एक्स्प्लोर

Onion Price: कांद्याच्या किमतींत दुप्पट वाढ, केंद्र सरकारकडून आणखी एक महत्त्वाचा निर्णय, दर घटणार?

Onion Price Hike: देशातील अनेक शहरांमध्ये कांद्याचे भाव झपाट्यानं वाढत असून, याच पार्श्वभूमीवर सरकारनं आणखी एक पाऊल उचललं आहे. त्यामुळे कांद्याचे भाव कमी होऊ शकतात.

Onion Price Latest Update: काही दिवसांपूर्वी देशभरात टॉमेटोनं (Tomato Price Hike) सर्वसामान्यांच्या खिशाला चिमटा काढलेला. आता आधाचीपासूनच महागाईमुळे पिचलेल्या सर्वसामान्यांना कांदा (Onion Price Hike) रडवण्याच्या तयारीत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कांद्याचे भाव झपाट्यानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र (Maharashtra), दिल्ली एनसीआरसह अनेक शहरांमध्ये कांदा 80 रुपये किलोच्या आसपास विकला जात आहे. गेल्या आठवड्यापासून कांद्याच्या दरात दुपटीनं वाढ झाली आहे. जिथे काही दिवसांपूर्वी कांदा 30 ते 35 रुपये किलोनं विकला जात होता. तिथे आता 75 ते 80 रुपये किलोनं विकला जात आहे. 

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, एकंदरीत यंदा कमी पडलेल्या पावसामुळे कांद्याचे दर वाढल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, ऐन सणासुदीच्या काळात कांद्याचे भाव वधारल्यामुळे सर्वसामान्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशातच यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेत, एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या काळात वाढलेली कांद्याची मागणी कमी करण्यासाठी केंद्र सरकार आपल्या बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणणार आहे. तसेच, अनेक राज्यांमध्ये हा स्कॉट जारी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. 

सरकार 16 शहरांमध्ये बफर स्टॉक विकणार 

दिवाळीपूर्वीच कांद्याबरोबरच इतर भाज्यांनाही मागणी वाढली आहे. त्यामुळे काही दिवसांत कांद्याचे दर दुपटीनं वाढले आहेत, तर इतर भाज्यांचे भाव पुन्हा एकदा वाढल्याचं पाहायला मिळत आहे. लाईव्ह मिंटच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यानं सांगितलं की, सध्याच्या महागाईला आळा घालण्यासाठी सरकार आपल्या बफर स्टॉकमधून सुमारे 16 शहरांमध्ये कांद्याची विक्री सुरू ठेवेल. 

कुठे आणि किती किंमत?

देशाच्या भांडवली किरकोळ बाजारात कांद्याचा सरासरी दर 80 रुपये किलोनं विकला जात आहे, जो गेल्या आठवड्यात 60 रुपये आणि दोन आठवड्यांपूर्वी 30 रुपये होता. चंदीगढ, कानपूर आणि कोलकाता सारख्या इतर शहरांमध्ये कांद्याचे भाव सारखेच आहेत. ते आणखी पुढे जाऊ शकतात, असं किरकोळ बाजारातील विक्रेत्यांचं म्हणणं आहे.

निर्यात शुल्क लागू 

कांद्याची किंमत कमी करण्यासाठी सरकारनं 28 ऑक्टोबर रोजी किमान निर्यात शुल्क (MEP) 800 डॉलर निश्चित केलं आहे. या लादलेल्या शुल्कामुळे सर्वोच्च किंमतीतून 5 ते 9 टक्क्यांनी घट झाल्याचं सरकारचं म्हणणं आहे. महाराष्ट्रात कांद्याच्या घाऊक भावात 4.5 टक्क्यांनी घट झाली आहे.

पावसाळ्यामुळे पुरवठ्यावर परिणाम 

जून ते सप्टेंबर या कालावधीतील कमकुवत पावसानं महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन प्रमुख पुरवठादारांमध्ये खरीप कांदा पिकाचं नुकसान केलं आहे. त्यामुळे कांद्याच्या काढणीला उशीर झाला, तर हिवाळी पिकांचा साठा जवळपास संपला असून त्यामुळेच दर पुन्हा वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Pune Crime : पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट

व्हिडीओ

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Pune Crime : पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
Embed widget