एक्स्प्लोर

KisanPutra Aandolan : 'अन्नदात्यासाठी आज अन्नत्याग', शेतकरी स्वातंत्र्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे पडणार : किसानपुत्र आंदोलन

आज किसानपुत्र आंदोलनाच्या वतीनं अन्नत्याग आंदोलन केलं जाणार आहे. तसेच आंबाजोगाईत आज किसानपुत्रांचा मेळावा देखील आज होणार आहे.

KisanPutra Aandolan : दरवर्षी 19 मार्चला किसानपुत्र आंदोलनाच्या वतीनं एक दिवस अन्नत्याग आंदोलन केलं जातं. 19 मार्च 1986 ला साहेबराव करपे यांच्या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली होती. ही राज्यातील शेतकरी आत्महत्येची पहिली घटना होती.  या घटनेच्या स्मृतीपित्यर्थ किसानपुत्र आंदोलनाच्या वतीनं दरवर्षी एक दिवस उपवास केला जातो. यंदाही आज सर्वजण एक दिवस उपवास करणार आहेत. उपवासाचे हे सहावे वर्ष आहे. तसेच आज आंबाजोगाईत किसानपुत्रांचा मेळावा देखील होणार आहे.

दरम्यान, दरवर्षी किसानपुत्र आंदोलनाला प्रतिसाद वाढत आहे. यंदा प्रचंड संख्येने लोक उपवास करणार आहेत. याशिवाय महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यातील 48 किसान पुत्रांनी पानगाव ते अंबाजोगाई अशी सलग तीन दिवस शेतकरी संहवेदना पदयात्रा काढली आहे. गेली दोन वर्षे आपण सतत कोरोनाचा प्रादुर्भावाखाली वावरत असल्यामुळं कोणतेही जाहीर कार्यक्रम आपल्याला घेता आले नाहीत. तरीही वैयक्तिक उपवास करुन देश विदेशातील हजारो किसान पुत्रांनी या आंदोलनात सहभाग घेतल्याची माहिती किसानपुत्र आंदोलनचे अमर हबीब यांनी दिली.


KisanPutra Aandolan : 'अन्नदात्यासाठी आज अन्नत्याग', शेतकरी स्वातंत्र्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे पडणार : किसानपुत्र आंदोलन

यावर्षी कोरोनाचे सावट संपले असल्यामुळं आपल्याला जाहीर कार्यक्रम घेता येत आहे. आंबाजोगाईत या पदयात्रेचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यभरातून आलेल्या किसानपुत्रांचा मेळावा नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात अमर हबीब, राजीव बसरगेकर, कॅप्टन मोहन जोशी, सुभाष कछवे हे मार्गदर्शन करणार आहेत.

या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासोबतच तुमच्यावर आणखीन एक जबाबदारी वाढली आहे. ती म्हणजे उपवासाबाबत सोशल मीडियाचा सशक्त वापर करण्याची. तुम्ही उपवास करताना आपल्या घरावर किंवा जिथे कराल तिथे 'अन्नदात्यासाठी अन्नत्याग 19 मार्च' असे फलक लावा. घरी सर्व कुटुंब उपवास करणार असेल तर या फलकासोबत सर्वांचा फोटो घेऊन तो सोशल मीडियावर (फेसबुक, व्हाट्स अँप, ट्विटर इ.) टाका. जमले तर, मी अन्नदात्यासाठी अन्नत्याग का करीत आहे हे सांगणारा व्हिडीओ करा. तो ही शेअर करा असे सांगण्यात आले आहे.


KisanPutra Aandolan : 'अन्नदात्यासाठी आज अन्नत्याग', शेतकरी स्वातंत्र्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे पडणार : किसानपुत्र आंदोलन

वैयक्तिक उपवासाची तुमची पोस्ट तर टाकाच, पण इतरांचीही टाका. जे जे तुमच्या माहितीतील उपवास करतील, त्यांची पोस्ट तुम्ही टाका. एक वाक्याचा व्हिडीओ अथवा एक वाक्याची पोस्ट टाकली तरी चालेल. 19 मार्च रोजी पुर्ण सोशल मीडिया केवळ अन्नत्याग आंदोलनाने व्यापला पाहिजे असा आपण प्रयत्न करु. या प्रयत्नात सर्वात अधिक सहभाग तुमचा असावा ही अपेक्षा असल्याचे आंदोलनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. 19 मार्चच्या उपवासाने शेतकरी स्वातंत्र्याच्या दिशेने आपले एक पाऊल पुढे पडणार आहे. ते पाऊल दमदार पद्धतीनं पडावे यासाठी आपण सगळे प्रयत्न करु असे अमर हबीब म्हणाले.

19 मार्च 1986 ला साहेबराव करपे यांच्या संपूर्ण कुटुंबानं आत्महत्या केली होती. वीज बिल भरले नाही म्हणून त्यांची वीज कट करण्यात आली होती. ते वीज बिल भरु शकले नाहीत. जमीन विकायला काढली तर ग्राहक नाही. अशा परिस्थितीत साहेबराव यांना आत्महत्या करावी लागली. या घटनेच्या स्मृतीपित्यर्थ 2017 पासून किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने दरवर्षी 19 मार्चला 'अन्नत्याग आंदोलन' केलं जातं. या आंदोलनात महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील व विदेशात गेलेले किसानपुत्र देखील सहभागी होतात. लाखाहून अधिक लोक 19 मार्चला उपवास करतात. 2017 ला साहेबराव करपे यांचे गाव चील गव्हाणला भेट देऊन महागाव येथे उपोषण केल्याची माहिती अमर हबीब यांनी दिली.

 

महत्त्वाच्या बातम्या

ना बैल, ना ट्रॅक्टर! शेतकऱ्याने थेट मुलगा आणि भावाच्या खांद्यावरच दिली तिफन, तर पत्नी व भावजयीने धरला कुळव
ना बैल, ना ट्रॅक्टर! शेतकऱ्याने थेट मुलगा आणि भावाच्या खांद्यावरच दिली तिफन, तर पत्नी व भावजयीने धरला कुळव
Chandrashekhar Bawankule: शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा! शेतीकामांसाठी गौण खनिजावरील 'रॉयल्टी' पूर्णपणे माफ, अर्ज कसा कराल, A टू Z माहिती
शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा! शेतीकामांसाठी गौण खनिजावरील 'रॉयल्टी' पूर्णपणे माफ, अर्ज कसा कराल, A टू Z माहिती
बँकेत चकरा मारुनही पिक कर्ज मिळालं नाही, पेरणीसाठी पैसे नसल्यानं शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, बीडच्या केज तालुक्यात धक्कादायक घटना
बँकेत चकरा मारुनही पिक कर्ज मिळालं नाही, पेरणीसाठी पैसे नसल्यानं शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, बीडच्या केज तालुक्यात धक्कादायक घटना
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Bhimashankar Temple : स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
Jalna Bus Accident News : भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
Raigad Rain Rice Farming: चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो सावधान! पावसाचा जोर आणखी वाढणार; यलो मेट्रो बंद पडली, विरारमध्ये धडकी भरवणारी दृश्यं
मुंबईकरांनो सावधान! पावसाचा जोर आणखी वाढणार; यलो मेट्रो बंद पडली, विरारमध्ये धडकी भरवणारी दृश्यं
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Eknath Shinde Health: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना कामाचा अतिताण, उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल
मोठी बातमी: एकनाथ शिंदे अचानक रुग्णालयात दाखल, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु
Embed widget