"ओबीसी नेते एकत्र आले म्हणून काहींच्या पोटात दुखतंय, सांभाळून राहिलं पाहिजे" - विजय वडेट्टीवार
जालना येथे ओबीसी समाजाच्या वतीने आज भव्य मोर्चा चे आयोजन करण्यात आलं, जनगणनेत ओबीसीसी समाजाची जातनिहाय जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात केंद्र शासनाने आरक्षणाची अंमलबजावणी करावी, ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागू नये, नॉन क्रिमिलिअरची अट रद्द करावी यासह इतर अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा निघणार असून, या मोर्चात मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार वनमंत्री संजय राठोड,माजी मंत्री पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, हंसराज अहिर महादेव जानकर,समीर भुजबळ विकास माहात्मे यासह सर्वच पक्षातील नेते उपस्थित राहणार आहे जालन्यातील शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली.






















