एक्स्प्लोर

Anil Bonde : तेलंगणाच्या अर्थमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यात तथ्य; अनिल बोंडेंनी केलं समर्थन

तेलंगणाचे अर्थमंत्री टी हरीश राव यांनी केलेल्या वक्तव्याचे भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी समर्थन केले आहे. तेलंगणाच्या अर्थमंत्र्यांनी जे वक्तव्य केलंय त्यामध्ये तथ्य असल्याचे बोंडे म्हणालेत.

Anil Bonde : तेलंगणाच्या अर्थमंत्र्यांनी जे वक्तव्य केलंय त्यामध्ये तथ्य आहे. महाराष्ट्रात रात्री 11 ते सकाळी 9 यावेळेत वीजपुरवठा केला जातो. त्यामुळं शेत ओलीत कसं करायचं? दिवसा वीजपुरवठा खंडीत असतो असे मत भाजप नेते डॉ.अनिल बोंडे यांनी व्यक्त केलं. शेतीला सलग 8 तास वीजपुरवठा केला तरच शेतकऱ्यांना पिकं वाचवणं शक्य असल्याचे बोंडे यावेळी म्हणाले. हे सरकार शेतकऱ्याचं दुश्मन झालं असल्याचा आरोपही बोंडे यांनी यावेळी केला.

एका ट्रान्सफॉर्मरवर अनेक कनेक्शन असल्यानं ट्रान्सफॉर्मर बंद पडते. 80 टक्के बील भरल्याशिवाय ते सुरू होत नाही. मोर्शी वरुड तालुक्यातील सोलर प्रोजेक्ट अद्यापही बंद असल्याचे बोंडे म्हणाले.
शेतकरी आपला जीव धोक्यात घालून शेती करीत आहे. म्हणून जर शेतकरी तेलंगणात शेती खरेदी करत असतील तर त्यांच्या वक्तव्यात काही चूक नाही. हे सरकार शेतकऱ्याचं दुश्मन झालं असल्याचा आरोपही यावेळी अनिल बोंडे यांनी केला. महाराष्ट्रात या सरकारनं शेतकऱ्यांना सळो की पळो करुन सोडलं आहे. दिवसा वीज खंडीत असते. बंद पडलेले ट्रान्सफॉर्मर लवकर दुरुस्त करत नाहीत. पंधरा पंधरा दिवस ते दुरुस्त केले जात नाहीत. फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी म्हणून सोलर प्रोजेक्ट आणला होता. मात्र, या सरकारने सगळेच बंद केल्याचा आरोप बोंडे यांनी केला. आज शेतकऱ्यांना आपल्या पिकासाठी जीव धोक्यात घालावा लागत असल्याचे ते म्हणाले.

नेमकं काय म्हणाले होते तेलंगणाचे अर्थमंत्री

वीज टंचाईमुळे त्रस्त असलेले महाराष्ट्रातील शेतकरी तेलंगणात शेती विकत घेत असल्याचे वक्तव्य तेलंगणाचे अर्थमंत्री टी हरीश राव यांनी केले. महागड्या विजेमुळे उद्योजक कर्नाटकात जात आहेत, तर मराठी शेतकरी तेलंगणात येत आहेत. शेतीसाठी 24 तास वीज पुरवठ्याच्या दृष्टीने तेलंगणातील जमिनीत शेतकरी गुंतवणूक करत असल्याचे टी हरीश राव यांनी सांगितलं. सध्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांना शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा होत आहे. हा वीजपुरवठा देखील टप्प्यात होत आहे. तेलंगणामध्ये ज्या योजना राबवल्या जात आहेत, त्या देशात इतरत्र कुठेही दिसू शकत नाहीत, असेही हरीश म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसानचा 24 वा हप्ता मिळवण्यासाठी 'हे' काम करा, अन्यथा लाभापासून राहाल वंचित 
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसानचा 24 वा हप्ता मिळवण्यासाठी 'हे' काम करा, अन्यथा लाभापासून राहाल वंचित 
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर वरुणराजानं दिलं दर्शन, बळीराजाला दिलासा, कोण कोणत्या भागात पावसाची हजेरी?
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर वरुणराजानं दिलं दर्शन, बळीराजाला दिलासा, कोण कोणत्या भागात पावसाची हजेरी?
कापूस सोयाबीन पेरुनही उगवलं नाही, वडिलांनी घेतलेलं कर्ज फेडायचं कसं? बीडच्या तरुण शेतकऱ्यानं संपवलं जीवन
कापूस सोयाबीन पेरुनही उगवलं नाही, वडिलांनी घेतलेलं कर्ज फेडायचं कसं? बीडच्या तरुण शेतकऱ्यानं संपवलं जीवन

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget