एक्स्प्लोर

शेतकऱ्यांना जीएम वाणांच्या लागवडीस सरकारने परवानगी द्यावी , अनिल घनवटांची मागणी

सरकारने जीएम पिकांना परवानगी द्यावी अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी केली आहे. जीएम पिके शेतकर्‍यांच्या फायद्याची असल्याचे घनवट म्हणाले.

GM Crop : शेतकर्‍यांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळावे यासाठी प्रतिबंधित बी टी वांग्याची जाहीर लागवड करून सविनय कायदेभंगाचे आंदोलन करण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील, अनिल घनवट यांच्या शेतात जाहीर लागवड करण्यात येणार असल्याची माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली आहे. सरकारने जनुकीय सुधारीत (जीएम) पिकांना परवानगी देऊन शेतकर्‍यांना बियाणे तंत्रज्ञान निवडीचे स्वातंत्र्य द्यावे. जीएम पिके शेतकर्‍यांच्या फायद्याची असल्याचे घनवट म्हणाले.

भारतात कापशीच्या बोलगार्ड- 1 आणि बोलगार्ड-2 या दोनच जनुक सुधारीत (जी एम) पिकांना मान्यता आहे. इतर कोणतेही जीएम वाण किंवा पिकांची लागवड करण्यास मनाई आहे. लागवड केल्यास तो गुन्हा ठरतो. जगभर तणनाशकरोधक कपाशीसह अनेक जी एम वाण व पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. भारतात मात्र या पिकांना बंदी आहे. शेतकरी संघटना 2000 सालापासून शेतकर्‍यांना कोणते तंत्रज्ञान वापरायचे व कोणते बियाणे वापरायचे याच्या निवडीचे स्वातंत्र्य असायला हवे, यासाठी लढा देत आहे. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना कपाशीच्या दोन वाणांना परवानगी देण्यात आली होती, त्यानंतर कोणत्याही पिकाला परवानगी देण्यात आलेली नव्हती अशी माहिती घनवट यांनी दिली.
 
सन 2019 मध्ये अकोला जिल्ह्यातील अकोट येथे प्रतिबंधित तणनाशक रोधक कपाशीची जाहीर लागवड करून किसान सत्याग्रह केला होता. सरकारने त्याची दखल घेतली नाही म्हणून 17 फेब्रुवारी 2022 ला अहमनदगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील, श्रीगोंदा फॅक्टरी येथील अनिल घनवट यांच्या शेतात, प्रतिबंधित बी टी वांग्याची जाहीर लागवड करण्यात येणार असल्याची माहिती घनवट यांनी दिली.
17 फेब्रुवारीला सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत चालणार्‍या या आंदोलनात सहभागी होण्यसाठी राज्यभरातून शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. इतर राज्यातून प्रातिनिधिक स्वरुपात काही शेतकरी नेते देखील उपस्थित राहणार आहेत.

बी टी वांग्याचे बियाणे एका भारतीय कंपनीने, धारवाड कृषी विद्यापिठाच्या सहकार्याने ही जात विकसित केली आहे. जनुक अभियांत्रिकीवर नियंत्रण असणार्‍या, जीईएसी या संस्थेने या बियाणांच्या प्रदीर्घ  चाचण्या घेऊन त्यास मान्यता दिली आहे. तरी 2010 साली या बियाण्यांवर केंद्र शासनाने बंदी घातली आहे. काही विकास विरोधी गटांच्या दबावाला बळी पडून सरकारने घेतलेला हा राजकीय निर्णय आहे. हा भारतातील शेतकर्‍यांच्या तंत्रज्ञ‍ान स्वातंत्र्यावर घाला असल्याचे फडणवीस म्हणाले.

जीएम पिके शेतकर्‍यांच्या फायद्याची आहेत, म्हणून शेतकरी चोरून जीएम पिकांची लागवड करीत आहेत. त्यामुळे बियाण्यांचा काळाबाजार फोफावतो आहे. शेतकर्‍यांची फसवणूक होते आहे. परवानगी मिळाल्यास शेतकर्‍यांची फसवणूक झाल्यास कंपनी किंवा दुकानदाराच्या विरोधात तक्रार करता येईल. सरकारने जीएम पिकांना परवानगी देऊन शेतकर्‍यांना बियाणे तंत्रज्ञान निवडीचे स्वातंत्र्य द्यावे. अशी शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाची मागणी आहे. शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात या सत्याग्रहात सभागी व्हावे असे आवाहन अनिल घनवट यांनी केले आहे.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गरीब शेतकरी कसा निवडणार? कर्जमुक्तीची योग्य अंमलबजावणी न झाल्यास बँका डबघाईस येतील, शेतकरी कर्जबाजारी होतील, पटोलेंचा हल्लाबोल
गरीब शेतकरी कसा निवडणार? कर्जमुक्तीची योग्य अंमलबजावणी न झाल्यास बँका डबघाईस येतील, शेतकरी कर्जबाजारी होतील, पटोलेंचा हल्लाबोल
Dattatray Bharne : आखाती देशातील युद्धाचा निर्यातीला फटका, शेती क्षेत्रावर मोठा परिणाम; कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी व्यक्त केली चिंता
युरियाच्या साठ्याबाबत काळजी घ्या, आखाती देशातील युद्धाचा निर्यातीला फटका, कृषी क्षेत्रावर मोठा परिणाम; मंत्री दत्तात्रय भरणेंनी व्यक्त केली चिंता
Onion Farmer News : आखाती देशात युद्धाचे ढग, राज्यात कांद्याला उत्पादन खर्चाच्या निम्म्याहूनही कमी दर; बाजार हस्तक्षेप योजना लागू करण्याची शेतकऱ्यांची मागणी
आखाती देशात युद्धाचे ढग, राज्यात कांद्याला उत्पादन खर्चाच्या निम्म्याहूनही कमी दर; बाजार हस्तक्षेप योजना लागू करण्याची शेतकऱ्यांची मागणी
कांद्याच्या दरात घसरण, सरकारनं तातडीनं बाजार हस्तक्षेप योजना राबवावी, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र, नेमक्या काय आहेत मागण्या?
कांद्याच्या दरात घसरण, सरकारनं तातडीनं बाजार हस्तक्षेप योजना राबवावी, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र, नेमक्या काय आहेत मागण्या?

व्हिडीओ

Satara ZP Rada : सातारा झेडपी राडा प्रकरण भोवलं, चौकशी होईपर्यंत SP Tushar Doshi सक्तीच्या रजेवर
Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
Ashok Kharat Police Custody | अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Chakankar: रुपाली चाकणकरांचं रायगडमधील बिझनेस कनेक्शन समोर आलं, महत्त्वाची माहिती उघड
रुपाली चाकणकरांचं रायगडमधील बिझनेस कनेक्शन समोर आलं, महत्त्वाची माहिती उघड
West Bengal Assembly Elections 2026: पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात काँग्रेसनं उमेदवार दिला
पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर,अधीर रंजन चौधरी विधानसभेच्या रिंगणात   
Houthi Rebels : कोण आहेत हुथी बंडखोर? इराण-इस्रायल युद्धात उतरले तर चित्र पालटण्याची क्षमता, ट्रम्प यांची डोकेदुखी वाढणार
कोण आहेत हुथी बंडखोर? इराण-इस्रायल युद्धात उतरले तर चित्र पालटण्याची क्षमता, ट्रम्प यांची डोकेदुखी वाढणार
US-Iran War : पर्शियाच्या आखातात याल तर परत जाणार नाही, इराणचा अमेरिकन सैन्याला इशारा
पर्शियाच्या आखातात याल तर परत जाणार नाही, इराणचा अमेरिकन सैन्याला इशारा
Mhada Lottery 2026 : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी सोडत जाहीर, मुंबईत घर घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी सोडत जाहीर, म्हाडाच्या घरांसाठी अर्ज कसा करायचा?
Kerosene : 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल पंपावर रॉकेल मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, परवानगी किती दिवसांसाठी?
21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल पंपावर रॉकेल मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय,परवानगी किती दिवसांसाठी?
Pope Leo on War: देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
Embed widget