एक्स्प्लोर

Green chilies : नंदूरबारमध्ये हिरवी मिरची तेजीत, किलोला मिळतोय 40 रुपयांचा दर, शेतकऱ्यांना फायदा

सध्या नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील बाजारात हिरव्या मिरचीला प्रतिकिलो 30 ते 40 रुपयांचा दर मिळत आहे. चांगला दर मिळत असल्यानं मिरची उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

Green chillies Price : सध्या बाजारात हिरव्या मिरचीला (Green chillies) चांगला दर मिळत आहे. याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. सध्या नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील बाजारात हिरव्या मिरचीला प्रतिकिलो 30 ते 40 रुपयांचा दर मिळत आहे. चांगला दर मिळत असल्यानं मिरची उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे.  

नंदूरबार जिल्ह्यातून लाल मिरची सोबतच हिरवी मिरची देखील देशातल्या विविध भागात पाठवली जाते.  राज्यातील सर्वात मोठे मिरची उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. दरम्यान, सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस पडत आहे. याचा परिणाम मिरचीच्या उत्पादनावर झाला आहे. तसेच बाजारात होणारी आवक देखील मंदावली आहे. त्यामुळं मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. नंदूरबार जिल्ह्यातील हिरव्या मिरचीला मोठ्या प्रमाणात मुंबई, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये मागणी वाढल्यानं व्यापारी मिरची खरेदीसाठी जिल्ह्यात येत आहेत. शेतकऱ्यांना मिरचीच्या प्रतवारीनुसार 30 ते 40 रुपये प्रति किलो असा भाव मिळत आहे. या मिळणाऱ्या दराबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. असाच दर कायम राहण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.


Green chilies : नंदूरबारमध्ये हिरवी मिरची तेजीत, किलोला मिळतोय 40 रुपयांचा दर, शेतकऱ्यांना फायदा

नंदुरबार मधील मिरची मार्केट संपुर्ण देशात प्रसिद्ध

नंदुरबार मधील मिरची मार्केट संपुर्ण देशात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यामधील मिरचीला महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात व मध्य प्रदेश राज्यात देखील मोठी प्रमाणात मागणी आहे. नंदुरबार मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक होत असल्यानं शेतकऱ्यांनाही चांगला दर मिळतो. त्यामुळं शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गही सुखावला आहे. नंदूरबारमधील मिर्ची मार्केट मध्ये यंदा चांगल्या दर्जाची मिर्ची दाखल झाली आहे. तेजा ,व्ही एन आर,अरुणीम ,कळस,जरेला,लाली अश्या नवीन प्रकारच्या वाणांची मिरची बाजारात दाखल झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत शंकेश्वर जातीच्या मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. आता मात्र, यामध्ये बदल होत आहे. या मिरचीचे उत्पादन घटत असून आता जिल्ह्यात तेजा, व्हीएनआर, अरुणीम, कळस, लाली या वाणांच्या मिरचीची लागवड केली जात आहे. मिरचीचे मोठे उत्दान होत असल्यानं नंदूरबारच्या बाजारात परिसरातील महिला मजूरांच्या हाताला कामही मिळत आहे.

ढगाळ वातावरण आणि पावसामुळे मिरचीवर बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता

नंदुरबार जिल्ह्यात आणि शेजारील सीमा वरती भागातील गुजरात आणि मध्य प्रदेशातील परिसरात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली जाते. या भागातील मिरची चवीला अधिक तिखट आणि चवदार असल्याने ह्या मिरचीला मोठ्या प्रमाणात देशभरात मागणी असते. मात्र, गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसामुळं इतर भागात मिरचीचे नुकसान झाले आहे. त्यामुळं गुजरातमधील मोठ्या शहरातील बाजारपेठेत मिरचीची आवक कमी झाल्यानं आणि दुसरीकडे मुंबईतही मागणी वाढल्यानं मिरचीचे दर यावर्षी आतापर्यंत स्थिर आहेत हिरव्या मिरचीला मोठ्या प्रमाणात मागणी असून चाळीस रुपये प्रति किलोनं व्यापारी जागेवर मिरचीची खरेदी करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे तर दुसरीकडे ढगाळ वातावरण आणि पावसामुळे मिरची पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांचे चिंता वाढली आहे. एकीकडे चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे तर दुसरीकडे ढगाळ वातावरण आणि सततच्या पावसामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव ही चिंता दिसत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था कधी खुशी कभी गम अशी झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

 
१७ वर्षापासून पत्रकारितेचा अनुभव,   कृषी विषयक पत्रकारीते पासून सुरुवात
Read More

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवली, किती तारखेपर्यंत भरता येणार पिक विमा?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवण्याची मागणी, खासदा ओमराजेंचं कृषीमंत्र्यांना पत्र
Tanaji Sawant: लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
Dattatray Bharane: शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
Maharashtra Rain updates: मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
Embed widget