एक्स्प्लोर

चिंता वाढली! मराठवाड्यात 'ऑगस्ट महिन्यात' पावसाची 71.9 टक्क्यांची तुट; 49 लाख हेक्टरवरील पिकं धोक्यात

Marathwada Rain Update : अशा परिस्थितीत विभागातील 49 लाख हेक्टरवरील पिकं धोक्यात आली आहे.

Marathwada Rain Update : मागील 20 दिवसांपासून मराठवाड्यात (Marathwada) पावसाचा (Rain) खंड पाहायला मिळत आहे. तुरळक ठिकाणी सोडलं तर विभागात कोठेही पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मराठवाड्यात ऑगस्ट महिन्याच्या मागील 20 दिवसांत केवळ ‎35.1 मिमी पाऊस झाला आहे. म्हणजेच फक्त 28.1 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे मराठवाड्यात ऑगस्ट महिन्यात 71.9 टक्के तुट पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत विभागातील 49 लाख हेक्टरवरील पिकं धोक्यात आली आहे. 

पावसाची स्थिती...

  • यावर्षी मराठवाडा विभागात उशिरा मान्सून दाखल झाल्याने 10 जूनऐवजी ‎25 जूनला मान्सूनचे आगमन झाले.
  • मराठवाड्यातील 30 जूनपर्यंतची आकडेवारी पाहिली तर, 134 मिमी अपेक्षित‎पावसाच्या तुलनेत केवळ 55.5 मिमी ‎म्हणजेचं 41.4 टक्केच पाऊस ‎पडला. 
  • जुलै महिन्यात 182.2 मिमीच्या तुलनेत 272.5 मिमी म्हणजेच 49 ‎टक्के जास्त पाऊस पडला.
  • मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने मागील 20 दिवसांत 28.1 टक्के पाऊस झाला असून, 71.9 टक्के तुट पाहायला मिळत आहे.

विभागात पावसाची तुट...

जिल्हा  पावसाची तुट 
परभणी 40 टक्के 
औरंगाबाद  29.8 टक्के 
जालना 31.6 टक्के 
बीड  25.4 टक्के 
लातूर 21.2 टक्के 
उस्मानाबाद  23.5 टक्के 
हिंगोली 14.6 टक्के 
नांदेड  14 टक्के जास्त पाऊस 

शेतकऱ्यांची चिंता वाढली...

गेल्यावर्षी अतिवृष्टी आणि त्यानंतर परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ज्यात खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामाचे पिकं जवळपास हातचे गेले होते. मात्र, यंदा काही तरी हाती लागेल अशी अपेक्षा असतानाच मान्सून उशिरा दाखल झाला. त्यात जून महिना कोरडा गेला. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने पेरण्या झाल्या. पण ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाने दडी मारली. त्यामुळे अनेक भागात पावसाचा 20 दिवसांचा खंड पाहायला मिळत आहे. त्यामुळेशेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आता पिकांना पावसाची अत्यंत गरज असतांना पाऊस पडत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत पाऊस न झाल्यास खरीपाच्या पिकांना मुकावे लागणार आहे. विशेष म्हणजे यामुळे शेतकऱ्यांच्या मोठे नुकसान होणार आहे. 

पाणी टंचाईचा सामना करावा लागणार... 

पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना फटका बसत असतांना, याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना देखील बसणार आहे. कारण अनेक प्रकल्पातील पाणी आटले असून, काही ठिकाणी अल्प पाणीसाठा शिल्लक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात जोरदार पाऊस न झाल्यास मराठवाड्यात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळू शकते. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Rain Update : 'अब तो ना गरजता है, ना बरसता है'; हवामान विभागाच्या अंदाजानंतरही पावसाची दडी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इराण-इस्रायल युद्धाचा भारतीय शेतकऱ्यांवर परिणाम, खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत
इराण-इस्रायल युद्धाचा भारतीय शेतकऱ्यांवर परिणाम, खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत
Devendra Fadnavis on Loan Waiver: कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात निकष स्पष्टच सांगितले, म्हणाले...
कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात निकष स्पष्टच सांगितले, म्हणाले...
पूर्ण बहुमतात असलेल्या सरकारची अर्धवट कर्जमाफी, शेतकऱ्यांची उघड फसवणूक, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची टीका
पूर्ण बहुमतात असलेल्या सरकारची अर्धवट कर्जमाफी, शेतकऱ्यांची उघड फसवणूक, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची टीका
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Embed widget