एक्स्प्लोर

Banana News : केळीला हमीभाव जाहीर करा, नंदूरबारमध्ये केळी संशोधन केंद्र उभारावं, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी 

Banana News : केळीला हमीभाव मिळावा म्हणून राष्ट्रवादीचा पाठपुरावा सुरु असल्याची माहिती नंदूरबार जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी दिला आहे.

Banana News : नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केळीचे (Banana) उत्पादन घेतलं जातं. मात्र, केळी पिकाला पाहिजे तसा दर मिळत नाही. त्यामुळं जिल्ह्यातील  केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. केळीला हमीभाव मिळावा म्हणून राष्ट्रवादीचा पाठपुरावा सुरु असल्याची माहिती नंदूरबार जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी दिला आहे. जिल्ह्यात केळी खरेदीवर बाजार समितीचे नियंत्रण नसल्यानं व्यापारी मनमानी कारभार करत असतात. शेतकऱ्यांना दर देताना मोठ्या प्रमाणात मनमानी सुरु असल्याने खासगी व्यापाऱ्यांना चाप बसण्यासाठी केळीला शासनानं हमीभाव जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात केळी संशोधन केंद्र उभं करावं अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. 

उत्तर महाराष्ट्रात 45 हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते. त्यापैकी 15 हेक्टर क्षेत्र एकट्या नंदूरबार जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड केली जाते. जिल्ह्यातील नंदूरबार, शहादा, तळोदा,अक्कलकुवा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केळीच क्षेत्र आहे. मात्र, जिल्ह्यात केळी खरेदीवर बाजार समितीचे नियंत्रण नसल्यानं व्यापारी मनमानी करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे.

केळीचा उत्पादन खर्च मोठा

केळी पिकाला पाहिजे तसा हमीभाव मिळत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी केळीसाठी केलेला खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. केळीच्या पिकांसाठी मोठा खर्च करावा लागत आहे. केळीसाठी महागडी खत, निंदणी, ठिंबक, सिंचन ,मल्चिंग पेपर अशा अनेक साहित्य केळी पिकांसाठी लागत आहेत. सध्या मजुरांची मजुरी देखील वाढली आहे. व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या प्रकरणात देखील मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं शेतकरी दुहेरी  संकटात सापडला आहे. नंदूरबार जिल्ह्यात केळी खरेदी विक्री बाजार समितीच्या नियंत्रणात आणावी, तसेच शासनाने हमी भाव जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

सरकारनं हमीभाव जाहीर केला नसल्यामुळं शेतकऱ्यांची लूट होण्याची शक्यता 

महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यानंतर नंदूरबार जिल्ह्यात केळीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जाते. यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. केळीचं उत्पादनही चांगले आलं आहे. मात्र, सरकारनं हमीभाव जाहीर केला नसल्यामुळं शेतकऱ्यांची लूट होण्याची शक्यता असल्याचे मत नंदूरबार जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी व्यक्त केले.  जे खासगी व्यापारी आहेत, ते कमी दरात केळीची खरेदी करतात, अनेक तोता व्यापारी देखील जिल्ह्यात येत असतात. मागील वर्षी देखील काही ठिकाणी अशा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून ट्रकच्या ट्रक माल खरेदी करुन शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत. त्यामुळं सरकारनं तातडीनं केळीला हमीभाव जाहीर करावा अशी मागणी मोरे यांनी केली आहे. केळी पिकाला पाहिजे तसा हमीभाव मिळत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी केळीसाठी केलेला खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. केळीच्या पिकांसाठी मोठा खर्च करावा लागत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Banana Farming : केळीला उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव मिळावा, केळी उत्पादक शेतकरी संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
Embed widget