एक्स्प्लोर

Latur : लातुरातील सोयाबीन खरेदी केंद्रावरील काट्यातच घोळ, क्विंटल मागे 12 ते 14 किलोचा फरक आल्याने शेतकरी संतप्त

Latur News : सन 2008 पासून हे खरेदी केंद्र कार्यरत असून काट्यात घोळ घालून आतापर्यंत शेतकऱ्यांना लाखो रुपयांना फसवलं असल्याचं समोर आलं आहे. 

लातूर : एडीएम अॅग्रोच्या सोयाबीन खरेदी केंद्रावरील काट्यातच घोळ असल्याचं समोर आलं. एका क्विंटलमागे 12 ते 14 किलोंचा फरक असल्याचं लक्षात आल्यानंतर एका शेतकऱ्याने तशी तक्रार केली. घडलेल्या प्रकारानंतर शेतकरी संतप्त झाल्याचं दिसून आलं. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेली एडीएम अॅग्रो या कंपनीचे ठिकठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्र आहेत. लातूर एमआयडीसी येथे त्यांचा प्लांट आहे. लातूर जिल्ह्यातील निटूर येथे कंपनीचं सोयाबीन खरेदी केंद्र आहे. नेताजी सोमवंशी या शेतकऱ्यांना येथे सोयाबीन विक्रीसाठी आणलं होतं. सोयाबीनचा काटा केल्यानंतर शेतकऱ्याला यात शंका निर्माण झाली. त्यानंतर पुन्हा सोयाबीनचा काटा करण्यात आला. त्यात तफावत आढळून आली. तेथे हजर असणाऱ्या शेतकऱ्यांनी मग याची तक्रार संबंधित विभागाकडे केली.

वैधमापन शास्त्र विभाग औसा येथील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी आल्यानंतर एटीएम अॅग्रो च्या खरेदी केंद्रावरील वजन काट्याची तपासणी केली. या तपासणीत वजन काट्यात दोष असल्याचं आढळून आलं आहे. पुढील कारवाई संबंधित विभागातील अधिकारी करत आहेत. कंपनीच्या या खरेदी केंद्रावरील व्यवहार थांबवण्यात आले आहेत. कंपनीच्या जिल्ह्यातील इतरही खरेदी केंद्राची तपासणी करण्याची मागणी आता पुढे येत आहे. या तपासणीचा संपूर्ण अहवाल जिल्ह्यातील कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर यावरील पुढील कारवाई करण्याच्या सूचना प्राप्त होणार आहेत.

एका क्विंटल मागे बारा ते चौदा किलोचा फरक पडत असल्यामुळे या भागातील शेतकरी संतप्त झाला आहे. मागील अनेक वर्षापासून हे खरेदी केंद्र येथे कार्यरत आहे. संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे. साल 2008 पासून हे खरेदी केंद्र येथे अस्तित्वात आहे. आजपर्यंत शेतकऱ्यांना लाखो रुपयांना फसवणाऱ्या या कंपनीवर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यातून होत आहे.

मागील अनेक वर्षापासून या परिसरातील शेतकरी या ठिकाणीच सोयाबीन विक्रीसाठी घेऊन येत असतात. कंपनीचा खरेदी केंद्र आहे अद्ययावत काट्यावर माप केलं जातं. यामुळे इथे कोणताही दगा फटका शेतकऱ्यांना होणार नाही हा विश्वास होता. मात्र येथील कर्मचाऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक काट्यामध्येच घोळ केल्याने कंपनीवरचा विश्वास उडून गेला आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी तुळशीदास साळुंखे यांनी दिली आहे.

2008 पासून आजतागायत खरेदी केंद्र येथे चालू आहे. शेतकऱ्यांना क्विंटल मागे 12 ते 14 किलोंना फसवणारा हे खरेदी केंद्र तात्काळ बंद करण्यात यावा. शेतकऱ्यांना आतापर्यंत लुटलेली पैसे कंपनीने परत करावे, नुकसान भरून दिले नाही तर जिल्ह्यातील सर्व खरेदी केंद्र बंद पाडू असा इशारा या वेळेस विविध शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी दिला आहे.

ही बातमी वाचा: 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget