एक्स्प्लोर

Dhule : धुळ्यात मिरचीला दराचा 'तडका', उत्पादन घटल्याचा परिणाम, दोंडाईच्या बाजारात मिरचीला 700 रुपयांचा दर

अतिवृष्टीमुळं मिरचीच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळं उत्पादन घटलं आहे. उत्पादनात घट झाल्यानं धुळ्यात मिरचीच्या (Chili) दरात मोठी वाढ झाली आहे.

Dhule Agriculture News : परतीच्या पावसाचा (Rain) राज्यातील शेतकऱ्यांचा (Farmers) पिकांना मोठा फटका बसला आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांच्या हाती आलेली पीक वाया गेली आहे. तर काही ठिकाणी जी उरली सुरली पीक आहेत, त्यामध्ये देखील मोठी घट आली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. धुळे (Dhule) जिल्ह्यातही परतीच्या पावसाचा मोठा फटका पिकांना बसला आहे. अतिवृष्टीमुळं मिरीचीच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळं उत्पादन घटलं आहे. उत्पादनात घट झाल्यानं मिरचीच्या (Chili) दरात मोठी वाढ झाली आहे. आवक घटल्यानं मिरचीला दराचा तडका मिळाला आहे.

रसगुल्ला मिरचीला किलोला 700 रुपयांचा दर

धुळ्यातील दोंडाईचा बाजार समितीत आंध्र प्रदेशातील गुंटूर येथून मिरचीची आवक होत आहे. धुळ्यात अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीचा फटका लाल मिरचीला बसला आहे. उत्पादनात घट झाल्यामुळं मिरचीची आवक घटली आहे. त्यामुळं मिरचीला महागाईचा तडका बसला आहे. रसगुल्ला मिरचीला किलोला 700 रुपयांचा दर मिळाला आहे. तर फापडा मिरचीला किलोला 340 रुपये भाव मिळत आहे. एकीकडे लाल मिरचीचे उत्पादन कमी झाले असताना दुसरीकडं मागणी वाढल्यानं लाल मिरची खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. 

दोंडाईचा हे लाल मिरचीचे आगार

धुळे जिल्ह्यात दोंडाईचा हे लाल मिरचीचे आगार समजले जाते. राज्याच्या विविध भागात मिरचीचे उत्पादन होते. त्या भागात अतिवृष्टीमुळं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून दोंडाईच्या परिसरात देखील मिरचीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र, या मिरचीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं मिरचीचे उत्पादन घटल्याचे सांगण्यात येत आहे.

परतीच्या पावसाचा पिकांना मोठा फटका

राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला होता. जाता जाता जोरदार पाऊस कोसळल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. यामुळं राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. अतिवृष्टीमुळं सोयाबीनसह कापूस, फळबागा, मिरची, पालेभाज्या या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली लाल मिरचीही खराब झाली आहे. मिरचीला पावसाचं पाणी लागल्यानंतर मिरची काळी पडली आहे. त्यामुळं व्यापारी देखील देखील चिंतेत आहेत. या पावसाचा मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिकं वाया गेली होती. 

महत्त्वाच्या बातम्या:

Pakistan's Red Chilli : अशियातील मिरची राजधानीला पुराचा मोठा फटका, पाकिस्तानात दर वाढण्याची शक्यता 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Exit Poll : आसाममध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता, केरळमध्ये सत्तांतर, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
आसाममध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता, केरळमध्ये सत्तांतर, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
West bengal Exit Poll : पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदींना' विजयाचा विश्वास, पण..; एक्झिट पोलमधून वेगळाच अंदाज, भाजपला किती जागा?
पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदींना' विजयाचा विश्वास, पण..; एक्झिट पोलमधून वेगळाच अंदाज, भाजपला किती जागा?
Tamil Nadu Exit Poll : एक्झिट पोलनुसार तामिळनाडूत धक्कादायक निकालांची शक्यता, अभिनेता विजयची TVK पार्टी 120 जागा जिंकण्याची शक्यता, द्रमुकला धक्का?
तामिळनाडूत धक्कादायक निकालांची शक्यता, अभिनेता विजयच्या पार्टीची जादू चालणार, TVK 120 जागा जिंकणार : एक्झिट पोल
Congress : काँग्रेस पक्षश्रेष्ठी शिवसेनेच्या एकतर्फी वागण्यावर नाराज, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 10 मतांसाठी प्रयत्न करणार,विधानपरिषदेवरुन मविआला तडे?
राज्यसभेला शरद पवारांना पाठिंबा दिला, आता राष्ट्रवादीनं आम्हाला पाठिंबा द्यावा, काँग्रेसची भावना, सूत्रांची माहिती

व्हिडीओ

Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
Beed MassaJog Election : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव कसा झाला?  Special Report
Pune Christian Conversion : पुण्यात पर्यटक म्हणून आले... धर्मप्रचाराला लागले Special Report
Bacchu Kadu Vidhan Parishad Election : बच्चू कडूंना परिषदेची उमेदवारी मिळणार? Special Report
Vidhan Parishad Election MVA : काँग्रेसला न सांगताच दानवेंच्या नावाची घोषणा? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Exit Poll : आसाममध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता, केरळमध्ये सत्तांतर, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
आसाममध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता, केरळमध्ये सत्तांतर, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
West bengal Exit Poll : पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदींना' विजयाचा विश्वास, पण..; एक्झिट पोलमधून वेगळाच अंदाज, भाजपला किती जागा?
पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदींना' विजयाचा विश्वास, पण..; एक्झिट पोलमधून वेगळाच अंदाज, भाजपला किती जागा?
Tamil Nadu Exit Poll : एक्झिट पोलनुसार तामिळनाडूत धक्कादायक निकालांची शक्यता, अभिनेता विजयची TVK पार्टी 120 जागा जिंकण्याची शक्यता, द्रमुकला धक्का?
तामिळनाडूत धक्कादायक निकालांची शक्यता, अभिनेता विजयच्या पार्टीची जादू चालणार, TVK 120 जागा जिंकणार : एक्झिट पोल
Congress : काँग्रेस पक्षश्रेष्ठी शिवसेनेच्या एकतर्फी वागण्यावर नाराज, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 10 मतांसाठी प्रयत्न करणार,विधानपरिषदेवरुन मविआला तडे?
राज्यसभेला शरद पवारांना पाठिंबा दिला, आता राष्ट्रवादीनं आम्हाला पाठिंबा द्यावा, काँग्रेसची भावना, सूत्रांची माहिती
उन्हाचा तडाखा, धावत्या ट्रकला लागली आग; नंदूरबारमध्ये तांदुळाच्या पोत्यांसह ट्रक जळून खाक
उन्हाचा तडाखा, धावत्या ट्रकला लागली आग; नंदूरबारमध्ये तांदुळाच्या पोत्यांसह ट्रक जळून खाक
Riyan Parag : पंजाबचा विजयरथ रोखणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग संकटात, बीसीसीआयनं नोटीस पाठवलं, एका व्हिडिओनं खळबळ
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग संकटात, एका व्हिडिओनं खळबळ, बीसीसीआयची आक्रमक भूमिका
West Bengal Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदी डेंजर झोन'मध्ये; सत्तांतर होण्याचा अंदाज, पहिल्यांदाच कमळ खुलणार?
West Bengal Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदी डेंजर झोन'मध्ये; सत्तांतर होण्याचा अंदाज, पहिल्यांदाच कमळ खुलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 एप्रिल 2026 | बुधवार
Embed widget