 200 ते 1 हजार 300 रुपयांचा दर मिळत असला तरी जागेवर कांद्याला 700 ते 800 रुपयांचा दर मिळत आहे. त्यातच उत्पन्न घटल्याने खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याचे शेतकरी विजय पटारे यांनी म्हटले आहे.

मागच्या एक वर्षापासून एबीपी माझा सोबत कार्यरत...8 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत... व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कांदा विकला पण हाती पैसा नाही आला, पदरचेच 301 रुपये खर्च करण्याची वेळ, बीडमधील शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी
कांदा विकला पण हाती पैसा नाही आला, पदरचेच 301 रुपये खर्च करण्याची वेळ, बीडमधील शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी
Maharashtra Weather Update: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 75 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका; कृषी विद्यापीठाचा महत्त्वाचा सल्ला
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 75 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका; कृषी विद्यापीठाचा महत्त्वाचा सल्ला
Devendra Fadnavis : कर्जमाफी कधी करणार? मुख्यमंत्र्यांनी तारीख सांगितली, बँकांनाही कडक निर्देश
कर्जमाफी कधी करणार? मुख्यमंत्र्यांनी तारीख सांगितली, बँकांनाही कडक निर्देश
कांद्याला 24 रुपयांचा दर द्यावा, नाफेडने 8 ते 10 लाख टन कांदा घ्यावा, रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कांद्याला 24 रुपयांचा दर द्यावा, नाफेडने 8 ते 10 लाख टन कांदा घ्यावा, रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

व्हिडीओ

Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण, दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी
Ambadas Danve : संजय गायकवाड फक्त कव्हर पेज वाचतो, किमान प्रस्तावना वाचावी, अंबादास दानवेंनी दगलबाज शिवाजी पुस्तकावर बंदीच्या मागणीवरुन गायकवाडांना सुनावलं
प्रबोधनकारांच्या विचारावर शिवसेना चालते, एकनाथ शिंदेंनी वाचाळवीरांचा बंदोबस्त करावा, अंबादास दानवेंचा संजय गायकवाड यांना टोला
Maharashtra Live blog updates: चालत्या ट्रक मधून शेळ्या लंपास; सोलापूर-धुळे राज्य महामार्गावरील घटना
Maharashtra Live blog updates: चालत्या ट्रक मधून शेळ्या लंपास; सोलापूर-धुळे राज्य महामार्गावरील घटना
Chandrashekhar Bawankule : पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, अतिक्रमण करणाऱ्या 'त्या'  शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक नंबर बंद करणार : चंद्रशेखर बावनकुळे 
पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, शेतकऱ्यांनी सर्व रस्ते या मोहिमेत आणावेत : चंद्रशेखर बावनकुळे 
IPL 2026 Playoffs : आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ ठरले, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार? संपूर्ण वेळापत्रक
आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ निश्चित, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार?
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
Embed widget