एक्स्प्लोर

Farmers Protest : 200 शेतकरी संघटना दिल्लीत एकत्र येणार, 7 ऑक्टोबरपासून तीन दिवस बैठका

विविध शेतकरी संघटना (Shetkari Sanghatana) पुन्हा आक्रमक झाल्या आहेत. हमीभावाचा (MSP) कायदा करण्याच्या मुद्यावरुन शेतकरी संघटना आंदोलनाच्या तयारीत आहेत.

Farmers Protest Against MSP : विविध शेतकरी संघटना (Shetkari Sanghatana) पुन्हा आक्रमक झाल्या आहेत. हमीभावाचा (MSP) कायदा करण्याच्या मुद्यावरुन शेतकरी संघटना आंदोलनाच्या तयारीत आहेत. केंद्र सरकारवर दबाव तंत्राचा वापर करण्यासाठी 200 शेतकरी संघटना दिल्लीत एकत्र येणार आहेत. सात आक्टोबरपासून नऊ ऑक्टोबरपर्यंत तीन दिवस शेतकरी संघटनांच्या दिल्लीत बैठका होणार आहेत. या सर्व संघटना  व्ही एम सिंह (VM Singh) यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येणार आहेत. सिंह हे सयुक्त किसान मोर्चापासून अलग झाले आहेत. 

या सर्व शेतकरी संघटना एकत्र येत केंद्र सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. हमीभावाचा कायदा करण्यासाठी या शेतकरी संघटना आग्रही आहेत. सरकारनं आश्वासन देऊन देखील हमीभावाच्या कायद्याबाबत ठोस पाऊल उचलले नसल्याचे शेतकरी संघटनांनी म्हटलं आहे. व्ही एम सिंह यांनी सर्व शेतकरी संघटनांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्लीत शेतकऱ्यांचे मोठे शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. 28 राज्यातील शेतकरी देखील यावेळी दिल्लीत उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

सरकारच्या विरोधात शेतकरी संघटना मैदानात

हमीभावाच्या कायद्याबाबत केंद्र सरकारनं समिती स्थापन करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, आजपर्यंत एकही समिती स्थापन झालेली नाही. याला संयुक्त किसान मोर्चानं विरोध केला. ज्यांनी नवे कृषी कायदे केले होते त्यांनाच समितीत स्थान देण्यात आल्याची माहिती शेतकरी नेत्यांनी दिली होती.  त्यामुळं आता इतर शेतकरी संघटनाही सरकारच्या विरोधात उतरल्या आहेत. दरम्यान, गेल्या महिन्याच्या सुरुवातीला संयुक्त किसान मोर्चाने जंतर मंतरवर किसान महापंचायत बोलावली होती. विविध राज्यांतील शेतकरी दिल्लीत पोहोचले होते. एमएसपी आणि लखीमपूर खेरी प्रकरणाच्या विरोधात हा निषेध करण्यात आला. देशातील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी त्यांची मागणी होती. तसेच ऊसाच्या आधारभूत किंमतीत वाढ करावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली होती.

MSP च्या कायद्यासाठी शेतकरी संघटना आग्रही 

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे लागू केल्यानंतर या निर्णयाच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले होते. शेतकऱ्यांनी वर्षभर दिल्लीच्या सिमेवर आंदोलन केलं होतं. या शेतकर्‍यांच्या आंदोलनापुढे नमतं घेत केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे मागे घेतले होते. ऊसाला केंद्र सरकारने निश्चित केलेली एफआरपी शेतकर्‍यांना देणं कायदेशीररित्या बंधनकारक केलं आहे. तशाच पद्धतीने शेतकर्‍याने उत्पादित केलेल्या प्रत्येक कृषिमालाला सरकारने जाहीर केलेला हमीभाव कायदेशीररित्या मिळावा. तसेच यासाठी हमीभावाचा एक कायदा असावा अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली होती. मात्र, अद्याप ही मागणी केंद्र सरकारनं मंजूर केली नाही. MSP च्या कायद्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना पुन्हा आंदोलन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Minimum support price : हमीभावाच्या कायद्यासाठी शेतकरी संघटना पुन्हा मैदानात, दिल्लीत होणार  MSP गारंटी कानून' अधिवेशन 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार, मंत्री मुश्रीफांची माहिती, विरोधकांवर टीका
राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार, मंत्री मुश्रीफांची माहिती, विरोधकांवर टीका
आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा, घराचे छप्पर कोसळून वृद्धाचा मृत्यू,  शेती पिकांचंगी मोठं नुकसान
आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा, घराचे छप्पर कोसळून वृद्धाचा मृत्यू,  शेती पिकांचंगी मोठं नुकसान
1200 एकरवर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारणार, निर्यात व्यवस्था बळकट करणार : जयकुमार रावल
1200 एकरवर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारणार, निर्यात व्यवस्था बळकट करणार : जयकुमार रावल
Monsoon 2026: आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार
आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार

व्हिडीओ

Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
Embed widget