एक्स्प्लोर

मंत्र्यांनी नुकसानीच्या पाहणीसाठी यावं की नाही हा त्यांचा प्रश्न, मी राजवाडा सोडून शेतकऱ्याच्या बांधावर आलोय : संभाजीराजे

Sambhaji Raje in Beed : माजी खासदार छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांनी आज बीड जिल्ह्यातल्या अतिवृष्टीची पाहणी करुन जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांची भेट घेतली.

Sambhaji Raje in Beed : माजी खासदार छत्रपती संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी आज बीड (Beed) जिल्ह्यातल्या अतिवृष्टीची पाहणी करुन जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांची भेट घेतली. माजी खासदार संभाजीराजे हे पावसामुळे पडलेले सोयाबीन (Soybean) घेऊन जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

गेल्या चार दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने थैमान घातलं आहे तरी देखील अद्याप एकही मंत्री आणि बीडचे पालकमंत्री अतुल सावे हे नुकसानीची पाहणी करण्यासाठी बीड जिल्ह्यात आले नाहीत. याबाबत संभाजीराजे छत्रपती यांना विचारलं असता ते म्हणाले की, "नुकसान पाहणीसाठी यावं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र मी राजवाडे सोडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेत आहे."

बीड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी तात्काळ मदत जाहीर करा : संभाजीराजे
परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यात मोठे नुकसान झालं आहे. त्यामुळे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या विशेष बाबीतून बीड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी तात्काळ मदत जाहीर करावी, असे देखील संभाजीराजे म्हणाले. दरम्यान आज (20 ऑक्टोबर) होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारकडून शेतकऱ्यांना मोठी मदत मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

बीडमध्ये परतीच्या पावसाचं थैमान, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातलं असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे कापूस तसंच सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तर मांजरसुंबा पाटोदा या रस्त्याचं नव्याने काम झालं असून यावर नाले नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. 

फळबागांना मोठा फटका
बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे फक्त सोयाबीन, कापूस या पिकालाच फटका बसला नाही तर फळबागांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. चार दिवस पडलेल्या पावसामुळे गेवराई तालुक्यातील मोसंबीच्या फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. तोडणीला आलेल्या मोसंबीच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ झाली असून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. जास्तीच्या पावसामुळे सोयाबीन आणि कापसाचं तर नुकसान झालेच पण फळबागा देखील या पावसामुळे उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे फळबागांचे देखील पंचनामे करुन या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मंत्र्यांना विधान परिषदेच्या घोडेबाजारात रस, मात्र, शेतकऱ्यांसाठी वेळ नाही, केळीच्या नुकसानीवरुन एकनाथ खडसेंचा हल्लाबोल 
मंत्र्यांना विधान परिषदेच्या घोडेबाजारात रस, मात्र, शेतकऱ्यांसाठी वेळ नाही, केळीच्या नुकसानीवरुन एकनाथ खडसेंचा हल्लाबोल 
तुम्ही मोठी माणसं, मी साधा माणूस, कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंकडून शेतकऱ्याची थट्टा? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
तुम्ही मोठी माणसं, मी साधा माणूस, कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंकडून शेतकऱ्याची थट्टा? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Satej Patil: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Video: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Akola Urea Fertilizer Shortage : महाराष्ट्रात युरिया खताचा प्रचंड तुटवडा, अकोटमध्ये शेतकरी रात्रभर कृषी केंद्राबाहेर झोपले, गर्दीमुळे अखेर पोलीस कमांडो बोलावले
महाराष्ट्रात युरिया खताचा प्रचंड तुटवडा, अकोटमध्ये शेतकरी रात्रभर कृषी केंद्राबाहेर झोपले, गर्दीमुळे अखेर पोलीस कमांडो बोलावले

व्हिडीओ

Abhijeet Dipke interview : भाजप सोडून सगळे पाकिस्तानी का? अराजकता कोण पसरवतंय? - ABP Majha
Sanjay Raut On Abhijeet Dipke : अभिजीत दिपके-नरेंद्र मोदींची अमेरिकेत भेट झाली, राऊतांचा खळबळजनक दावा
Abhijeet Dipke PC :कुठे कुठे आंदोलन करणार? टार्गेटकाय? अभिजीत दिपकेंची पत्रकार परिषद
Cab driver attacks senior citizen in Thane : वृद्धाला मारहाण साफ करा ही 'घाण' | Special Report
Vidhan Parishad Drama : विधान परिषदेच्या निवडणुकीचा गोंधळ सुरुच | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon News: जिद्दीसमोर गरिबी हरली; दोन भावांनी बैलाच्या जागी स्वतःला जुंपून घेत चार एकर जमीन कसली, म्हणाले 'आम्हाला हा खर्च परवडणारा नव्हता...'
जिद्दीसमोर गरिबी हरली; दोन भावांनी बैलाच्या जागी स्वतःला जुंपून घेत चार एकर जमीन कसली, म्हणाले 'आम्हाला हा खर्च परवडणारा नव्हता...'
Vaibhav Sooryavanshi: श्रीलंकेतही 'सूर्यवंशी' वादळ घोंगावलं; वैभवच्या धडाकेबाज खेळीत दिसली किंग कोहलीची झलक, चक्क षटकारांचा नाद सोडत इतक्या चौकारांचा वर्षाव केला की..
श्रीलंकेतही 'सूर्यवंशी' वादळ घोंगावलं; वैभवच्या धडाकेबाज खेळीत दिसली किंग कोहलीची झलक, चक्क षटकारांचा नाद सोडत इतक्या चौकारांचा वर्षाव केला की..
Thane : तब्येत कशी आहे? पाय कसा आहे? मारहाण झालेल्या वृद्धाशी राज ठाकरेंचा संवाद, काही लागल्यास मदतीचं आश्वासन
तब्येत कशी आहे? पाय कसा आहे? मारहाण झालेल्या वृद्धाशी राज ठाकरेंचा संवाद, काही लागल्यास मदतीचं आश्वासन
Kolhapur Crime: तब्बल 10 महिने तरुणीवर सामूहिक अत्याचार अन् बदमाश आरोपींची पोलीस गाडीत बसून पोलिसांसमोर मिश्या पिळत खुन्नस, पोलिसांनीच VIP ट्रिटमेंट दिली का?
तब्बल 10 महिने तरुणीवर सामूहिक अत्याचार अन् बदमाश आरोपींची पोलीस गाडीत बसून पोलिसांसमोर मिश्या पिळत खुन्नस, पोलिसांनीच VIP ट्रिटमेंट दिली का?
Nanded Crime Aanchal Mamidwar: सक्षमच्या मृत्यूनंतर आयुष्यभर सासरी राहण्याची शपथ, पण आंचल घरातून निघून गेली, सासऱ्यांचाही मृत्यू, ताटेंचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं
सक्षमच्या मृत्यूनंतर आयुष्यभर सासरी राहण्याची शपथ, पण आंचल घरातून निघून गेली, सासऱ्यांचाही मृत्यू, ताटेंचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं
Nashik Vidhan Parishad Election 2026: मोठी बातमी: अखेर गोकुळ गीतेंचं बंड शमवण्यात महाजन-उदय सामंतांना यश, विधान परिषद निवडणुकीतून घेतली माघार
अखेर गोकुळ गीतेंचं बंड शमवण्यात महाजन-उदय सामंतांना यश, विधान परिषद निवडणुकीतून घेतली माघार
Mumbai Aqua Line Metro: भुयारी मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची नेटवर्क कनेक्टिव्हिटीची समस्या संपली; अ‍ॅक्वा लाईनवर फुल्ल नेटवर्क
आता भुयारी मेट्रोतही फुल्ल नेटवर्क मिळणार; प्रवाशांची नेटवर्क कनेक्टिव्हिटीची कटकट संपली
Pune News : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या रथाला जोडण्यात येणाऱ्या बैलजोडीच्या मानावरून वाद; आळंदीत उमेश राणवडे यांचे बैलजोडीसह बेमुदत आंदोलन
माऊलींच्या रथाला जोडण्यात येणाऱ्या बैलजोडीच्या मानावरून वाद; आळंदीत उमेश राणवडे यांचे बैलजोडीसह बेमुदत आंदोलन
Embed widget