एक्स्प्लोर

Raju shetti : महापुरामुळं बाधित होणाऱ्या पिकांचा पीक विम्यामध्ये समावेश करावा, राजू शेट्टींचं मुख्यमंत्र्यांना पत्र

सरकारने तातडीने महापूरबाधित होणाऱ्या पिकांचा पीक विम्यामध्ये समाविष्ट करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju shetti) यांनी केली आहे.

Raju shetti : दरवर्षी अतिवृष्टी, महापूर यामुळं राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान होतं. या नुकसानीमुळं शेतकरी पुरता कोलमडतो. त्यामुळं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची गरज असते. म्हणून सरकारने तातडीने महापूरबाधित होणाऱ्या पिकांचा पीक विम्यामध्ये समाविष्ट करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju shetti) यांनी केली आहे. याबाबत शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहले आहे. या पत्रात शेट्टींनी ही मागणी केली आहे.

महापूर पट्ट्यात दरवर्षी शेतकऱ्यांच्या पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. विशेषत सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत मोठे पूर आले होते. गेल्या काही वर्षांत या जिल्ह्यांमध्ये पाच मोठे महापूर येऊन शेतकऱ्यांचे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. 2019  व 2021 च्या महापुरात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या महापुरात अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. गतवर्षी नुकसान होऊनही राज्य सरकारने अतिशय तोकडी मदत देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. ऊस, भात, सोयाबीन, केळी, तसेच भाजीपाला ही पिके प्रामुख्याने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील बागायती पट्ट्यामध्ये घेतली जातात. वेळोवेळी आलेल्या महापुराच्या तडाख्याने ही पिके पूर्णपणे उद्ध्वस्त होतात. या पिकांचा पीक विम्यामध्ये समावेश करावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.

दरम्यान, पीक विम्याच्या हप्त्याची रक्कम शेतकरी भरण्यास तयार आहेत. या पीक विम्यामुळे सरकारला नुकसान भरपाई देताना कोणताही बोजा पडणार नाही. तसेच शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार असल्याचे शेट्टी म्हणाले. महापुरामुळे वेळोवेळी नुकसान भरपाई होणे आता शेतकऱ्यांना अजिबात परवडणारे नाही. महापूरग्रस्त शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून महापूर पट्ट्यातील सर्व पिकांचा पीक विम्यामध्ये समाविष्ट करावा, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे. 

उसाच्या पिकाला एकरी 1 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केली आहे. तसेच सोयाबीन 50 रुपये आणि केळीला 2 लाख रुपयांची मदत करावी. त्याचबरोबर भाजीपाला पिकांचा देखील पीक विम्यामध्ये समावेश करावा अशी मागणी यावेळी राजू शेट्टी यांनी केली आहे.  

महत्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार, मंत्री मुश्रीफांची माहिती, विरोधकांवर टीका
राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार, मंत्री मुश्रीफांची माहिती, विरोधकांवर टीका
आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा, घराचे छप्पर कोसळून वृद्धाचा मृत्यू,  शेती पिकांचंगी मोठं नुकसान
आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा, घराचे छप्पर कोसळून वृद्धाचा मृत्यू,  शेती पिकांचंगी मोठं नुकसान
1200 एकरवर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारणार, निर्यात व्यवस्था बळकट करणार : जयकुमार रावल
1200 एकरवर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारणार, निर्यात व्यवस्था बळकट करणार : जयकुमार रावल
Monsoon 2026: आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार
आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार

व्हिडीओ

Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडमध्ये शेतकऱ्याने मोसंबी बागेवर फिरवला जेसीबी; पाण्याअभावी वाळून गेली बाग, जाळून केली खाक
बीडमध्ये शेतकऱ्याने मोसंबी बागेवर फिरवला जेसीबी; पाण्याअभावी वाळून गेली बाग, जाळून केली खाक
Monsoon Rain Maharashtra: मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट, परिस्थिती पोषक, देवगडमध्ये..
मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट, परिस्थिती पोषक, देवगडमध्ये..
आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
Suryakumar Yadav : टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्मासोबत जे घडलं, तेच सूर्यकुमार यादव सोबत झालं, BCCI च्या निर्णयानं सगळे चक्रावले...
टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्मासोबत जे घडलं, तेच सूर्यकुमार यादव सोबत झालं, BCCI चा मोठा निर्णय
Bal Mane Vidhan Parishad Election 2026 : माघार अन् हकालपट्टीनंतर बाळ मानेंचे लागोपाठ दुसऱ्या दिवशी 'ते' स्टेटस चर्चेत; कोकणच्या राजकारणात तर्कवितर्कांना वेग, रोख नेमका कुणाकडे?
माघार अन् हकालपट्टीनंतर बाळ मानेंचे लागोपाठ दुसऱ्या दिवशी 'ते' स्टेटस चर्चेत; कोकणच्या राजकारणात तर्कवितर्कांना वेग, रोख नेमका कुणाकडे?
Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: छगन भुजबळांना राज्यसभा अन् समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद? राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटले, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता
छगन भुजबळांना राज्यसभा अन् समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद? राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटले, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता
राष्ट्रवादीने दोनवेळा दगा दिला, भाजपसोबत आतून छुपी युती होते का? पुणे विधानपरिषद बिनविरोध झाल्याने वसंत मोरेंचा सवाल
राष्ट्रवादीने दोनवेळा दगा दिला, भाजपसोबत आतून छुपी युती होते का? पुणे विधानपरिषद बिनविरोध झाल्याने वसंत मोरेंचा सवाल
Devendra Fadnavis and Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
Embed widget