एक्स्प्लोर

Latur : लातुरातील सोयाबीन खरेदी केंद्रावरील काट्यातच घोळ, क्विंटल मागे 12 ते 14 किलोचा फरक आल्याने शेतकरी संतप्त

Latur News : सन 2008 पासून हे खरेदी केंद्र कार्यरत असून काट्यात घोळ घालून आतापर्यंत शेतकऱ्यांना लाखो रुपयांना फसवलं असल्याचं समोर आलं आहे. 

लातूर : एडीएम अॅग्रोच्या सोयाबीन खरेदी केंद्रावरील काट्यातच घोळ असल्याचं समोर आलं. एका क्विंटलमागे 12 ते 14 किलोंचा फरक असल्याचं लक्षात आल्यानंतर एका शेतकऱ्याने तशी तक्रार केली. घडलेल्या प्रकारानंतर शेतकरी संतप्त झाल्याचं दिसून आलं. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेली एडीएम अॅग्रो या कंपनीचे ठिकठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्र आहेत. लातूर एमआयडीसी येथे त्यांचा प्लांट आहे. लातूर जिल्ह्यातील निटूर येथे कंपनीचं सोयाबीन खरेदी केंद्र आहे. नेताजी सोमवंशी या शेतकऱ्यांना येथे सोयाबीन विक्रीसाठी आणलं होतं. सोयाबीनचा काटा केल्यानंतर शेतकऱ्याला यात शंका निर्माण झाली. त्यानंतर पुन्हा सोयाबीनचा काटा करण्यात आला. त्यात तफावत आढळून आली. तेथे हजर असणाऱ्या शेतकऱ्यांनी मग याची तक्रार संबंधित विभागाकडे केली.

वैधमापन शास्त्र विभाग औसा येथील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी आल्यानंतर एटीएम अॅग्रो च्या खरेदी केंद्रावरील वजन काट्याची तपासणी केली. या तपासणीत वजन काट्यात दोष असल्याचं आढळून आलं आहे. पुढील कारवाई संबंधित विभागातील अधिकारी करत आहेत. कंपनीच्या या खरेदी केंद्रावरील व्यवहार थांबवण्यात आले आहेत. कंपनीच्या जिल्ह्यातील इतरही खरेदी केंद्राची तपासणी करण्याची मागणी आता पुढे येत आहे. या तपासणीचा संपूर्ण अहवाल जिल्ह्यातील कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर यावरील पुढील कारवाई करण्याच्या सूचना प्राप्त होणार आहेत.

एका क्विंटल मागे बारा ते चौदा किलोचा फरक पडत असल्यामुळे या भागातील शेतकरी संतप्त झाला आहे. मागील अनेक वर्षापासून हे खरेदी केंद्र येथे कार्यरत आहे. संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे. साल 2008 पासून हे खरेदी केंद्र येथे अस्तित्वात आहे. आजपर्यंत शेतकऱ्यांना लाखो रुपयांना फसवणाऱ्या या कंपनीवर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यातून होत आहे.

मागील अनेक वर्षापासून या परिसरातील शेतकरी या ठिकाणीच सोयाबीन विक्रीसाठी घेऊन येत असतात. कंपनीचा खरेदी केंद्र आहे अद्ययावत काट्यावर माप केलं जातं. यामुळे इथे कोणताही दगा फटका शेतकऱ्यांना होणार नाही हा विश्वास होता. मात्र येथील कर्मचाऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक काट्यामध्येच घोळ केल्याने कंपनीवरचा विश्वास उडून गेला आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी तुळशीदास साळुंखे यांनी दिली आहे.

2008 पासून आजतागायत खरेदी केंद्र येथे चालू आहे. शेतकऱ्यांना क्विंटल मागे 12 ते 14 किलोंना फसवणारा हे खरेदी केंद्र तात्काळ बंद करण्यात यावा. शेतकऱ्यांना आतापर्यंत लुटलेली पैसे कंपनीने परत करावे, नुकसान भरून दिले नाही तर जिल्ह्यातील सर्व खरेदी केंद्र बंद पाडू असा इशारा या वेळेस विविध शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी दिला आहे.

ही बातमी वाचा: 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
Farmers Loan Waiver: मोठी बातमी! प्राप्तिकर भरणारे 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र; राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे
मोठी बातमी! प्राप्तिकर भरणारे 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र; राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे
फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवली, किती तारखेपर्यंत भरता येणार पिक विमा?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवण्याची मागणी, खासदा ओमराजेंचं कृषीमंत्र्यांना पत्र

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Embed widget