एक्स्प्लोर

Mango Prices Increase : अक्षय तृतीयेपूर्वीच आंब्याचे दर भिडले गगनाला, बाजारपेठेत आंब्याचा तुटवडा

सध्या बाजारपेठेत आंब्याला मोठी मागणी आहे. मात्र, अवकाळी पाऊस आणि हवामान बदलाचा आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. सध्या आंब्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

Mango Prices Increase : अक्षय तृतीया सणापूर्वी आंब्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सध्या बाजारपेठेत आंब्याला मोठी मागणी आहे. मात्र, अवकाळी पाऊस आणि हवामान बदलाचा आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. दरम्यान, धुळ्याच्या बाजारपेठेत आंब्याचा तुटवडा भासत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आंब्याचे दर मोठ्या प्रमाणात कडाडले आहे.

अक्षय तृतीया हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अक्षय तृतीया या सनाला आंब्याचे महत्त्व मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे बाजारात आंब्याची आवक देखील सुरु झाली आहे. परंतू धुळे जिल्ह्यात तीन ते चार महिन्यांमध्ये सातत्याने हवामानात बदल झाल्यामुळे या हवामान बदलाचा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. परिणामी बाजारामध्ये आंब्याचा तुटवडा जाणवू लागल्यामुळे आंब्याचे दर सध्या चांगलेच कडाडले आहेत. त्यामुळे अक्षय तृतीया या सणाच्या दिवशी सर्वसामान्यांना महागडा आंबा खरेदी करावा लागणार आहे.

सध्या बाजारामध्ये विक्रीसाठी आलेल्या बदाम जातीच्या आंब्याला प्रतिकिलोसाठी 140 रुपये मोजावे लागत आहेत. तर एक किलो केसर आंबा खेरदी करण्यासाठी 160 रुपये मोजावे लागत आहेत. अक्षय तृतीयाच्या सणाच्या वेळी हे दर आणखी वाढण्याची शक्यता आंबा विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला अक्षय तृतीया हा सण संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. चैत्र महिना संपल्यानंतर वैशाखाचा वणवा सर्वत्र पेटतो. अर्थात वैशाख महिन्यात उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणावर  वाढलेल्या असतात. या अक्षय तृतीयेच्या सणाला माहेरवाशिणी माहेराला येतात आणि वैशाखाच्या वणव्यात माहेराचा गारवा अनुभवतात. अक्षय तृतीयेच्या सणाला ग्रामीण भागात विशेष महत्व आहे. यादिवशी पुरणाची पोळी आणि आंब्याचा रस असा बेत तयार केला जातो. तसेच कुटुंबातील मृत झालेल्या पितरांना या दिवशी नैवेद्य दाखवला जातो. खानदेशात अक्षय तृतीयेच्या दिवशी माहेरी आलेल्या माहेरवाशिणी झाडाला झोका बांधून गाणी गातात खेळ खेळतात. अक्षय तृतीयेपासून आंब्याचा रस खाण्यास ग्रामीण भागात सुरुवात केली जाते. त्यामुळे आंब्याला या सणाला विशेष महत्व आहे. मात्र यंदा अवकाळी पाऊस आणि हवामान बदलाचा फटका आंब्याच्या पिकांना मोठ्या प्रमाणावर बसला असून आंब्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे ग्रामीण भागात सर्वसामान्य नागरिकांना आंबे खरेदी करण्यासाठी खिशाला कात्री लावावी लागणार आहे. अक्षय तृतीयेच्या सणापूर्वीच आंब्याचे भाव 140 ते 160 रुपये किलो या दराने सुरु आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! खते आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर काळाचा घाला, भीषण अपघातात जागीच मृत्यू, बीडच्या केजमध्ये घडली घटना
धक्कादायक! खते आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर काळाचा घाला, भीषण अपघातात जागीच मृत्यू, बीडच्या केजमध्ये घडली घटना
 Maharashtra Farm Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
Farmers Loan Waiver: राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget