एक्स्प्लोर

Dhule : धुळ्यात मिरचीला दराचा 'तडका', उत्पादन घटल्याचा परिणाम, दोंडाईच्या बाजारात मिरचीला 700 रुपयांचा दर

अतिवृष्टीमुळं मिरचीच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळं उत्पादन घटलं आहे. उत्पादनात घट झाल्यानं धुळ्यात मिरचीच्या (Chili) दरात मोठी वाढ झाली आहे.

Dhule Agriculture News : परतीच्या पावसाचा (Rain) राज्यातील शेतकऱ्यांचा (Farmers) पिकांना मोठा फटका बसला आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांच्या हाती आलेली पीक वाया गेली आहे. तर काही ठिकाणी जी उरली सुरली पीक आहेत, त्यामध्ये देखील मोठी घट आली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. धुळे (Dhule) जिल्ह्यातही परतीच्या पावसाचा मोठा फटका पिकांना बसला आहे. अतिवृष्टीमुळं मिरीचीच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळं उत्पादन घटलं आहे. उत्पादनात घट झाल्यानं मिरचीच्या (Chili) दरात मोठी वाढ झाली आहे. आवक घटल्यानं मिरचीला दराचा तडका मिळाला आहे.

रसगुल्ला मिरचीला किलोला 700 रुपयांचा दर

धुळ्यातील दोंडाईचा बाजार समितीत आंध्र प्रदेशातील गुंटूर येथून मिरचीची आवक होत आहे. धुळ्यात अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीचा फटका लाल मिरचीला बसला आहे. उत्पादनात घट झाल्यामुळं मिरचीची आवक घटली आहे. त्यामुळं मिरचीला महागाईचा तडका बसला आहे. रसगुल्ला मिरचीला किलोला 700 रुपयांचा दर मिळाला आहे. तर फापडा मिरचीला किलोला 340 रुपये भाव मिळत आहे. एकीकडे लाल मिरचीचे उत्पादन कमी झाले असताना दुसरीकडं मागणी वाढल्यानं लाल मिरची खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. 

दोंडाईचा हे लाल मिरचीचे आगार

धुळे जिल्ह्यात दोंडाईचा हे लाल मिरचीचे आगार समजले जाते. राज्याच्या विविध भागात मिरचीचे उत्पादन होते. त्या भागात अतिवृष्टीमुळं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून दोंडाईच्या परिसरात देखील मिरचीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र, या मिरचीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं मिरचीचे उत्पादन घटल्याचे सांगण्यात येत आहे.

परतीच्या पावसाचा पिकांना मोठा फटका

राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला होता. जाता जाता जोरदार पाऊस कोसळल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. यामुळं राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. अतिवृष्टीमुळं सोयाबीनसह कापूस, फळबागा, मिरची, पालेभाज्या या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली लाल मिरचीही खराब झाली आहे. मिरचीला पावसाचं पाणी लागल्यानंतर मिरची काळी पडली आहे. त्यामुळं व्यापारी देखील देखील चिंतेत आहेत. या पावसाचा मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिकं वाया गेली होती. 

महत्त्वाच्या बातम्या:

Pakistan's Red Chilli : अशियातील मिरची राजधानीला पुराचा मोठा फटका, पाकिस्तानात दर वाढण्याची शक्यता 

महत्त्वाच्या बातम्या

सत्तेत असून सरकारच्या चुका दाखवून देण्यासाठी हिंमत लागते, निलेश राणेंचं कौतुक करावे तेवढं थोडं : रोहित पवार 
सत्तेत असून सरकारच्या चुका दाखवून देण्यासाठी हिंमत लागते, निलेश राणेंचं कौतुक करावे तेवढं थोडं : रोहित पवार 
Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर; म्हणाले, 'जाचक अटींमुळे सरकारची प्रतिमा मलीन होतेय...'
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर; म्हणाले, 'जाचक अटींमुळे सरकारची प्रतिमा मलीन होतेय...'
Onion Farmers: नाफेड अन् एनसीसीएफ खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ कायम; 18 खरेदी केंद्रांवर शुकशुकाट; तर भंडाऱ्यात कृषी वीज महिनाभरापासून बंद, शेतकऱ्यांचा निर्वाणीचा इशारा
नाफेड अन् NCCF खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ कायम; 18 खरेदी केंद्रांवर शुकशुकाट; तर भंडाऱ्यात कृषी वीज महिनाभरापासून बंद, शेतकऱ्यांचा निर्वाणीचा इशारा
Farmers Loan Waiver : दिलासादायक! 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना मोठी कर्जमाफी मिळणार, दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा 56 लाख शेतकऱ्यांना येणार कर्जमाफीचा मेसेज
दिलासादायक! 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना मोठी कर्जमाफी मिळणार, दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा 56 लाख शेतकऱ्यांना येणार कर्जमाफीचा मेसेज

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप
Operation Tiger 3.0 : ठाकरेंचे 4 आमदार थेट शिंदेंच्या भेटीला? आणखी 12 आमदार संपर्कात; राजकीय भूकंप
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhimanyu Pawar On Medha kulkarni: खासदार मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या; अभिमन्यू पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, जातीचा विषय नाही...
खासदार मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या; अभिमन्यू पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, जातीचा विषय नाही...
Kolhapur Football : क्रिकेटवेड्या भारतात फुटबॉल वेडं शहर, कोल्हापूरच्या फुटबॉलचा विषय हार्ड; इतिहास काय? 
क्रिकेटवेड्या भारतात फुटबॉल वेडं शहर, कोल्हापूरच्या फुटबॉलचा विषय हार्ड; इतिहास काय? 
IND vs IRE: वैभव सूर्यवंशी OUT संजू-अभिषेक IN, आयर्लंडविरुद्ध दिग्गजाने टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन निवडली
IND vs IRE: वैभव सूर्यवंशी OUT संजू-अभिषेक IN, आयर्लंडविरुद्ध दिग्गजाने टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन निवडली
Siya Goyal Lohagad Crime: नवसाने झालेली पोर वाया गेली, गोयल कुटुंबीयांचे नातेवाईक आपल्या मुलांना सियापासून दूर का ठेवायचे?
नवसाने झालेली पोर वाया गेली, नातेवाईक आपल्या मुलांना सिया गोयलपासून दूर का ठेवायचे?
Ketan agrawal: लोहगड केतन अग्रवाल प्रकरणात उज्ज्वल निकमांची एंट्री; सिया-चेतनच्या अडचणीत वाढ, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
लोहगड केतन अग्रवाल प्रकरणात उज्ज्वल निकमांची एंट्री; सिया-चेतनच्या अडचणीत वाढ, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
Nashik Crime News: सोबत दारू प्यायली, नंतर दोघांमध्ये बाचाबाची, संतापलेल्या मित्रानेच मित्राला संपवलं; घटनेनं नाशिक हादरलं!
सोबत दारू प्यायली, नंतर दोघांमध्ये बाचाबाची, संतापलेल्या मित्रानेच मित्राला संपवलं; घटनेनं नाशिक हादरलं!
Ram Mandir Donation Case: राम मंदिराच्या कोट्यवधीच्या देणगीत डल्ला; चंपत राय आणि अनिल मिश्रांचा राम मंदिर ट्रस्टमधून राजीनामा
राम मंदिराच्या कोट्यवधीच्या देणगीत डल्ला; चंपत राय आणि अनिल मिश्रांचा राम मंदिर ट्रस्टमधून राजीनामा
Lohagad Case : सियाचा भाऊ आणि बॉयफ्रेंड हे खास मित्र, केतनला संपवण्याचा प्लॅन आणखी काहीजणांना माहिती; वडिलांचा संशय
सियाचा भाऊ आणि बॉयफ्रेंड हे खास मित्र, केतनला संपवण्याचा प्लॅन आणखी काहीजणांना माहिती; वडिलांचा संशय
Embed widget