एक्स्प्लोर

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर उग्र आंदोलन करणार; रविकांत तुपकरांचा इशारा 

Buldhana News Update : एका आठवड्यात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्यात येईल. शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलाय.

बुलढाणा : निवडून आलेल्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भांडले पाहिजे. मागील वर्षी आंदोलनामुळे कापूस आणि सोयाबीनला चांगला भाव मिळाला. सरकार शेतकऱ्याला लाचार बनवत आहे. गुलामीच्या दिशेनं शेतकऱ्यांना नेलं जातंय. येत्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर महाराष्ट्रभर उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिलाय. 

अतिवृष्टीनं झालेल्या शेतकऱ्यांना (Farmers) नुकसान भरपाई मिळावी, सोयाबीन आणि कापसाला योग्य दर मिळावा यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Saghtana ) वतीनं बुलढाण्यात (Buldhana) 'एल्गार मोर्चा' काढण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. उभी पिकं वाया गेली होती. शेतकऱ्यांची हाती येणारी पिकं वाया गेल्यानं राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची पिकं या पावसाच्या फटक्यातून वाचली आहेत, त्या पिकांना योग्य दर मिळावा, यासाठी आजचा एल्गार मोर्चा काढण्यात आला. राज्यभरातून शेतकरी या आंदोलनासाठी बुलढाण्यात दाखल झाले होते.  

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी रविकांत तुपकर यांनी राज्य सरकरवर जोरदार हल्लाबोल केला. सरकारकडून शेतकऱ्याला लाचार बनवले जात आहे. एका आठवड्यात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्यात येईल. शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा रविकांत तुपकर यांनी यावेळी दिला. याबरोबरच ही लढाई आता सुरू झाली असून कापूस सोयाबीन सध्या विक्रिला काढू नका असे आवाहन देखील यावेळी तुपकर यांनी शेतकऱ्यांना केले. 

"स्टॉक लिमिट उठवण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र या बातम्या आताच का येत आहेत? असा प्रश्न रविकांत तुकपर यांनी यावेळी उपस्थित केला. "मोर्चा पाहून नेत्यांची प्रेस नोट काढायची स्पर्धा वाढली आहे. ज्यांनी ज्यांनी सोयाबीनचे भाव पाडले आता त्यांचे भाव पाडण्याची वेळ आली आहे, असा इशारा देखील रविकांत तुपकर यांनी यावेळी दिला आहे.  

 शेतकऱ्यांना दिली शपथ 
दरम्यान, यावेळी रविकांत तुपकर यांनी मोर्चासाठी उपस्थित राहिलेल्या  शेतकऱ्यांना शपथ देण्यात दिली.  

महत्वाच्या बातम्या

Aurangabad: औरंगाबादेत बैलगाडा शर्यतीवरून राडा; बघण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Loksabha : सांगलीच्या जागेवरुन कॉंग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत मनोमिलन? संजय राऊत पोहोचताच घडामोडी सुरु!
सांगलीच्या जागेवरुन कॉंग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत मनोमिलन? संजय राऊत पोहोचताच घडामोडी सुरु!
PBKS Ashutosh Sharma: मुंबईची धाकधूक वाढवणाऱ्या आशुतोषची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी, एक वेळचं जेवणही मिळत नव्हतं!
मुंबईची धाकधूक वाढवणाऱ्या आशुतोषची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी, एक वेळचं जेवणही मिळत नव्हतं!
लग्नासाठी निघालेल्या दोन भावांचा नाहक जीव गेला; वेगातील कारची जोरदार धडक
लग्नासाठी निघालेल्या दोन भावांचा नाहक जीव गेला; वेगातील कारची जोरदार धडक
Ravi Kishan : ''आम्ही खोटं बोलतोय मग DNA चाचणी करा''; रवी किशनच्या कथित मुलीचे आव्हान
''आम्ही खोटं बोलतोय मग DNA चाचणी करा''; रवी किशनच्या कथित मुलीचे आव्हान
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Loksabha Election Nagpur : मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगाNagpur Loksabha Election :  नागपुरात एक तास उशीरा मतदान सुरू झाल्यामुळे मतदारांच्या लांबच लांब रांगाLoksabha Election 2024: भंडारा - गोंदिया मतदान केंद्रावर मतदारांची रांगDeepak Kesarkar : विनायक राऊत राज्यमंत्री होऊ शकले नाहीत; केसरकरांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Loksabha : सांगलीच्या जागेवरुन कॉंग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत मनोमिलन? संजय राऊत पोहोचताच घडामोडी सुरु!
सांगलीच्या जागेवरुन कॉंग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत मनोमिलन? संजय राऊत पोहोचताच घडामोडी सुरु!
PBKS Ashutosh Sharma: मुंबईची धाकधूक वाढवणाऱ्या आशुतोषची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी, एक वेळचं जेवणही मिळत नव्हतं!
मुंबईची धाकधूक वाढवणाऱ्या आशुतोषची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी, एक वेळचं जेवणही मिळत नव्हतं!
लग्नासाठी निघालेल्या दोन भावांचा नाहक जीव गेला; वेगातील कारची जोरदार धडक
लग्नासाठी निघालेल्या दोन भावांचा नाहक जीव गेला; वेगातील कारची जोरदार धडक
Ravi Kishan : ''आम्ही खोटं बोलतोय मग DNA चाचणी करा''; रवी किशनच्या कथित मुलीचे आव्हान
''आम्ही खोटं बोलतोय मग DNA चाचणी करा''; रवी किशनच्या कथित मुलीचे आव्हान
Sangli Loksabha : चंद्रहार पाटील सांगली लोकसभेला उमेदवारी अर्ज दाखल करणार;  विश्वजित कदम उपस्थित राहणार की नाही?
चंद्रहार पाटील सांगली लोकसभेला उमेदवारी अर्ज दाखल करणार; विश्वजित कदम उपस्थित राहणार की नाही?
Pune Crime News : सलग चौथ्या दिवशी पुणे गोळीबारनं हादरलं; जुन्या वादाचा राग मनात धरून झाडल्या थेट तीन गोळ्या
Pune Crime News : सलग चौथ्या दिवशी पुणे गोळीबारनं हादरलं; जुन्या वादाचा राग मनात धरून झाडल्या थेट तीन गोळ्या
निवडणुकीत दारुसह किंवा पार्ट्यांचं प्रलोभन, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, 8 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीत दारुसह किंवा पार्ट्यांचं प्रलोभन, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, 8 कोटींचा मुद्देमाल जप्त
Divyanka Tripathi : अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा अपघात, रुग्णालयात पार पडली शस्त्रक्रिया; आता प्रकृती कशी?
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा अपघात, रुग्णालयात पार पडली शस्त्रक्रिया; आता प्रकृती कशी?
Embed widget