एक्स्प्लोर
BMC Polls: 'राज ठाकरे तो सोडून द्या, आम्ही उद्धवजींसोबतही लढणार नाही', भाई जगताप यांचा काँग्रेसला स्वबळाचा नारा
मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस नेते भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी एक मोठं वक्तव्य करून महाविकास आघाडीत (MVA) खळबळ उडवून दिली आहे. 'राज ठाकरे (Raj Thackeray) तो सोडून द्या, आम्ही उद्धवजींच्या (Uddhav Thackeray) सोबतही लढणार नाही,' असे म्हणत जगताप यांनी मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यांनी सांगितले की, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि त्यांना संधी मिळायला हवी. जगताप यांच्या या भूमिकेवर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'त्यांना बोलू द्या' असे म्हणत यावर अधिक बोलणे टाळले. तर मनसे नेते अविनाश अभ्यंकर (Avinash Abhyankar) यांनी 'त्यांना कोणी विचारले आहे का?' असा सवाल करत टीका केली आहे. दुसरीकडे, काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनी स्थानिक पातळीवर परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे समर्थन केले, तसेच महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हे मुख्य ध्येय असल्याचे म्हटले आहे.
मुंबई
Mahayuti Full PC : मुंबई शिवसेना-भाजपचा 150 जागांवर एकमत, नवाब मलिक यांच्यासोबत जाण्यास विरोध
Sanjay Raut PC : ...तर एकनाथ शिंदे जेलमध्ये जातील, संजय राऊतांनी सगळंच काढलं
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Thackeray Brother Alliance : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची शेवटची सभा ठाकरे बंधू एकत्र घेणार?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























