एक्स्प्लोर
Wardha Sahitya Sammelan : चपळगावकर यांच्या अध्यक्षीय भाषणावेळी गर्दी ओसरली?
वर्ध्यात ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला कालपासून सुरूवात झालीय. या संमेलनाचे अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांचं भाषणही झालं. महत्त्वाचं म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यासपीठावर असताना नरेंद्र चपळगावकर यांनी सुमारे नऊ मिनिटेच भाषण केलं. आणि छापिल भाषणातील मुद्दे आणि चपळगावकरांच्या प्रत्यक्ष भाषणातील मुद्द्यांमध्येही ताळमेळ नसल्याची चर्चा रंगलीय. त्याचसोबत, न्या. चपळगावकरांच्या अध्यक्षीय भाषणावेळी बहुतांश खुर्चा रिकाम्या असल्याचं चित्र होतं.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion















